शहरं
Join us  
Trending Stories
1
Wang Kun: दारू नाही, पार्टी नाही, आहारही साधा...; तरीही प्रसिद्ध बॉडीबिल्डरचा वयाच्या ३० व्या वर्षी मृत्यू!
2
एक योजना महात्मा गांधी के नाम...! मनरेगाचं नाव बदलण्याच्या धामधुमीतच ममता बॅनर्जींची मोठी घोषणा
3
अमेरिकेकडून आणखी एक जहाजावर हल्ला, ४ जणांचा मृत्यू, व्हेनेझुएलाने घेतला मोठा निर्णय  
4
प्रज्ञा सातव यांच्या भाजपा प्रवेशावरून काँग्रेसची टीका; नेते म्हणाले, “हे स्वार्थी लोक...”
5
कार घेण्याचं स्वप्न आता होणार पूर्ण! पाहा कोणत्या बँकेत मिळतंय सर्वात स्वस्त 'कार लोन'
6
Vijay Hazare Trophy : IPL मधील 'अनसोल्ड' खेळाडूच्या कॅप्टन्सीत खेळणार KL राहुल! करुण नायरलाही 'प्रमोशन'
7
पळपुट्या विजय माल्याच्या वाढदिवसानिमित्त ललित मोदीने दिली जंगी पार्टी, सोशल मीडियावर झाले ट्रोल
8
महायुतीच्या मुंबई 'फॉर्म्युला'तून राष्ट्रवादी आउट; भाजप-शिवसेनेचे १५० जागांवर एकमत; ७७ जागांसाठी खलबतं सुरू
9
अखेर BCCIने मान्य केली चूक, आता बदल होणार! पुढील ३१ दिवसांसाठी घेतला जाणार मोठा निर्णय
10
१५०० लोकसंख्येच्या गावात २७ हजार जन्मांची नोंद! यवतमाळमध्ये 'बर्थ सर्टिफिकेट'चा महाघोटाळा; मुंबई कनेक्शन उघड
11
द मुरुड फाईल्स! शिंदेसेना अन् काँग्रेसची पुन्हा एकदा हातमिळवणी, “आम्ही एकत्र आलोय ते...”
12
राखी सावंत पुन्हा रचणार स्वयंवर? सेलिब्रिटींना नाही तर राजकारण्यांना देणार आमंत्रण
13
उद्धव ठाकरेंची शिवसेना १२५ तर राज ठाकरेंची मनसे ९० जागांवर लढण्याची शक्यता; तिकडे भाजपाने शिंदेसेनेला ५० जागा ऑफर केल्या...
14
अदला बदली! माझं घर तुझं, तुझं घर माझं, होम-स्वॅपिंगचा नवा ट्रेंड; मोफत राहण्यासाठी भन्नाट 'जुगाड'
15
जिथे INS विक्रांतचा तळ, जवळच अणुकेंद्र, तिथे उडत उडत पोहोचला चिनी हेर, असा सापडला जाळ्यात
16
SMAT 2025 Final Live Streaming : पुण्याच्या मैदानात रंगणार फायनलचा थरार! ईशान किशन कॅप्टन्सीत इतिहास रचणार?
17
पोर्टफोलिओ करा स्ट्रॉन्ग! ऑटोपासून हेल्थकेअरपर्यंत 'हे' ५ शेअर्स देणार बंपर परतावा; पाहा सविस्तर विश्लेषण
18
७.५ कोटी प्रवाशांना लाभ, १६४ सेवा, भारतीयांसाठी ‘वंदे भारत’ वरदान; मेक इन इंडियाचा चमत्कार!
19
"युती झाली नसती तर शिंदेसेनेत..."; मंत्री प्रताप सरनाईक यांचं भाजपा महायुतीबाबत मोठं विधान
20
अति घाई, संकटात नेई! स्कूटी-कारची जोरदार धडक; Video पाहून तुम्हीच सांगा चूक नेमकी कोणाची?
Daily Top 2Weekly Top 5

