शहरं
Join us  
Trending Stories
1
'सर्वात मोठा शत्रू म्हणजे परावलंबन'; टॅरिफ वाद आणि H-1B व्हिसासंदर्भातील बदलानंतर, काय म्हणाले पंतप्रधान मोदी?
2
MSRTC: एसटी महामंडळात १७ हजारांहून अधिक पदांची भरती; चालक आणि सहाय्यक नेमणार, 'इतका' पगार!
3
हाफिज सईदने दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदचे नाव बदलले; आता 'अल-मुराबितुन' नावाने पैसे गोळा करणार
4
५०% सूट, ८०% सूट... कपडे आणि बुटांच्या दुकांनावर आता अशा ऑफर्स दिसणार नाहीत! GST कपातीशी संबंध काय?
5
शाहिद आफ्रिदीचं इरफान पठाणला आव्हान, म्हणाला, ‘’मर्द असशील तर…”, मिळालं असं प्रत्युत्तर
6
नागपूरमध्ये मनोज जायस्वाल यांना अटक, सीबीआयची हॉटेलमध्ये कारवाई; 4000 कोटींची केस काय?
7
मोलकरणीने मालकिणीच्या 'थप्पड'चा असा घेतला बदला, वाचून तुमच्याही भुवया उंचावतील!
8
'टॅरिफ'नंतर ट्रम्प यांचा नवा फतवा! भारतीयांसाठी 'अमेरिकन ड्रीम' महागणार! Visa साठी भरावे लागणार ₹८८ लाख
9
'शिंदे, पवार अन् भाजपचे ९०% आमदार मते चोरुन निवडून आले', संजय राऊतांचे टीकास्त्र
10
IND-Pak हँडशेकवरून लढत राहिले; तिकडे या संघाचा कप्तान भारतीय वंशाचा, अर्धे खेळाडू पाकिस्तानी वंशाचे निघाले
11
मारुतीनंतर महिंद्राचे GST रेट आले...! स्कॉर्पिओ एनपेक्षा XUV 700 स्वस्त झाली, बोलेरो निओ तर...
12
हृदयद्रावक! जुळ्या मुलांनी आईला मारलेली मिठी; ढिगाऱ्याखालील मृतदेह पाहून अख्खं गाव रडलं
13
VIRAL : सलाम तिच्या हिमतीला! 'मौत का कुआं'मध्ये बाईक चालवणाऱ्या तरुणीचा व्हिडीओ पाहून अंगावर काटा येईल
14
VIDEO: हार्दिक पांड्याने सीमारेषेवर धावत-पळत, कसरत करत घेतला भन्नाट झेल, पाहणारेही थक्क
15
भारत टेन्शन फ्री... ४ वर्षात जे झालं नव्हतं ते आता झालं, 'हा' कोणता साठा आता जमा झाला?
16
"त्या २४८ शेतकऱ्यांना तीन महिन्यांत कर्जमाफी द्या", उच्च न्यायालयाने राज्य सरकारला झापले, आदेश काय?
17
घरची गरिबी, टोमणे सहन केले, पण मानली नाही हार, बनली बॉक्सिंगमध्ये वर्ल्ड चॅम्पियन, कोण आहे मीनाक्षी हुड्डा
18
हसत हसतच पाण्याच उतरलेला, क्षणात होत्याचं नव्हतं झालं; जुबीन गर्गचा शेवटचा Video व्हायरल
19
Zero GST Product List: सोमवारपासून या वस्तू '0' जीएसटीत येणार, तुम्ही पाहिल्यात का? 
20
Akshay Kumar : सातवीत नापास झाला होता अभिनेता अक्षय कुमार; लहानपणी पाहिलेलं 'हे' स्वप्न

मामाच्या मोहिदा येथे शांतता कमिटीची बैठक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 17, 2021 04:21 IST

दरम्यान, १५ जून रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची एकत्र बैठक घेऊन गावात शांततेचे आवाहन ...

दरम्यान, १५ जून रोजी सायंकाळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत यांनी दोन्ही गटातील कार्यकर्त्यांची एकत्र बैठक घेऊन गावात शांततेचे आवाहन केले. सोमवारी रात्री अचानक घडलेल्या घटनेच्या अनुषंगाने मंगळवारी सायंकाळी गावात दोन्ही समाजाच्या लोकांच्या सहकार्याने शांतता कमिटीची बैठक बोलावण्यात आलेली होती. या शांतता कमिटीला सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील, पुरुषोत्तम शंभू पाटील, माजी सरपंच गिरीधर लिंमजी पाटील, माजी सरपंच जाधव संभू पाटील, राजाराम पाटील, सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड, परबत भिल, सुकराम भिलसह अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.

यावेळी पोलीस निरीक्षक दीपक बुधवंत म्हणाले, गावातील प्रत्येक नागरिकांना एकमेकांशी संबंध ठेवायचे असतात. रोज येणे-जाणे-भेटणे क्रमप्राप्त आहे. आपसातील मतभेद विसरून गावात शांतता ठेवा व शेतीकामे सुरू करून एकमेकांना सहकार्य करा आणि कोणत्याही अफवांना बळी पडू नका, असे आवाहन त्यांनी केले. याव्यतिरिक्त पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ यांनी गावातील दोन्ही समाजातील व्यक्तींना शांततेचे आवाहन करीत, गाव शांततेकरिता आपण सर्वांनी प्रयत्न करावेत. रोजच्या शेती, व्यवसायासोबत दिनचर्या आनंदाने सुरू ठेवा. गावात असलेल्या शांततेला गालबोट लागणार नाही यासाठी प्रत्येकाने सहकार्य करण्याचे आवाहनदेखील केले. कोणीही अफवांना बळी पडू नये, अफवा पसरणार नाहीत याकडे लक्ष द्यावे. अफवा पसरविणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल. सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील यांनीदेखील मार्गदर्शन करताना म्हटले की, मामाच्या मोहिदा हे गाव तालुक्यात सामाजिक सांस्कृतिक सलोख्याचे व शांतताप्रिय गाव आहे. या गावात सर्व समाज एकमेकांच्या सहकार्याने गुण्यागोविंदाने वावरत असतात. घडलेल्या घटनेला कोणी तरी खत-पाणी घातले असेल. असे असले तरी गावातील समस्या या गावातील नागरिकांनी बसूनच सोडवल्या पाहिजेत. कुठल्याही अफवांना नागरिकांनी बळी पडू नये. गावातील तंटे गावातच शांततेने सोडवण्यात येणार असल्याचेदेखील सामाजिक कार्यकर्ते भाऊभाई पाटील यांनी सांगितले.

गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वच समाजातील घटकांकडून गावात प्रयत्न केला जाणार आहे. कोणीही अफवांना बळी पडू नये असे आवाहन देखील सामाजिक कार्यकर्ते सुनील गायकवाड यांनी केले आहे.

दोन समाज एकमेकांना सहकार्य करून गावात शांतता ठेवत असतात. कालच्या झालेल्या घटनेनंतर ग्रामस्थांनी दाखवलेली सहनशीलता व गावात शांतता प्रस्थापित केल्याने ग्रामस्थांचे पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले.

शहादा पोलिसात अंबालाल पाटील यांच्या फिर्यादीवरून दंगलीचा गुन्हा दाखल झाला आहे. अद्याप कोणालाही अटक केलेली नाही. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नीलेश वाघ करीत आहेत.