शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

जनता कर्फ्यूमुळे तळवे आणि पिंपळोद येथे मध्यरात्रीच लावला विवाह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 22, 2020 11:22 IST

लोकमत न्यूज नेटवर्क कोठार/नंदुरबार : आयुष्यातून एकदाच येणारा विवाहाच्या क्षणाचा आनंद बाजूला ठेवत तळवे ता़ तळोदा येथील केदार कुटूंबियांनी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोठार/नंदुरबार : आयुष्यातून एकदाच येणारा विवाहाच्या क्षणाचा आनंद बाजूला ठेवत तळवे ता़ तळोदा येथील केदार कुटूंबियांनी जनता कर्फ्यूच्या आवाहनाला साद देत शनिवारी मध्यरात्री १२ वाजून पाच मिनीटांनी विवाह सोहळा आटोपून घेत जनजागृतीत सहभाग नोंदवला़ विवाह २२ रोजी दुपारी १२ वाजेचा असताना जनता कर्फ्यूच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला़२२ मार्च रोजी तळवे ता़तळोदा येथील ग्राम पंचायत सदस्य सुरेश नारायण केदार व यांचा मुलगा दिपक केदार यांचा विवाह मोड ता़ तळोदा येथील नाना उंदा सूर्यवंशी यांची कन्या सपना यांच्यासोबत निश्चित करण्यात आला होता़ दरम्यान कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी २२ मार्च रोजी देशातील नागरिकांनी जनता कर्फ्यूत सहभागी होऊन कोरोनामुक्त भारत करण्याचे आवाहन केले होते़ कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी घेतलेल्या निर्णयाला तळवे ग्रामस्थांनी पाठिंबा दिला होता़ यातच तळवे येथे विवाह असल्याची माहिती सरपंच दशरथ बारीकराव, पोलिस पाटील भरत पटेल यांना मिळाल्यानंतर त्यांनी सुरेश केदार यांची भेट घेत माहिती दिली़ केदार कुटूंबांनेही यावर प्रतिसाद देत मध्यरात्री विवाह लावण्याचा निर्णय घेतला होता़ यावेळी आरोग्य सेविका सुरेखा वळवी आणि प्रताप वळवी यांनी मध्यस्थी केली होती़ केदार कुटूंबिय, नवरीकडील मंडळी तसेच गावात माहिती देऊन रविवारी मध्यरात्री विवाह सोहळा उरकला़ विशेष म्हणजे यावेळी आरोग्यसेविका सुरेखा वळवी आणि नवरदेव आणि नवरी यांनी उपस्थितांना कोरोनापासून बचाव करण्याचा सल्ला देऊन हात धुण्याचे महत्त्व पटवून दिले ़ यावेळी दोन्ही कुटूंबियांचे निवडक नातेवाई, नातेवाईक,गावातील प्रतिष्ठित नागरिक,व समाज बांधव असे केवळ ५० नागरिक उपस्थित होते़खैरवे ता़ शहादा येथील वर सुधीर भिमराव निकुंभ व पिंपळोद ता़ निझर येथील योगिता देविदास सामुद्रे यांचा विवाह रविवार २२ मार्च रोजी पिंपळोद येथे विवाह होणार होता़ परंतू जनता कर्फ्यूमुळे वधू वराकडील मंडळींनी हळदी समारंभातच शनिवारी रात्री विवाह उरकून घेतला़ यावेळी मोजकेच वºहाडी मंडळी उपस्थित होते़ निकुंभे व सामुद्रे परिवाराच्या या निर्णयाचा समाजात व पंचक्रोशीत स्वागत करण्यात आला़