शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

चोरीच्या घटना रोखण्यासाठी शहादा येथे बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 21, 2018 12:45 IST

शहादा : शहरातील एनआरआय व्हीला, मलोणी शिवार व नवीन वसाहतींमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. ...

शहादा : शहरातील एनआरआय व्हीला, मलोणी शिवार व नवीन वसाहतींमध्ये चोरीच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या घटनांना आळा घालण्यासाठी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या उपस्थितीत महसूल व पोलीस प्रशासनाची येथे बैठक घेण्यात येऊन उपाययोजना आखण्यात आल्या.बैठकीला प्रांताधिकारी लक्ष्मीकांत साताळकर, डीवाय.एस.पी. महारू पाटील, तहसीलदार मनोज खैरनार, पोलीस निरीक्षक संजय शुक्ल, भाजपाचे तालुकाध्यक्ष डॉ.किशोर पाटील, शहर अध्यक्ष जितेंद्र जमदाळे, अतुल जयस्वाल, लक्ष्मीकांत वसावे, एनआरआय व्हीलाचे संचालक शरद पाटील व परिसरातील वसाहतींमधील नागरिक उपस्थित होते. बैठकीत आमदार पाडवी म्हणाले की, यंदा पावसाचे प्रमाण कमी राहिले व परतीच्या पावसानेही निराशा केल्याने खरीप हंगाम शेतक:यांच्या हातातून गेला आहे. या परिस्थितीचे भविष्यात वाईट परिणाम होण्याची शक्यता आहे. घरफोडी, चोरीच्या वाढत्या घटनांना आळा घालण्यासाठी जनता व पोलिसांमधील समन्वय आवश्यक आहे. दोघांनी एकमेकांना सहकार्य केले तर या घटनांना निश्चितच आवर घालता येऊ शकणार आहे. नागरिकांनी आपल्या वसाहतीत वस्तू विक्री करणारे, भंगार विक्रेते व अज्ञात व्यक्तीबाबत संशय आल्यास पोलिसांशी संपर्क साधावा, असे सांगितले. डीवाय.एस.पी. पाटील म्हणाले की, पोलीस व जनता यांच्यातील संपर्क व संवाद चोरीच्या तसेच गुन्हे घातपाताच्या घटना थांबवू शकतो. जनतेचे संरक्षण हे पोलिसांचे प्रथम कर्तव्य असून जनतेनेही पोलिसांना सहकार्य करण्याची अपेक्षा व्यक्त केली. पोलीस निरीक्षक शुक्ल म्हणाले की, येणा:या काळात चोरीच्या घटनांना आवर घालण्यासाठी सर्वानी जागरुक राहणे गरजेचे आहे. शहराची भौगोलिक परिस्थिती पाहता चारही बाजूंनी रस्ते असल्याने रस्ता बंद करणे अवघड होते. येत्या काळात शहरातील नवीन वसाहतींमध्ये ग्रामसुरक्षा दल तयार करण्याची गरज आहे. ज्या वसाहती ग्रामसुरक्षा दल तयार करतील त्यांना एक पोलीस काठी, एक बॅटरी व शिटी दिली जाणार असल्याचे शुक्ल यांनी सांगितले.बैठकीला एनआरआय व्हीला, शारदा कॉलनी, तराई पार्क, ड्रीम सिटी, आयोध्यानगरी, ओमशांतीनगर यासह परिसरातील वसाहतीतील नागरिक उपस्थित                  होते. सूत्रसंचालन प्रा.रमेश पाटील यांनी तर आभार शरद पाटील यांनी मानले.