लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : कोरोनाचा प्रसार होऊ नये, प्रतिबंधात्मक उपाययोजना केल्या जाव्या व लोकांनी काळजी घ्यावी यासाठी ३१ मार्च पर्यंत जिल्ह्यातील सर्व आठवडे बाजार मंगळवारपासून बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी यांनी सोमवारी दिली होती़ परंतू या आदेशानंतरही मंगळवारी सकाळी नंदुरबार व शहादा येथील आठवडे बाजार सुरळीतपणे पार पडलने आहेत़ आठवडे बाजार बंदीचे आदेश रात्री उशिरापर्यंत समजू न शकल्याने दोन्ही ठिकाणी आठवडे बाजार भरल्याची माहिती आहे़जिल्हाधिकारी डॉ़ भारुड यांनी दक्षता म्हणून जिल्ह्यातील यात्रोत्सव आणि आठवडे बाजार बंद करुन विविध मार्गदर्शन सूचना केल्या आहेत़ यांची कठोर अंमलबजावणी होणे गरजेचे असताना आठवडे बाजार जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणीच आठवडे बाजार भरल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे़ दरम्यान कोरोनाची दहशत दिवसेंदिवस वाढत असून जिल्ह्यात त्याचा परिणाम जाणवू लागला आहे़ मंगळवारी सकाळपासून शहादा, नंदुरबार या मोठ्या शहरांमधून शिक्षणासाठी बाहेर गेलेले विद्यार्थी घराकडे परतत असल्याचे दृश्य होते़ प्रामुख्याने पुण्यासह विविध शहरात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना भिती असल्याने त्यांनी विद्यार्थ्यांना घरी बोलावून घेतल्याची माहिती देण्यात आली आहे़दुसरीकडे शासकीय कार्यालय आवारांमध्ये प्रथमच शुकशुकाट पसल्याचे दिसून आले़ जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा परिषद आदी कार्यालयात सकाळपासून केवळ कर्मचारी आणि अधिकारी यांचा वावर असल्याचे दिसून आले़ शासनाने बायोमेट्रीक बंद करण्याचे आदेश काढल्याने अधिकारी व कर्मचारी हे सह्या करुन कार्यालयात प्रवेश करत असल्याचे दिसून आले़शासनाने शाळा, महाविद्यालय यांना आधीच सुटी जाहिर केल्याने शाळांच्या आवारात शुकशुकाट होता़ बºयाच ठिकाणी शिक्षकांना शाळेत बोलावले गेल्याचे प्रकार दिसून आले होते़ महाविद्यालयांमध्येही हीच स्थिती होती़ खाजगी व्यवस्थापनाच्या शाळांमध्ये शिक्षक आणि कर्मचारी दिसून येत असल्याने त्यांना आदेशांची योग्य माहिती समोर आले आहे़कोरोना संदर्भातील खबरदारी व उपाययोजना रोखण्यासाठी आता रेल्वेनेही पाऊल उचचले आहे़ विशेषत: रेल्वेस्थानकावरील प्लॅटफॉर्मवर मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते़ नातेवाईकांना भेटण्यासाठी त्यांना चहा व नाश्ता देण्यासाठी तसेच निरोप देण्यासाठी नागरिक रेल्वेस्थानकावर गर्दी करीत असतात़ ती कमी व्हावी यासाठी प्लॅटफॉर्मचे तिकिट दर वाढवण्याचा निर्णय रेल्वे बोर्डाने घेतला आहे़ त्यानुसार नंदुरबार प्लॅटफॉर्म तिकिट आता १० रुपयांवरुन ३० रुपये झाले आहे़ तर सुरत स्थानकावरील प्लॅटफॉर्मचे तिकिट ५० रुपये करण्यात आले आहे़ अशा पद्धतीने सर्वच रेल्वेस्थानकावरचे प्लॅटफॉर्म तिकिट वाढवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे़
बंदी आदेशानंतरही भरले आठवडे बाजार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 18, 2020 12:29 IST