शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात लाल मिरचीची ढेसर

By admin | Updated: January 11, 2017 23:21 IST

मिरची बाजारात सध्या लाल मिरचीची ढेसर सुरू असून भावदेखील घसरत आहेत.

नंदुरबार : मिरची बाजारात सध्या लाल मिरचीची ढेसर सुरू असून भावदेखील घसरत आहेत. दररोज तब्बल पाच हजार क्विंटल आवक सुरू आहे. जवळपास चारशे वाहने दाखल होत असल्यामुळे बाजार समितीत वाहने लावण्यासाठीदेखील जागा उपलब्ध राहत नसल्याची स्थिती आहे. येत्या काही दिवसार्पयत ही स्थिती कायम राहणार असल्याचे चित्र आहे.गेल्या अनेक वर्षानंतर येथील मिरची बाजाराला ठसका आवकचा ठसका आला आहे. गेल्या पाच ते सहा वर्षापासून जिल्ह्यात मिरचीची लागवड कमी झाली होती. परिणामी आवक देखील कमी होती. साधारणत: सव्वा ते दीड लाख क्विंटलर्पयत आवक स्थिर राहत होती. त्यामुळे मिरची बाजाराला अवकळा आली होती. ही स्थिती लक्षात घेता येथील मिरची बाजाराची ओळख पुसली जाते किंवा कशी याबाबत साशंकता व्यक्त होत होती. परंतु यंदा मिरची बाजाराला ब:यापैकी तारल्याचे चित्र दिसून येत आहे.यंदा लागवड वाढलीयंदा मिरचीची लागवड गेल्या पाच ते सहा वर्षाच्या तुलनेत दुप्पटीने वाढली आहे. शिवाय रोगांचा प्रादुर्भावदेखील यंदा कमीच राहिला. त्यामुळे मिरचीचे उत्पादन यंदा दुप्पटीने आले आहे. त्याचा परिणाम मिरची आवकवर होऊ लागला आहे.बाजार समितीत कधी नव्हे ती यंदा हिरवी मिरचीदेखील मोठय़ा प्रमाणावर दाखल झाली होती. हिरव्या मिरचीच्या पथारीदेखील यंदा बाजार समितीत पहावयास मिळाल्या होत्या. अवघे पाच ते सात रुपये किलो अर्थात पाचशे ते सातशे रुपये क्विंटल दराने बाजारात हिरवी मिरची विकावी लागली होती. आवक दुप्पटसध्या लाल मिरचीची आवक दुप्पट झाली आहे. साधारणत: दोन ते अडीच हजार क्विंटल लाल मिरचीची आवक होत असते. यंदा हंगामाच्या सुरुवातपासूनच दोन हजार क्विंटल आवक सुरू    झाली होती. आता तर साडेचार ते   पाच हजार क्विंटल आवक सध्या    सुरू आहे. त्यामुळे लाल मिरचीची अक्षरश: ढेसर बाजार समितीत लागली आहे. दररोज किमान चारशे वाहने भरून मिरची बाजार समितीत दाखल होत आहे. त्यामुळे या भागात मोठय़ा प्रमाणावर वाहनांची वर्दळ वाढली आहे. मिरची टाकण्यासाठी जागा राहत नसल्याचेही चित्र दिसून येत आहे. त्याचा परिणाम शेतकरी मिळेल त्या भावात मिरची विकून मोकळा होत आहे.भाव घसरू लागलेसध्या दुस:या तोडची मिरची बाजारात दाखल होत आहे. शिवाय फाफडा मिरचीही मोठय़ा प्रमाणावर येऊ लागली आहे. त्यामुळे भाव कधी स्थिर तर कधी घसरत आहेत. सध्या 1400 रुपये क्विंटलपासून भाव सुरू आहेत. मिरचीच्या जातीनुसार व प्रतवारीनुसार भाव दिला जात आहे. जास्तीत जास्त 2600 रुपये क्विंटलर्पयत भाव मिळत आहे. येत्या काळात मिरचीची आवक कमी    होईल त्याप्रमाणात पुन्हा भाव उचल खातील अशी शक्यता वर्तविली जात आहे. शेतक:यांनाही आशा लागून आहे.

 

यंदा बॅकलॉग भरून निघणार..बाजार समितीत यंदाच्या हंगामात सव्वा लाख क्विंटलर्पयत मिरची आवक झाली आहे. आणखी किमान इतकीच आवक येत्या काळात होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गेल्या काही वर्षातील बॅकलॉग भरून निघणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या दररोज साडेतीनशे ते चारशे विविध लहान मोठी वाहने भरून मिरची येथे दाखल होत आहे. किमान पाच हजार क्विंटल आवक कायम आहे. ओल्या मिरचीसह कोरडय़ा मिरचीला देखील मोठी मागणी असल्याची माहिती बाजार समितीचे सचिव योगेश अमृतकर यांनी दिली.