शहरं
Join us  
Trending Stories
1
नोटांचा ढीग, 12 कोटी कॅश, किलोमध्ये सोनं-चांदी, मर्सिडीज कार अन्...! ईडीच्या छाप्यात सापडलं घबाड; काँग्रेसच्या आमदाराला अटक
2
भारताचे समर्थन करणारे माजी सुरक्षा सल्लागार जॉन बोल्टन यांच्या घरावर एफबीआयची धाड, प्रकरण काय?
3
अंधेरीतल्या परप्रांतीय युवकाची राज ठाकरेंना शिवीगाळ; व्हिडिओ व्हायरल, मनसे कार्यकर्ते संतापले
4
मुंबईत सरकारलाच मराठा आंदोलनात दंगल घडवायची आहे; मनोज जरांगे यांचा गंभीर आरोप
5
Pune Dog Attack Video: एकटं फिरायचं की नाही! अचानक 6-7 कुत्र्यांचा हल्ला; पिंपरीत कसा वाचला तरुण?
6
आशिया कप स्पर्धेवरुन संजय राऊतांनी पीएम मोदींना लिहिले पत्र; भारत- पाकिस्तान सामन्यावर विचारले प्रश्न
7
AC कोचच्या टॉयलेटमध्ये आढळला ५ वर्षीय मुलीचा मृतदेह; मुंबई-कुशीनगर एक्सप्रेसमधील खळबळजनक घटना
8
Ganesh Chaturthi 2025: गणेश चतुर्थीला 'या' पाच चुका प्रत्येक गणेश भक्ताने टाळल्याच पाहिजेत!
9
कोकणवासीयांना गणपती पावला! मुंबई-गोवा वंदे भारत एक्स्प्रेस आता १६ कोचने धावणार, मागणी पूर्ण
10
पाकिस्तानविरुद्ध कारवाई सुरूच, भारतीय हवाई हद्दीत कोणतेही विमान उड्डाण करू शकणार नाही; बंदी २४ सप्टेंबरपर्यंत वाढवली
11
अमेरिकन लोकांनाच फसवताहेत ट्रम्प! नियम बनवून आपलाच खजिना भरताहेत, ६ महिन्यांत केली ८६० कोटींची गुंतवणूक
12
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
13
मुंबईच्या रस्त्यावर नव्या लॅम्बोर्गिनीत दिसला रोहित शर्मा, किती आहे या Luxurious कारची किंमत? जाणून थक्क व्हाल!
14
Viral Video: 'ताल से ताल मिला' गाण्यावर शाळेतील सरांचा जबरदस्त डान्स, पाहून महिलाही झाल्या चकीत!
15
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
16
Pokerbaazi नं बंद केलं सर्व रियल मनी ऑनलाइन गेम्स; Nazara च्या शेअर्सची वाईट स्थिती
17
जुळ्या मुलांच्या जन्मानंतर अभिनेत्रीला पुन्हा होणार होते 'ट्विन्स', पण एकाचा झाला मृत्यू; भावुक पोस्ट
18
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
19
TikTok Ban: टिकटॉक खरंच भारतात पुन्हा सुरू होणार आहे का? केंद्र सरकारनेच दिलं उत्तर
20
Ganesh Chaturthi 2025: धर्मशास्त्रानुसार गणपती विसर्जनाचा योग्य दिवस कोणता? ते जाणून घ्या!

तळोद्यात वाळूअभावी अनेक बांधकामे रखडली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2018 12:34 IST

