शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहार निवडणुकीपूर्वीच एनडीएत बंडखोरी! चिराग पासवान यांची घोषणा, सर्व २४३ जागांवर लढणार...
2
“प्रश्न निवडणूक आयोगाला विचारले, पण उत्तर भाजपाने दिले, म्हणजे मॅच फिक्सिंगवर शिकामोर्तबच”
3
Monsoon Update : मान्सूनच्या पावसाला कधीपासून सुरुवात होणार? हवामान विभागाने दिली अपडेट
4
फिल्मी दुनियेत शिल्पा नावाने प्रसिद्ध, पण खरं नाव दुसरंच, 'या' गोष्टीची तिला आजही वाटते भीती!
5
पाकिस्तानने पुन्हा हात पसरले! अमेरिकेकडून एअर डिफेन्स सिस्टम मागितली
6
धक्कादायक! जो समोर आला, त्याच्याशी संसार थाटला; ३ वर्षांत २० वेळा लग्न केलं अन्...
7
Rinku Singh अन् Priya Saroj यांच्या साखरपुड्यातील थाट; त्या महागड्या हॉटेलात सर्वात स्वस्त थाळी हजारात
8
धार्मिक भावना दुखावत असतील तर मांसाहारी हॉटेलमध्ये का जाता? ग्राहक आयोगाने मुंबईतील तक्रार फेटाळली 
9
“राहुल गांधी यांच्या प्रश्नांना निवडणूक आयोग वस्तुनिष्ठ उत्तर का देत नाही?”: हर्षवर्धन सपकाळ
10
पुतिन आर्मीने आणखी एका शहरावर फडकावला झेंडा; युक्रेनच्या 20 टक्के भूमिवर मिळवला ताबा
11
टोल मागितल्यावर कर्मचाऱ्याच्या अंगावर घातली गाडी, फरफटत नेत काढला पळला; चंद्रपुरातील घटना
12
Raja Raghuvanshi : सोनम-राजाचा पाठलाग करत होती 'लाल' कार? नव्या CCTV फुटेजमध्ये दिसली संशयास्पद हालचाल
13
“एकनाथ शिंदेंना नकोत, आदित्य-उद्धव ठाकरेंना त्रास दिला, एकनिष्ठ व्यक्ती हवी”: चंद्रकांत खैरे
14
"पैसा वळवलेला नाही, बजेटनुसारच तो खर्च केलाय"; लाडकी बहीणवरुन CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
15
Priya Saroj Rinku Singh: रिंकूने अंगठी घालताच प्रिया सरोज यांना अश्रू अनावर; बघा साखरपुड्यातील व्हिडीओ
16
राजा रघुवंशीची हत्या, सोनम अजूनही बेपत्ता; मेघालयात हनिमूनसाठी गेलेल्या जोडप्यासोबत नेमकं काय घडलं?
17
LIC ने महिलांसाठी आणली खास योजना, दरमहा मिळतील ७००० रुपये; जाणून घ्या माहिती...
18
क्रिकेटर रिंकू सिंह आणि खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा! दोघांच्या खास लूकची चर्चा; इथं पाहा Pics
19
पुण्यात अंधश्रद्धेचा कळस! झाडातून वाहू लागलं पाणी, लोकांनी पूजा करत घेतले दर्शन; नंतर कळलं की...
20
चाकू लागला तरी रिक्षाची चावी काढून पळाला अन्... परीक्षेसाठी आलेल्या तरुणाची पैशाच्या वादातून हत्या

४० दिवसांनंतर भरली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मार्च महिन्यात बंद केलेली दुकाने व्यावसायिकांनी सोमवारी सकाळी सुरु केली़ ४० दिवसांच्या कालावधीनंतर विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मार्च महिन्यात बंद केलेली दुकाने व्यावसायिकांनी सोमवारी सकाळी सुरु केली़ ४० दिवसांच्या कालावधीनंतर विविध दुकाने सुरु झाल्याने बाजारात गर्दी उसळली होती़ यातून विविध भागात वाहतूक कोंडी होऊन पोलीस आणि नागरिक यांच्या तू-तू मै-मै झाल्याचे दिसून आले़आॅरेंज झोनमध्ये असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात अत्यावश्यवक सेवांसह विविध व्यवसाय सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती़ यातून सोमवारी सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत दुकाने सुरु ठेवण्याची मुदत देण्यात आली होती़ या पार्श्वभूमीवर सकाळी सातपासून शहरातील शास्त्री मार्केट, माणिक चौक, सुभाष चौक, गणपती मंदिर रोड परिसर, हाटदरवाजा, सिंधी कॉलनी, तहसील कार्यालय परिसर यासह विविध भागातील कापड दुकाने, चप्पल-बूट विक्री, मोबाईल दुकाने, हार्डवेअर, प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानांसह जनरल स्टोअर्स सुरु करण्यात आले़ शहरातील विविध भागात हातगाडी लावून वस्तू विक्री करणारेही सकाळी हजर झाले होते़ जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री व्यतिरिक्त इतर दुकाने सुरु होणार असल्याने नागरिकही शहरात आले होते़ यातून हाट दरवाजा, उड्डाणपुल, एकलव्य हायस्कूल, स्टेशन रोड या भागात वाहतूक कोंडी झाली़ जुनी नगरपालिका परिसरात वाहने लावणाऱ्यांनी रस्त्यात वाहने उभी केल्याने पायी चालणेही मुश्किल झाले होते़वाहतूक शाखेकडून समज देऊनही नागरिक ऐकत नसल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली़ प्रशासनाने स्टेशनरोड भागात आखलेल्या जागांवर हातागाड्या लावल्या गेल्याने बाजारात कोंडी होत होती़ पोलीसांनी समज दिल्यानंतर काही गाड्या दुसºया रस्त्यांकडे वळवण्यात आल्या़४१२ वाजेनंतर व्यावसायिकांनी दुकाने बंद करावीत यासाठी पोलीस अधिकाºयांनी फिरुन सूचना केल्या होत्या़४बाजार सुरु झाल्याची माहिती ग्रामीण भागात मिळाल्यानंतर तेथून महिला आणि पुरुष दुचाकी व तीनचाकी वाहनांनी शहरात येत होते़ प्रारंभी बहुतांश आदिवासी महिलांनी बँकांबाहेर गर्दी करुन रांगा लावल्या होत्या़ पैसे काढून बाजार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या मातांना बँकेबाहेरच दुपार झाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे दिसून आले़वाहतूक शाखेकडून बेशिस्तपणा करणाºया वाहनाधारकांवर कारवाई करण्यात आली़ यातून जुनी नगरपालिका चौकात बराच वेळ पोलीस आणि नागरिक यांच्यात वाद रंगले होते़ ग्रामीण भागातून आलेल्या काहींची वाहने जप्त करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती़सराफ बाजार सकाळी ९ वाजेपासून सुरु झाला होता़ परंतू तीन तासात म्हणावी तशी उलाढाल होऊ शकली नाही़ सर्वच व्यावसायिकांनी दुकानांची सफाई करण्यावर भर दिल्याने ग्राहकांची तुरळक संख्या होती़ काही ठिकाणी मोड देण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातून आलेले दिसून आले़मंगळवारी शहराचा आठवडे बाजार आहे़ हा बाजार होतो किंवा कसे याकडे लक्ष लागून राहणार आहे़ प्रशासनाने बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी गर्दी होण्याची शक्यता आहे़सकाळी सर्वच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता़ थुंकणाºयांवर कारवाई करणारे पथकही दिसून आले नाही़