शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
4
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
5
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
6
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
7
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
8
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
9
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
10
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
11
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
12
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
13
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
14
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
15
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
16
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
17
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
18
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
19
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
20
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
Daily Top 2Weekly Top 5

कांदा आणि पालेभाज्यांचे दर कोसळल्याने बाजार थंड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2020 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : १५ दिवसांपूर्वी चर्चेचा विषय असलेला कांदा मातीमोल दरात विक्री होण्यास सुरुवात झाली असून पालेभाज्या ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : १५ दिवसांपूर्वी चर्चेचा विषय असलेला कांदा मातीमोल दरात विक्री होण्यास सुरुवात झाली असून पालेभाज्या आणि इतर भाजीपाला उत्पादनांचे दर कोसळल्याने शेतकरी हतबल झाले आहेत़ ऐन हंगामात भाजीपाला उत्पादनावर मंदीची कुºहाड कोसळली आहे़ विशेष बाब म्हणजे नंदुरबार बाजारात १५ दिवसांपासून आवक कमी असून मातीमोल दरात भाजीपाला खरेदी सुरु आहे़नंदुरबार बाजार समितीच्या मार्केट यार्डात रविवार वगळता आठवड्याचे सहा दिवस भाजीपाला खरेदी विक्रीचे व्यवहार होतात़ डिसेंबर मध्यापर्यंत भाजीपाला आवक वाढूनही दरांमध्ये स्थिरता असल्याने शेतकरी खर्च काढून नफा मिळवत होते़ परंतू नव्या वर्षाच्या प्रारंभापासून कांदा दर कोसळल्यानंतर बटाटे, टमाटे, मेथी, कोथिंबीरसह पालेभाज्यांच्या दरांमध्ये मोठी घट आली आहे़ यातून किरकोळ बाजारात पालेभाज्या थेट पाच रुपये जुडीच्या दरात विकण्याची वेळ शेतकऱ्यांवर येऊन ठेपली आहे़ नंदुरबार सह साक्री तालुक्यातून येणाºया या भाजीपाला दरात झालेली घट शेतकऱ्यांच्या वार्षिक नियोजनासह वर्तमानातील आर्थिक स्थितीवर परिणामकारक ठरत असल्याचे दिसून येत आहे़ कांद्याने तब्बल दोन महिने बाजार गरम ठेवल्यानंतर अचानक दर कोसळल्याने शेतकºयांसह व्यापारीही नुकसानीच्या गर्तेत सापडल्याचे चित्र सध्या बाजारात आहे़ही स्थिती १५ दिवसांपर्यंत कायम राहणाºयाची शक्यता वर्तवण्यात येत आहे़ बाजारात नवीन कांदा रुजू झाल्यानंतर दरांमध्ये आणखी सुधारणा होणार असल्याचे सांगण्यात येत आहे़बाजारात दोन आठवड्यांपूर्वी ७ हजार ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने कांदा खरेदी करण्यात येत होती़ हे दर तब्बल तीन महिने स्थिर होते़ डिसेंबरच्या शेवटच्या आठवड्यापासून कांद्याच्या दरांमध्ये पड येत गेल्याने हे दर आजअखेरीस २ हजार ५०० ते ३ हजार रुपये प्रतिक्विंटल पर्यंत आले आहेत़ यातही केवळ चांगल्या प्रतीच्याच कांद्याला हे दर मिळत आहेत़ खराब कांदा १० ते १५ रुपये प्रतिकिलो दराने व्यापाºयांकडून खरेदी होत आहे़ यातून शेतकºयांचे नुकसान होत असल्याने त्यांनी कांदा आणणे बंद केले आहे़ परिणामी १० दिवसांपासून मार्केट यार्डात दर दिवशी २०० कट्टे कांदा येत आहे़ हा कांदा साठवून त्याची परराज्यात विक्री होत असल्याने किरकोळ बाजारातील दर मात्र चढेच असल्याचे दिसून आले आहे़ यातून शेतकरी आणि सामान्या दोघांनाही महागाईचा अनुभव कायम आहे़ येत्या काळात बाजारात नवीन कांदा येणार आहे़ हा कांदा विक्रीसाठी आल्यानंतर ही परवड थांबेल अशी अपेक्षा शेतकºयांकडून व्यक्त करण्यात येत आहे़