तळोदा तालुका : घरकुल व ‘पेसा’च्या निधीतील कामांनाही ब्रेक

तळोदा : वाळूअभावी तालुक्यातील घरकुलांबरोबर पेसाअंतर्गत सुरू असलेली शासकीय बांधकामे गेल्या अनेक महिन्यांपासून रखडली असून वाळू उपलब्ध होत नसल्याने बांधकामास मोठी अडचण निर्माण झाली आहे. जिल्हा प्रशासनाने वाळू उपलब्ध होण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची लाभार्थीकडून मागणी होत आहे.तळोदा तालुक्यात सध्या प्रधानमंत्री घरकूल योजना, रमाई घरकूल योजना, शबरी घरकूल योजना, इंदिरा आवास योजनेअंतर्गत हजारो घरकुलांची कामे सुरू आहेत. त्याचबरोबर पेसाअंतर्गत मिळणा:या निधीतून बांधकामे, शासकीय इमारतींची बांधकामे, पुलांची कामे अशी वेगवेगळी कामेदेखील सुरू आहेत. तथापि, ही कामे वाळूअभावी रेंगाळलेली आहेत. शिवाय या कामांवर कार्यरत असणा:या मजुरांचा रोजगारही बुडत आहे. परिणामी त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. तळोदा परिसरात सध्या दुष्काळी परिस्थिती असल्यामुळे मजुरांपुढे रोजगाराचा प्रश्न निर्माण झाला आहे. महाराष्ट्राच्या हद्दीत वाळूचा उपसा बंद असल्यामुळे घरकूल लाभार्थी शेजारच्या गुजरात राज्यातून रॉयल्टी भरून वाळू आणतात. तेव्हा येथील प्रशासन अशा वाहनांवर कारवाई करीत असते. ती कारवाईदेखील प्रचंड असल्यामुळे वाहनधारक भरू शकत नाही. त्यामुळे ठेकेदार वाळू आणूद देण्यास पुढे येत नाहीत. परिणामी लाभार्थी अक्षरश: वैतागले आहेत. वास्तविक येथील प्रशासनाकडे वाळू उपशासाठी संबंधितांकडून रॉयल्टीचा परवाना मागण्यात येतो तेव्हा त्यांना परवाना दिला जात नसल्याचे ठेकेदारांचे म्हणणे आहे. मात्र वाहनांवर तातडीने कारवाई केली जाते, असाही त्यांचा आरोप आहे. तळोदा तालुका हा गुजरात राज्याच्या सीमेवर आहे. त्यामुळे एक किलोमीटर अंतरावर असलेल्या हातोडा, सज्जीपूर, अंतुर्ली व वाका चाररस्ता अशा चार ठिकाणी वाळूची विक्री केली जात आहे. तेथून नंदुरबारमार्गे पिंपळनेर, नाशिक, मुंबई आदी ठिकाणी महाराष्ट्राच्या हद्दीत वाळूची सर्रास वाहतूक केली जात आहे. दररोज शेकडो डंपर वाळू वाहतूक करीत असल्याचे चित्र दिसून येते. अशी वस्तुस्थिती असताना महसूल प्रशासन, आरटीओ विभाग व पोलीस यंत्रणा त्यांच्यावर कारवाई करण्यास पुढे येत नाही. शिवाय त्यांना कोणत्याही प्रकारे अटकावदेखील करीत नाही. ते बिनधास्तपणे वाळूची वाहतूक करीत आहेत. या ठेकेदारांना प्रशासनाने परवाना दिलेला आहे का? असाही सवाल उपस्थित केला जात आहे. त्यांच्यावर कोणतीही दंडात्मक कारवाई केली जात नाही. मात्र तळोद्याकडे येणा:या वाळूच्या वाहनांवर सर्रास कारवाई केली जात आहे. जिल्हा प्रशासनाच्या अशा दुजाभावाच्या धोरणाबाबत लाभार्थीनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. एकीकडे केंद्र व राज्य शासनाने वेगवेगळ्या योजनेतील लाभार्थीची घरकुले वर्षभराच्या आत संबंधित लाभार्थीकडून पूर्ण करून घेण्याची ताकीद यंत्रणेला दिली आहे. मात्र वाळूअभावी घरांच्या बांधकामांना ब्रेक लागला आहे. अशा स्थितीत लाभार्थी कशाप्रकारे वेळेत घरांचे बांधकाम पूर्ण करू शकतील, असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला आहे. निदान महसूल प्रशासनाने तरी त्यांना रॉयल्टीची परवानगी द्यावी, अशी मागणी हे लाभार्थी व वाहनधारकांनी केली आहे. अन्यथा वाहनांवरील दंडात्मक कारवाई थांबविण्यात यावी, अशीही अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. वाळूप्रकरणी जिल्हा प्रशासनाने येथील महसूल प्रशासनाशी समन्वय साधून ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी आहे.