शहरं
Join us  
Trending Stories
1
टॅरिफबाबत भारत आणि अमेरिकेमध्ये चर्चेचे दरवाजे अजूनही खुले, दोन्हीकडून मिळाले संकेत  
2
शाळांमध्येच होणार विद्याथ्यांचे आधार बायोमेट्रिक अपडेट, १७ कोटी आधार क्रमांक अजूनही प्रलंबित; पालकांचा वेळ, श्रम व त्रास वाचणार
3
'पहिला देश, नंतर व्यापार'! डोनाल्ड ट्रम्प यांच्या 'टॅरिफ'नंतरही भारत झुकला नाही; मोदी सरकारने दिला हा संदेश
4
"जे उचकायचं ते उचका, मी कोणाच्या बापाला घाबरत नाही"; चित्रा वाघांचा मनोज जरांगेंवर पलटवार
5
पावसाचा हाहाकार! चीनमध्ये १.८४ लाख कोटींचं नुकसान; पाकिस्तानमध्ये ३०० जणांचा मृत्यू, भारतात...
6
मिनियापोलिस शहरातील शाळेवर हल्ला; तिघांचा मृत्यू, अनेक विद्यार्थी जखमी
7
कर्जाच्या ओझ्याखाली दबला पाकिस्तान; IMFच्या बेलआऊट पॅकेजनंतरही अर्धा देश उपाशी!
8
Vaishno Devi Landslide: ना सावरण्याची संधी मिळाली, ना पळण्याची... प्रत्यक्षदर्शींनी सांगितली आपबिती
9
गुगलवर चुकूनही सर्च करू नका 'या' गोष्टी, अन्यथा पोलीस पकडून घेऊन जातील!
10
'एआय'चा झटका! २२-२५ वयोगटातील तरुणांना नोकरी मिळेना, या नोकऱ्यांवर सर्वाधिक परिणाम
11
Vidarbha Rain: विदर्भातील चार जिल्ह्यांना पाऊस झोडपणार; हवामान विभागाकडून सतर्कतेचा इशारा
12
जल्लोषपूर्ण वातावरणात श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती बाप्पा विराजमान; जया किशोरी यांच्या हस्ते झाली प्राणप्रतिष्ठा!
13
विरारमध्ये दुर्घटना बचावकार्य युद्धपातळीवर सुरू, जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला बचावकार्याचा आढावा
14
Nikki Murder Case : निक्कीच्या मृत्यूचं गूढ आणखी वाढलं, 'या' पुराव्यांमुळे बदलली तपासाची दिशा, पोलीसही हैराण
15
"आता माझ्याकडे मृत्यूशिवाय पर्याय नाही, म्हणून..."; भाजपा नेत्यानं मुख्यमंत्र्यांकडे मागितलं इच्छामरण
16
गंगेचा प्रवाह धोका? गंगोत्री ग्लेशियर १० टक्के वितळला, पाणी होतंय कमी; IIT इंदूरच्या संशोधनात काय? 
17
'आम्ही तिला मारलं नाही' निक्कीच्या सासरच्या लोकांचा दावा! पण पतीच्या एका कृतीने वाढला संशय
18
ऑनलाईन गेमिंगचे व्यसन जडले, तरुणाने घरातील दागिने चोरले अन् गेममध्ये उडवले 'इतके' पैसे!
19
भारतीय औषध कंपन्यांसमोर डोनाल्ड ट्रम्प झुकले! ५० टक्के टॅरिफमधून दिली सूट, नेमके कारण काय?
20
लव्ह मॅरेज, २ आलिशान शोरूम आणि ३६ पानी पत्र...; कोट्यवधीची संपत्ती तरीही उद्योगपतीचं कुटुंब संपलं कसं?

पोल्ट्री निर्जंतुकीकरण करण्यासाठी बैठक; नुकसान भरपाई वाढवून मिळावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 20, 2021 05:30 IST

नवापूर शहरात आतापर्यंत २२ पोल्ट्रींमध्ये पाच लाख ७८ हजार पक्षी व २५ लाख अंडी नष्ट करण्यात आली आहेत. मात्र ...

