शहरं
Join us  
Trending Stories
1
इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून अटल सेतूवर मोफत प्रवास; इतर दोन महामार्गावरही दोन दिवसांत लागू
2
आजचे राशीभविष्य, २२ ऑगस्ट २०२५: बोलण्यावर संयम ठेवणे आवश्यक; शक्यतो नवीन काम घेऊ नका
3
मुंबईचे सर्वाधिक दूषित पाणी भेंडी बाजार, वांद्रे पूर्व, कुलाबा, कफ परेड, सांताक्रूझमध्ये !
4
दसरा-दिवाळीत स्वस्ताईचा बार! GSTमध्ये मोठे बदल लवकरच; ५ टक्के आणि १८ टक्के असे दोनच टप्पे!
5
परदेशी विद्यार्थ्यांची मुंबई विद्यापीठाला पसंती; ६१ देशांच्या २५८ जणांनी घेतला प्रवेश
6
रस्तेबांधणीचे टेंडर हा नवा धंदा बनला आहे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची यंत्रणेवर खोचक टीका
7
फडणवीस यांचा पवार, ठाकरेंना फोन; उपराष्ट्रपतिपदासाठी जुळवाजुळव सुरू; दोघांकडे मिळून २१ मते
8
बाळगंगा प्रकल्पाचे थकीत ३०३ कोटींचे बिल अदा करा; हायकोर्टाने लवादाचा निर्णय ठरविला योग्य
9
भय इथले संपत नाही... तारापूरमध्ये कंपनीत वायुगळती; ४ जणांचा मृत्यू, दोन जण गंभीर
10
BDDच्या घराची चावी घेण्यासाठी 'म्हाडा'कडून घातलेली हमीपत्राची अट काढून टाका- आदित्य ठाकरे
11
जीएसबी सेवा मंडळाचा ४७४ कोटींचा विमा; यामध्ये भाविकांचाही समावेश, एसीमध्ये दर्शन मिळणार
12
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
13
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
14
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
15
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
16
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
17
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
18
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
19
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
20
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं

४० दिवसांनंतर भरली बाजारपेठ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2020 11:50 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : मार्च महिन्यात बंद केलेली दुकाने व्यावसायिकांनी सोमवारी सकाळी सुरु केली़ ४० दिवसांच्या कालावधीनंतर विविध ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : मार्च महिन्यात बंद केलेली दुकाने व्यावसायिकांनी सोमवारी सकाळी सुरु केली़ ४० दिवसांच्या कालावधीनंतर विविध दुकाने सुरु झाल्याने बाजारात गर्दी उसळली होती़ यातून विविध भागात वाहतूक कोंडी होऊन पोलीस आणि नागरिक यांच्या तू-तू मै-मै झाल्याचे दिसून आले़आॅरेंज झोनमध्ये असलेल्या नंदुरबार जिल्ह्यात अत्यावश्यवक सेवांसह विविध व्यवसाय सुरु करण्यास जिल्हाधिकाऱ्यांनी परवानगी दिली होती़ यातून सोमवारी सकाळी आठ ते दुपारी १२ या वेळेत दुकाने सुरु ठेवण्याची मुदत देण्यात आली होती़ या पार्श्वभूमीवर सकाळी सातपासून शहरातील शास्त्री मार्केट, माणिक चौक, सुभाष चौक, गणपती मंदिर रोड परिसर, हाटदरवाजा, सिंधी कॉलनी, तहसील कार्यालय परिसर यासह विविध भागातील कापड दुकाने, चप्पल-बूट विक्री, मोबाईल दुकाने, हार्डवेअर, प्लास्टिक साहित्य विक्रीच्या दुकानांसह जनरल स्टोअर्स सुरु करण्यात आले़ शहरातील विविध भागात हातगाडी लावून वस्तू विक्री करणारेही सकाळी हजर झाले होते़ जीवनावश्यक वस्तूंच्या विक्री व्यतिरिक्त इतर दुकाने सुरु होणार असल्याने नागरिकही शहरात आले होते़ यातून हाट दरवाजा, उड्डाणपुल, एकलव्य हायस्कूल, स्टेशन रोड या भागात वाहतूक कोंडी झाली़ जुनी नगरपालिका परिसरात वाहने लावणाऱ्यांनी रस्त्यात वाहने उभी केल्याने पायी चालणेही मुश्किल झाले होते़वाहतूक शाखेकडून समज देऊनही नागरिक ऐकत नसल्याने अखेर कारवाईला सुरुवात करण्यात आली़ प्रशासनाने स्टेशनरोड भागात आखलेल्या जागांवर हातागाड्या लावल्या गेल्याने बाजारात कोंडी होत होती़ पोलीसांनी समज दिल्यानंतर काही गाड्या दुसºया रस्त्यांकडे वळवण्यात आल्या़४१२ वाजेनंतर व्यावसायिकांनी दुकाने बंद करावीत यासाठी पोलीस अधिकाºयांनी फिरुन सूचना केल्या होत्या़४बाजार सुरु झाल्याची माहिती ग्रामीण भागात मिळाल्यानंतर तेथून महिला आणि पुरुष दुचाकी व तीनचाकी वाहनांनी शहरात येत होते़ प्रारंभी बहुतांश आदिवासी महिलांनी बँकांबाहेर गर्दी करुन रांगा लावल्या होत्या़ पैसे काढून बाजार करण्याच्या प्रयत्नात असलेल्या या मातांना बँकेबाहेरच दुपार झाल्याने रिकाम्या हाताने परतावे लागल्याचे दिसून आले़वाहतूक शाखेकडून बेशिस्तपणा करणाºया वाहनाधारकांवर कारवाई करण्यात आली़ यातून जुनी नगरपालिका चौकात बराच वेळ पोलीस आणि नागरिक यांच्यात वाद रंगले होते़ ग्रामीण भागातून आलेल्या काहींची वाहने जप्त करण्यात आल्याने त्यांनी नाराजी व्यक्त केली होती़सराफ बाजार सकाळी ९ वाजेपासून सुरु झाला होता़ परंतू तीन तासात म्हणावी तशी उलाढाल होऊ शकली नाही़ सर्वच व्यावसायिकांनी दुकानांची सफाई करण्यावर भर दिल्याने ग्राहकांची तुरळक संख्या होती़ काही ठिकाणी मोड देण्यासाठी ग्रामीण तसेच शहरी भागातून आलेले दिसून आले़मंगळवारी शहराचा आठवडे बाजार आहे़ हा बाजार होतो किंवा कसे याकडे लक्ष लागून राहणार आहे़ प्रशासनाने बाजार बंद ठेवण्याचे आदेश दिले असले तरी गर्दी होण्याची शक्यता आहे़सकाळी सर्वच ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला होता़ थुंकणाºयांवर कारवाई करणारे पथकही दिसून आले नाही़