शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
4
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
5
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
6
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
7
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
8
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
9
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
10
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
11
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
12
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
13
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
14
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
15
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
16
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
17
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
18
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
19
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
20
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
Daily Top 2Weekly Top 5

बाजारपेठा पूर्वीप्रमाणेच सुरू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 1, 2020 12:17 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या नियमात जिल्ह्यात फारसा बदल होणार नसल्याचे चित्र आहे. शाळा ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : राज्य शासनाने जाहीर केलेल्या लॉकडाऊनच्या नियमात जिल्ह्यात फारसा बदल होणार नसल्याचे चित्र आहे. शाळा उघडण्याचा निर्णयाबाबत देखील स्पष्टता नाही. त्यामुळे शिक्षक, विद्यार्थी व पालकांना शाळेच्या तयारीबाबत संभ्रम आहे. दरम्यान, धार्मिक स्थळे आणि सार्वजनिक ठिकाणी होणारे गर्दीेचे कार्यक्रम सध्या बंद राहणार आहेत. दरम्यान, १ तारखपासूनच्या नवीन लॉकडाऊनबाबत जिल्हा प्रशासनातर्फे सायंकाळी उशीरापर्यंत कुठलेही निर्देश नव्हते.शनिवारी केंद्र शासनााने पाचव्या लॉकडाऊनबाबत निर्देश दिले. त्यानंतर रविवारी राज्य शासनाने निर्देश दिले. त्यानुसार १ जनूपासून त्याची अंमलबजावणी होणार आहे. नंदुरबार जिल्हा आधीपासून आॅरेंज झोनमध्ये असल्यामुळे लॉकडाऊनच्या निर्देशांमध्ये फारसा फरक पडणार नसल्याचे चित्र आहे.बाजारपेठचा वेळ वाढवावा...जिल्हा आॅरेंज झोनमध्ये असल्यामुळे चौथ्या लॉकडाऊनमधील तरतुदींप्रमाणे अनेक बाबींना सवलती देण्यात आल्या आहेत. त्या यापुढेही सुरू राहणार असल्याचे स्पष्ट आहे. बाजारपेठा सुरू ठेवण्याच्या वेळा या सध्याच्या वेळेप्रमाणेच सकाळी नऊ ते सायंकाळी पाच या वेळेत राहण्याची शक्यता आहे.रात्री ९ वाजेपासून पहाटे पाच वाजेपर्यंत संचारबंदीची अंमलबजावणी कडक राहणार आहे. त्यामुळे दुकानांच्या वेळा सायंकाळी सात वाजेपर्यंत वाढवून मिळाव्या असा सूर व्यापारी वर्गातून व्यक्त होत आहे. त्याबाबतचा निर्णय मात्र जिल्हाधिकारी घेतील किंवा कसा याकडे देखील लक्ष लागून आहे.धार्मिक स्थळे, कार्यक्रम बंदगेल्या २२ मार्च पासून बंद असलेली धार्मिक स्थळे यापुढील काळात देखील बंद ठेवण्यात येणार आहेत. १ जूनपासून धार्मिक स्थळे सुरू होतील अशी अपेक्षा व्यक्त केली जात होती. त्यादृष्टीने काही धार्मिक स्थळावर नियोजन देखील करण्यात आले होते. परंतु पाचव्या लॉकडाऊनमध्ये देखील धार्मिक स्थळांबाबतचा निर्णय कायम ठेवण्यात आला आहे.याशिवाय सार्वजनिक कार्यक्रम देखील बंद राहणार आहेत. लग्न समारंभ व अंत्ययात्रा यांच्यावरील उपस्थितीचे निर्बंध कायम ठेवण्यात येणार आहे.शाळांबाबत संभ्रम कायमशाळा सुरू करण्याबाबत संभ्रम कायम ठेवण्यात आला आहे. १५ जूनपासून राज्यातील शाळा सुरू होतात तर सीबीएसई आणि इतर माध्यमाच्या शाळा या जूनच्या पहिल्या आठवड्यापासून सुरू होतात. परंतु शाळा सुरू करण्याबाबत देखील स्पष्ट निर्देश नसल्याने शिक्षक, विद्यार्थी व पालकांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे.शालेय साहित्य विक्री करणाऱ्या व्यापाऱ्यांनीही आपली दुकाने सज्ज ठेवली आहेत. परंतु शाळा सुरू होण्याचा निर्णयच होत नसल्याने ग्राहक देखील तिकडे फिरकत नसल्याची स्थिती आहे. बारावीची पुस्तके बाजारात उपलब्ध झाली असल्यामुळे त्यांना मागणी बºयापैकी आहे. इतर साहित्याची मागणी मात्र ठप्पच आहे.जिल्ह्यात गेल्या आठवड्यापासून शहरी भागात एस.टी.वाहतूक सेवा सुरू करण्यात आली आहे. आता ग्रामिण भागासाठी देखील सेवा सुरू होणार आहे. त्याचे नियोजन करण्यात आले आहे. आदेश येताच ते सुरू होतील. त्यामुळे ग्रामिण भागातील जनतेला ते सोयीचे ठरणार आहे.आंतरराज्य वाहतूक मात्र जिल्ह्यात सर्रास सुरू आहे. गुजरात व मध्यप्रदेशातून मोठ्या संख्येने वाहने ये-जा करीत आहेत. त्यांच्या तपासणीला मात्र फाटा दिला जात आहे. जिल्ह्यातून दोन महामार्ग व चार आंतरराज्य मार्ग गेलेले आहेत. गव्हाळी, नवापूर येथील सीमा तपासणी नाके आहेत. याशिवाय शहादा-खेतिया रस्त्यावर सिमेवर देखील तपासणी नाका आहे. तरीही मोठ्या प्रमाणावर वाहने ये-जा करीत आहेत. त्यात सध्या जड वाहनांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. आता आंतरजिल्हा ये-जा करण्यासाठी पासची गरज राहणार नसल्यामुळे वाहनांची संख्या अधीक राहणार असल्याचे चित्र आहे.