नवापूर शहरात आतापर्यंत २२ पोल्ट्रींमध्ये पाच लाख ७८ हजार पक्षी व २५ लाख अंडी नष्ट करण्यात आली आहेत. मात्र पोल्ट्रीतील निर्जंतुकीकरण करण्याचे काम राहिल्याने प्रशासनाने निर्जंतुकीकरण संदर्भात व्यावसायिकांना सूचना केल्या. यासंदर्भात पोल्ट्री व्यावसायिकांनी २० फेब्रुवारीपर्यंत पोल्ट्रीतील निर्जंतुकीकरण व स्वच्छता करण्यासाठी मुदत मागितली आहे.

शहरातील बर्ड फ्लू बाधित पोल्ट्री व्यावसायिकांनी त्यांना मिळालेल्या नुकसान भरपाईबाबत समस्या मांडली. शासनाने दिलेला निधी हा कमी असल्याने मोठ्या प्रमाणात भरपाई मिळावी, अशी मागणी प्रांतधिकारी व तहसीलदार मंदार कुलकुर्णी यांच्याकडे निवेदनाद्वारे केली. केंद्र सरकारकडून पशुखाद्यबाबत १२ रुपये किलोप्रमाणे मिळणारी भरपाई अत्यंत कमी आहे. महाराष्ट्र सरकाचा पशुखाद्य १९ रुपये किलोप्रमाणे नुकसान भरपाई देण्याचा निर्णय आहे. त्यानुसार आम्हाला जास्तीची भरपाई मिळावी, अशी मागणी या वेळी करण्यात आलेली आहे.

नवापूर शहरातील उर्वरित चार बर्ड फ्लूची लागण नसलेले व दोन रिपोर्ट निगेटिव्ह आले. त्यातील व्यावसायिकांनी औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. यासंदर्भात रात्री निकाल येण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. या चारही पोल्ट्रीतील बर्ड फ्लू अहवाल भोपाळ येथे पाठवण्यात आले आहेत. त्याचाही रिपोर्ट अद्याप आलेला नसून रिपोर्ट आल्यानंतर पुढील किलिंग ऑपरेशनसंदर्भात निर्णय घेण्यात येणार आहे.

या बैठकीत नवापूर पोल्ट्री असोसिएशनचे अध्यक्ष आरिफ बलेसरिया, गुलाम व्होरा, सलाम बलेसरिया, रिची शाह, कमलेश शाह, मोहम्मद मुल्ला, अशरफ टिमोल, असीम बलेसरिया, सुरेश प्रजापत, सालेम व्होरा आदी पोल्ट्री व्यावसायिक उपस्थित होते.

पॅरानीयार पोल्ट्री २८ हजार, पक्षी पॅराडाईज चार हजार ६०० पक्षी, रिची पोल्ट्री सहा हजार ५०० पक्षी, अशरफ पोल्ट्री, १२ हजार पक्षी या चार पोल्ट्रीमधील एकूण ५१ हजार १०० कुकुट पक्षी व अंडी व नष्ट करण्याची प्रक्रिया राबवण्यात नवापूर तहसील कार्यालयात पोल्ट्री व्यावसायिकाची बैठक घेण्यात आली. यात एक किलोमीटरऐवजी अडीच किलोमीटर अंतर निश्चित केल्याने चार पोल्ट्रीमधील कुकुट पक्षी नष्ट करण्यात येणार असल्याने व्यावसायिकांची चिंता वाढली आहे. दोनवेळा कुकुट पक्षीचे अहवाल निगेटिव्ह आला आहे. तिसरा अहवाल घेण्यात आला आहे. अहवाल निगेटीव्ह असताना कुकुट पक्षी नष्ट करण्याचा अट्टहास का करण्यात येत आहे? असा सवाल त्यांनी तहसील कार्यालयात उपस्थित केला. त्यामुळे या चार पोल्ट्रीमधील व्यावसायिक औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल करण्यासाठी गेले आहे.

केंद्रीय पथकाची पाहणी

नवापुरात २२ पोल्ट्रीमध्ये बर्ड फ्लूची लागण झाल्यानंतर दोन सदस्य केंद्रीय पथकाने सर्व पोल्ट्रीमध्ये जाऊन पाहणी केली व व्यावसायिकांना उपाययोजना संदर्भात सूचना केल्या. तसेच बर्ड फ्लू होऊ नये यासाठीही मार्गदर्शन करण्यात आले. तहसील कार्यालयात पोल्ट्री व्यावसायिकांची बैठक घेतली. या वेळी पशुसंवर्धन विभागाचे अधिकारी उपस्थित होते.