शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताचा मोठा निर्णय! पाकिस्तानातील १६ युट्यूब चॅनेल्सवर घातली बंदी, बघा संपूर्ण यादी
2
आपल्याच लोकांनी विश्वासघात केला! पहलगाम हल्ल्यात १५ काश्मिरींची ओळख पटली
3
पंतगराव कदम यांच्या कन्या भारती लाड यांचे निधन; पुण्यात घेतला अखेरचा श्वास
4
"हिंदी ऑडिशन क्रॅक करता येत नाहीयेत...", आस्ताद काळेने सांगितला अनुभव; म्हणाला...
5
अजब प्रेम की गजब कहाणी! आधी लैंगिक अत्याचाराच्या गुन्ह्यात अडकवलं; नंतर त्याच्यासोबत लग्न केलं
6
'माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही', योगेश कदम यांनी नितेश राणेंना सुनावलं
7
AI मुळे आयटी क्षेत्रातील नोकऱ्यांना किती धोका? TCS च्या जागतिक अधिकाऱ्याने स्पष्टच सांगितलं
8
"स्वतःच लोकांना मारता, तासभर एकही सैनिक तिथे गेला नाही"; आफ्रिदीने पहलगाम हल्ल्यासाठी सैन्याला धरले जबाबदार
9
Post Office च्या कमालीच्या पाच सेव्हिंग स्कीम्स; गुंतवणूक करा, मिळेल FD पेक्षा अधिक व्याज
10
पाकिस्तानला तुर्कीची रसद! बायरकतार ड्रोनसह सहा विमाने भरून शस्त्रास्त्रे कराचीला पोहोचली
11
Mumbai: BEST बसचे तिकीट दरात दुप्पटीने महागणार! साध्या आणि एससी बसच्या प्रवासासाठी किती पैसे मोजावे लागणार?
12
ऐकावे ते नवलच! एक व्यक्ती मृत असतानाही सोलापुरातील निवडणुकीत झाले १०० टक्के मतदान
13
"कपडे काढून बस अन्...", साजिद खानने अभिनेत्रीकडे केली होती विचित्र मागणी; म्हणाली...
14
"....नाहीतर मी मेलो असतो"; केदार शिंदेंच्या आयुष्यात स्वामी समर्थ कसे आले?
15
Astro Tips: अचूक उत्तर मिळण्यासाठी ज्योतिषांकडे एखादा प्रश्न घेऊन कधी जायला हवे? जाणून घ्या!
16
सुनील मित्तल यांच्यानंतर मुकेश अंबानीही पुढे आले; चीनच्या 'या' कंपनीच्या मागे का पडलेत हे दिग्गज?
17
दहशतवाद्यांचा, हल्ल्यांचा आकडा ! गेल्या ३२ वर्षांत २३,३८६ दहशतवादी मारले; ६४१३ जवान शहीद झाले
18
इलेक्ट्रिक दुचाकी वाहनांना आता ४० नाही तर फक्त ५ दिवसात मिळणार अनुदान; कसा करायचा अर्ज?
19
१ मेपासून बदलणार पैशांशी निगडीत हे नियम; खिशावर होणार थेट परिणाम
20
"माझा विनयभंग झाला असता", अभिनेत्रीने सांगितला धक्कादायक प्रसंग; धोनीला अवॉर्ड दिल्यानंतर...

...अनेक शाळकरी विद्यार्थी राबताहेत शेतीच्या कामावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:21 IST

गेल्या १५ दिवसांत पाऊस बऱ्यापैकी झाल्याने सातपुड्यात खरीप हंगामातील पेरणीचे काम आणि शेतात खत टाकण्याचे काम सुरू आहे. शेतकरीवर्ग ...

गेल्या १५ दिवसांत पाऊस बऱ्यापैकी झाल्याने सातपुड्यात खरीप हंगामातील पेरणीचे काम आणि शेतात खत टाकण्याचे काम सुरू आहे. शेतकरीवर्ग आपल्या कुटुंबासह शेतातील कामे करण्यासाठी सकाळीच जात आहे. घरच्या शेतीकामात मदत करण्यासाठी अनेक विद्यार्थीही सरसावले आहेत. ज्या वयात हातात पेन हवा, त्या वयात हातात शेती साहित्य घेऊन शेतातील अंगमेहनतीची कामे करण्याची दुर्दैवी वेळ या शाळकरी मुलांवर आली आहे. खरीप हंगामात पेरणी व इतर शेती मशागतीचे कामे एकाच वेळी शेतकरी करीत असल्याने शेतकऱ्यांना मजूर मिळणे कठीण जात आहे. अशा परिस्थितीत शेतकरी आपल्या कुटुंबातील सर्व सदस्यांसह शेतात राबताना दिसून येत आहेत. इतर कोणत्याही कामाला महत्त्व न देता सर्व जण शेतात राबत आहेत. काही पालक आपल्या पाल्यांना शेती काम करू न देता शिक्षणाकडे लक्ष देण्याचा सल्ला देतात. मात्र, सध्याच्या परिस्थितीमुळे विद्यार्थी शेतात रममाण होत असल्याचे दिसत आहे.

१५ जूनपासून नवीन सत्र, प्रत्यक्ष वर्ग नाहीच

या वर्षी तरी शाळा सुरू होऊन शाळेत जायला मिळेल, अशी अपेक्षा विद्यार्थ्यांना होती. मात्र, कोरोनाची तिसरी लाट येण्याचे संकेत देण्यात आल्याने या वर्षीही शाळेचे वर्ग प्रत्यक्ष भरणार की नाही, याबाबत संभ्रमावस्था कायम आहे.

या वर्षीचे शैक्षणिक सत्र १५ जूनपासून सुरू झाले आहे. साधारण जून महिन्यात विद्यार्थ्यांची शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी लगबग सुरू होते. पण, शाळा सुरू होण्याच्या हालचाली नसल्यामुळे ग्रामीण भागातील विद्यार्थी घरी रिकामे बसण्यापेक्षा वडिलांना शेतीकामात मदत करण्यात गुंतले आहेत.