शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ८५ व्या वर्षी निधन
2
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
3
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
4
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
5
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
6
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
7
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
8
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
9
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
10
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
11
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
12
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
13
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
14
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
15
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
16
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
17
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
18
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
19
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
20
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
Daily Top 2Weekly Top 5

मामाच्या मोहिदा येथे शांतता कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

दरम्यान, १५ जून रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची एकत्र बैठक घेऊन गावात शांततेचे आवाहन ...

दरम्यान, १५ जून रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची एकत्र बैठक घेऊन गावात शांततेचे आवाहन केले. सोमवारी रात्री अचानक घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी गावात दोन्ही समाजाच्या लोकांच्या सहकार्याने शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आलेली होती. या शांतता कमिटीला सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील, पुरुषोत्तम शंभू पाटील, माजी सरपंच गिरीधर लिंमजी पाटील, माजी सरपंच जाधव संभू पाटील, राजाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, परबत भिल, सुकराम भिलसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत म्हणाले, गावातील प्रत्येक नागरिकांना एकमेकांशी संबंध ठेवायचे असतात. रोज येणे-जाणे-भेटणे क्रमप्राप्त आहे. आपसातील मतभेद विसरून गावात शांतता ठेवा व शेतीकामे सुरू करून एकमेकांना सहकार्य करा आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. याव्यतिरिक्त पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ यांनी गावातील दोन्ही समाजातील व्यक्तींना शांततेचे आवाहन करीत, गाव शांततेकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. रोजच्या शेती, व्यवसायासोबत दिनचर्या आनंदाने सुरू ठेवा. गावात असलेल्या शांततेला गालबोट लागणार नाही यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहनदेखील केले. कोणीही अफवांना बळी पडू नये, अफवा पसरणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल. सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील यांनीदेखील मार्गदर्शन करताना म्हटले की, मामाच्या मोहिदा हे गाव तालुक्यात सामाजिक सांस्कृतिक सलोख्याचे व शांतताप्रिय गाव आहे. या गावात सर्व समाज एकमेकांच्या सहकार्याने गुण्यागोविंदाने वावरत असतात. घडलेल्या घटनेला कोणी तरी खत-पाणी घातले असेल. असे असले तरी गावातील समस्या या गावातील नागरिकांनी बसूनच सोडवल्या पाहिजेत. कुठल्याही अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. गावातील तंटे गावातच शांततेने सोडवण्यात येणार असल्याचेदेखील सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील यांनी सांगितले.

गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वच समाजातील घटकांकडून गावात प्रयत्न केला जाणार आहे. कोणीही अफवांना बळी पडू नये असे आवाहन देखील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी केले आहे.

दोन समाज एकमेकांना सहकार्य करून गावात शांतता ठेवत असतात. कालच्या झालेल्या घटनेनंतर ग्रामस्थांनी दाखवलेली सहनशीलता व गावात शांतता प्रस्थापित केल्याने ग्रामस्थांचे पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

शहादा पोलिसात अंबालाल पाटील यांच्या फिर्यादीवरून दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ करीत आहेत.