बाजारात गर्दी आणि रेटारेटी कायम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2020 12:41 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : संचारबंदी व लॉक डाऊनचा कुठलाही परिणाम शहरी भागात दिसून येत नसल्याची स्थिती आहे. बाजारात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : संचारबंदी व लॉक डाऊनचा कुठलाही परिणाम शहरी भागात दिसून येत नसल्याची स्थिती आहे. बाजारात खरेदी करण्यासाठी दररोज सकाळी मोठ्या प्रमाणावर गर्दी होत आहे. गुरुवारी तर नंदुरबार व शहाद्यात खरेदीसाठी प्रचंड गर्दी झाली होती. मंगळ बाजारात तर रेटारेटी देखील होत होती. त्यामुळे कोरोना बाबत कुणीही गांभिर्याने घेत नसल्याची स्थिती आहे.आता प्रशासनाने विविध वस्तू विक्रीच्या दुकांनांना परवाणगी दिल्याने शुक्रवारपासून गर्दी आणखी वाढण्याची शक्यता वर्तविली जात आहे. त्यामुळे लॉकडाऊन आणि संचारबंदीचा उद्देशालाच हरताळ फासला जात असल्याची स्थिती आहे.जिल्ह्यात सर्वत्र संचारबंदीची स्थिती असतांना तसेच नागरिकांना एकाच ठिकाणी गर्दी न करण्यासंदर्भात सुचना असतांना देखील त्याचे पालन कुणीही करीत नसल्याची स्थिती आहे. बाजारात तर अक्षरश: रेटारेटी सुरू आहे. केवळ किराणा दुकानांवर मार्र्कींगची सुविधा सुरू करण्यात आली आहे. पोलीस व जिल्हा प्रशासनाने देखील शिथीलता आणल्याने नागरिक कुणाचेही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याची स्थिती आहे.बाजारात रेटारेटीगुरुवारी सकाळी बाजारात भाजीपाला, फळ व इतर वस्तू खरेदीसाठी अक्षरश: रेटारेटी झाली. सकाळी नऊ वाजेपासून १२ वाजेपर्यंत ही स्थिती कायम होती. नागरिकांना कोरोनाचे ना भय ना चिंता अशी स्थिती होती. बाजारात अनेक ठिकाणी अगदी एकमेकांना लागून भाजीपाला विक्रीच्या लॉरी लागल्या होत्या. त्यामुळे विशिष्ट अंतर ठेवून खरेदी करण्याच्या सुचनांचे कुणीही पालन करीत नसल्याची स्थिती आहे.किराणा दुकानांवर सतर्कताकिराणा दुकानांवर मात्र सतर्कता बाळण्यात येत असल्याचे चित्र आहे. अनेक लहान, मोठ्या किराणा दुकानदारांनी आपल्या दुकानांसमोर मार्कीग सिस्टिम करून त्याच अनुषंगाने ग्राहकांना किराणा वितरीत केले जात असल्याचे चित्र आहे. अशची पद्धत शिवसेनेतर्फे सुरू करण्यात आलेल्या भाजीपाला विक्री केंद्राच्या ठिकाणी देखील दिसून आली. भाजीपाला विक्रीच्या दुकानांवर देखील अशी पद्धत अवलंबविणे आवश्यक असतांना तसे कुठेही दिसून येत नाही.पोलिसांकडून शिथीलतासंचारबंदीच्या पहिल्या दिवशी पोलिसांकडून कडक धोरण अवलंबविण्यात आले होते. याबाबत तक्रारी झाल्यानंतर व नागरिकांमध्ये नाराजी व्यक्त केल्या गेल्यानंतर त्यात थोडी शिथीलता आणली गेली.अनेक ठिकाणी तर पोलीस कर्मचारीच दिसून येत नसल्याची स्थिती आहे. त्यामुळे नागरिक कुणीही आणि कुठेही सहजपणे फिरतांना दिसून येत आहेत. त्यामुळेच ठिकठिकाणी गर्दी होत असल्याचे चित्र आहे.

किराणा, भाजीपाला व पिठाची गिरणी : कुठलेही निर्बंध नाहीत.बेकरी, रेस्टॉरंट व हॉटेल्स : सकाळी ८ ते दुपारी २ वाजेपर्यंत.अंडी, चिकन, मटन व मासे विक्री : सकाळी ८ ते १२ व दुपारी ३ ते ६(केवळ मंगळ, बुध, शुक्र व रविवार)पशु उपचार व औषधी दुकाने : सकाळी ९ ते दुपारी २कृषी खते व खाद्य दुकाने : सकाळी ९ ते दुपारी ३दूध विक्री केंद्र : सकाळी ७ ते ९, सायंकाळी ६ ते ८ वाजेपर्यंत.स्वस्त धान्य दुकाने : नियमित वेळेत सुरू राहतील.इंटरनेट सुविधा पुरविणारे, पुरवठा साखळी गोडावून, गोदाम, वेअर हाऊस यांना निर्बंध नाहीत.

जीवनावश्यक वस्तूचा तुटवडा राहणार नाही याची काळजी घेण्यात आली आहे. नागरिकांनी आवश्यक तेवढीच खरेदी करावी. विनाकारण गर्दी करून प्रशासनाच्या आदेशाचे उल्लंघन करू नये. जीवनावश्यक वस्तू पुरेशा प्रमाणात आहेत. त्यामुळे नागरिकांनी संयम राखावा असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भारूड यांनी केले आहे.