शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
6
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
7
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
8
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
9
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
10
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
11
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
12
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
13
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
14
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
15
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
16
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
17
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
18
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
19
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन
20
“बॅगवरचा फोटो कसला पाहता, मदत पाहा”; एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर, केली नुकसानीची पाहणी

खान्देशात येत्या आठ दिवसांमध्ये कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:04 IST

नंदुरबार : नंदुरबारसह खान्देशात येत्या आठ दिवसांमध्ये कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे वर्तविण्यात आला ...

नंदुरबार : नंदुरबारसह खान्देशात येत्या आठ दिवसांमध्ये कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे वर्तविण्यात आला आह़े 11 मार्चर्पयत नंदुरबारचे कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसर्पयत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आह़े नंदुरबारचे तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसर्पयत स्थिर आह़े सध्या बंगालच्या उपसागरात बाष्पीभवनाची प्रक्रिया वाढली आह़े त्याच प्रमाणे पश्चिम राजस्थानाकडूनही उष्ण वा:यांचा प्रभाव वाढला आह़े त्यामुळे संपूर्ण राज्यात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशाने कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबारात गेल्या आठवडय़ापासून सरासरी 34 अंश सेल्सिअसर्पयत तापमान स्थिर आह़े येत्या 11 मार्चर्पयत यात दोन अंशानी वाढ होण्याची शक्यता आह़े दरम्यान, नंदुरबारात सध्या नागरिकांना संमिश्र हवामान अनुभवायला मिळत आह़े सकाळी व मध्यरात्री बोचरी थंडी तर दुपारी मात्र उकाडा सहन करावा लागत आह़े आठवडय़ापासून किमान तापमान 18 अंश सेल्सिअसर्पयत कायम असल्याने परिणामी थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागला आह़े फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापासून ब:यापैकी तापमानात वाढ झालेली दिसून आली होती़  गेल्या महिन्यात चढ-उतारफेब्रुवारी महिन्यात तापमानात मोठय़ा प्रमाणात चढ-उतार बघायला मिळाले होत़े 3 फेब्रुवारी रोजी खान्देशसह संपूर्ण राज्यात किमान तापमानात वेगाने घट झालेली दिसून आली होती़ साधारणत: आठवडाभर तापमानात गारवा होता़ त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी खान्देशातील कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली होती़ जळगावात फेब्रुवारीतच तब्बल 38 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमानाची नोंद झालेली होती़ त्या खालोखाल धुळे व नंदुरबारचे कमाल तापमान 37 अंशावर कायम होत़े फेब्रुवारीत पस्तिशीपार कमाल तापमान गेल्याने उकाडय़ाचा सामना करावा लागला होता़ त्यानंतर साधारणत: 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान, अचानक गतीमान वा:यांचा प्रभाव जाणवू लागला होता़ जळगावात ताशी 18 तर नंदुरबारात 15 किमी वेगाने वारे वाहत होत़े साधारणत: दोन दिवस गतीमान वा:यांचा प्रभाव खान्देशात जाणवल्याने धुळीची समस्याही मोठय़ा प्रमाणात जाणवली होती़ त्यानंतर 1 व 3 मार्चदरम्यान किमान तापमानात पुन्हा एक ते दोन अंशाने घट झाल्याने थंडीत वाढ झाली होती़ त्यानंतर विदर्भासह मराठवाडय़ात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती़ त्यामुळे साधारणत: तीन ते चार दिवस जिल्ह्यात ढगाळ हवामानाची निर्मिती झाली होती़ त्यामुळे रब्बीतील हरभरा पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसानही झाले होत़े आता पुन्हा नंदुरबारसह खान्देशात कमाल तापमान स्थिर असून पुढील आठवडय़ात तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’च्या सूत्रांकडून मिळाली आह़े तापमानात वाढ झाली असल्याने दिवसा मोठय़ा प्रमाणात उकाडा जाणवू लागला आह़े आता पुन्हा किमान तापमानात घट होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, तापमानात वाढ होत असल्याने याचा परिणाम आरोग्यावर होऊ नये म्हणून नागरिकांनी             संतुलित आहार घ्यावा, जास्तीत जास्त पाणी प्यावे, उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी टोपी, रुमाल आदींचा वापर करावा असे आवाहन            वैद्यकीय अधिका:यांकडून करण्यात येत आह़े