शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानचे किती विमान पाडले? हा प्रश्न विरोधकांच्या मनात कधी आला नाही; राजनाथ सिंह कडाडले
2
ऑपरेशन सिंदूरदरम्यान नेमकं काय घडलं, किती दहशतवादी मारले गेले? राजनाथ सिंह यांनी लोकसभेत दिली माहिती, म्हणाले...
3
Operation Mahadev: सैन्याला मोठे यश! पहलगाम हल्ल्यातील दहशतवादी मुसा मारला गेल्याची शक्यता, तीन दहशतवादी ठार
4
IND vs ENG: टीम इंडियाला मोठा धक्का! ऋषभ पंत पाचव्या कसोटीतून बाहेर, CSKच्या खेळाडूला संघात स्थान
5
सातव्या वेतन आयोगांतर्गत पगारात लवकरच होणार अखेरची वाढ; कसा होणार १ कोटी कर्मचाऱ्यांना फायदा?
6
९० दीच्या लाटेवर स्वार व्हायला आली! कायनेटीकची DX ईव्ही लाँच झाली, पहा किंमत आणि रेंज...
7
Nitin Shete: शनि शिंगणापूर संस्थानचे उपकार्यकारी अधिकारी नितीन शेटे यांनी संपवलं आयुष्य
8
Mumbai : 'Mhada अधिकाऱ्याची महिन्याला ४०-५० लाख काळी कमाई'; पत्नी वैतागली आणि संपवलं आयुष्य
9
"अल्लाह हू अकबर, विमानात बॉम्ब, मी तो उडवून देईन", प्रवाशाच्या धमकीनंतर विमानाचे आपत्कालीन लँडिंग
10
कुठे गायब झाली 'तेरे नाम'मधील भिकारीची भूमिका करणारी अभिनेत्री? पूर्ण बदललाय तिचा लूक
11
'मौन व्रत, मौन व्रत...', संसदेत बोलणाऱ्या काँग्रेस खासदारांच्या यादीतून शशी थरुर यांना वगळले
12
घरात मोठ्या आवाजात गाणी लावून पत्नीच्या डोक्यात टाकली वीट; हत्येनंतर पतीनेही संपवले जीवन
13
मेहनतीचं चीज! आई करते मजुरी, जेवणासाठी नव्हते पैसे, कोचिंगशिवाय ३ बहिणी UGC NET पास
14
जबरदस्त नफ्याचे संकेत देतोय GNG Electronics IPO चा GMP; शेअर्स अलॉट झालेत का, कसं चेक कराल?
15
परदेशात डॉक्टरी शिकून थेट भारतात प्रॅक्टीस करण्याचा मार्ग सोपा होणार; एनएमसी आणतेय नवे नियम...
16
आजीबाई जोमात, नागोबा कोमात; 8 फूट लांब सापाला अलगद पकडले, पाहा Video
17
IND vs ENG: "शुबमन गिलने जर शतक केलं नसतं तर..."; प्रशिक्षक गौतम गंभीरने ठणकावून सांगितलं
18
'हिंजवडी' हातची गेली तर तोटा कोणाचा? पुण्याचा की महाराष्ट्राचा...; १५ वर्षांत किती बदलली...
19
Shravan Somvar 2025: महादेवाला केतकीची फुले वाहू नये; त्यामागे आहे एक पौराणिक कथा!
20
'बॉर्डर २'मध्ये वरुण धवनसोबत झळकणार 'ही' अभिनेत्री, मेकर्सने केली अधिकृत घोषणा

खान्देशात येत्या आठ दिवसांमध्ये कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2019 12:04 IST

नंदुरबार : नंदुरबारसह खान्देशात येत्या आठ दिवसांमध्ये कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे वर्तविण्यात आला ...

नंदुरबार : नंदुरबारसह खान्देशात येत्या आठ दिवसांमध्ये कमाल व किमान तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याचा अंदाज ‘आयएमडी’तर्फे वर्तविण्यात आला आह़े 11 मार्चर्पयत नंदुरबारचे कमाल तापमान 37 अंश सेल्सिअसर्पयत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आह़े नंदुरबारचे तापमान 34 ते 35 अंश सेल्सिअसर्पयत स्थिर आह़े सध्या बंगालच्या उपसागरात बाष्पीभवनाची प्रक्रिया वाढली आह़े त्याच प्रमाणे पश्चिम राजस्थानाकडूनही उष्ण वा:यांचा प्रभाव वाढला आह़े त्यामुळे संपूर्ण राज्यात सरासरीच्या तुलनेत एक ते दोन अंशाने कमाल तापमानात वाढ होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आह़े नंदुरबारात गेल्या आठवडय़ापासून सरासरी 34 अंश सेल्सिअसर्पयत तापमान स्थिर आह़े येत्या 11 मार्चर्पयत यात दोन अंशानी वाढ होण्याची शक्यता आह़े दरम्यान, नंदुरबारात सध्या नागरिकांना संमिश्र हवामान अनुभवायला मिळत आह़े सकाळी व मध्यरात्री बोचरी थंडी तर दुपारी मात्र उकाडा सहन करावा लागत आह़े आठवडय़ापासून किमान तापमान 18 अंश सेल्सिअसर्पयत कायम असल्याने परिणामी थंडी कमी होऊन उकाडा जाणवू लागला आह़े फेब्रुवारी महिन्याच्या शेवटापासून ब:यापैकी तापमानात वाढ झालेली दिसून आली होती़  गेल्या महिन्यात चढ-उतारफेब्रुवारी महिन्यात तापमानात मोठय़ा प्रमाणात चढ-उतार बघायला मिळाले होत़े 3 फेब्रुवारी रोजी खान्देशसह संपूर्ण राज्यात किमान तापमानात वेगाने घट झालेली दिसून आली होती़ साधारणत: आठवडाभर तापमानात गारवा होता़ त्यानंतर 20 फेब्रुवारी रोजी खान्देशातील कमाल तापमानात मोठय़ा प्रमाणात वाढ झालेली होती़ जळगावात फेब्रुवारीतच तब्बल 38 अंश सेल्सिअस इतके कमाल तापमानाची नोंद झालेली होती़ त्या खालोखाल धुळे व नंदुरबारचे कमाल तापमान 37 अंशावर कायम होत़े फेब्रुवारीत पस्तिशीपार कमाल तापमान गेल्याने उकाडय़ाचा सामना करावा लागला होता़ त्यानंतर साधारणत: 25 ते 27 फेब्रुवारीदरम्यान, अचानक गतीमान वा:यांचा प्रभाव जाणवू लागला होता़ जळगावात ताशी 18 तर नंदुरबारात 15 किमी वेगाने वारे वाहत होत़े साधारणत: दोन दिवस गतीमान वा:यांचा प्रभाव खान्देशात जाणवल्याने धुळीची समस्याही मोठय़ा प्रमाणात जाणवली होती़ त्यानंतर 1 व 3 मार्चदरम्यान किमान तापमानात पुन्हा एक ते दोन अंशाने घट झाल्याने थंडीत वाढ झाली होती़ त्यानंतर विदर्भासह मराठवाडय़ात पावसाची शक्यता वर्तविण्यात आली होती़ त्यामुळे साधारणत: तीन ते चार दिवस जिल्ह्यात ढगाळ हवामानाची निर्मिती झाली होती़ त्यामुळे रब्बीतील हरभरा पिकाचे मोठय़ा प्रमाणात नुकसानही झाले होत़े आता पुन्हा नंदुरबारसह खान्देशात कमाल तापमान स्थिर असून पुढील आठवडय़ात तापमानात पुन्हा वाढ होणार असल्याची शक्यता ‘आयएमडी’च्या सूत्रांकडून मिळाली आह़े तापमानात वाढ झाली असल्याने दिवसा मोठय़ा प्रमाणात उकाडा जाणवू लागला आह़े आता पुन्हा किमान तापमानात घट होण्याची शक्यता नसल्याचे हवामान खात्याकडून सांगण्यात आले आह़े दरम्यान, तापमानात वाढ होत असल्याने याचा परिणाम आरोग्यावर होऊ नये म्हणून नागरिकांनी             संतुलित आहार घ्यावा, जास्तीत जास्त पाणी प्यावे, उन्हापासून संरक्षण मिळण्यासाठी टोपी, रुमाल आदींचा वापर करावा असे आवाहन            वैद्यकीय अधिका:यांकडून करण्यात येत आह़े