शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

मका पिकावर ओढावले ‘लष्करी’ अळीचे संकट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 12:18 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यात अद्यापही पूर्ण क्षमतेने पाऊस बरसलेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत़ यात मका पिकावर लष्करी ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यात अद्यापही पूर्ण क्षमतेने पाऊस बरसलेला नसल्याने शेतकरी चिंतेत आहेत़ यात मका पिकावर लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत असल्याने शेतकरी संकटात सापडले आहेत़ अळीला रोखण्यासाठी केलेले उपाय फोल ठरत असल्याने वाढत्या पिकांची दैना शेतकरी डोळ्याने अनुभवत आहेत़ जिल्ह्यात यंदा 31 हजार 928 हेक्टर क्षेत्रात मका पेरा होण्याचा अंदाज होता़ परंतू पावसाच्या दिवसांचे खंड वाढल्याने आजवर केवळ 26 हजार 861 हेक्टर क्षेत्रात मका पेरणी पूर्ण झाली आह़े अल्प वेळेत भरमसाठ वाढ असे गणित असलेल्या मकावर 15 दिवसात पाने खाणा:या अळ्यांचा प्रादुर्भाव वाढला होता़ यातून शेतातील येऊ घातलेले उत्पादन धोक्यात आल्याने शेतक:यांनी कृषी सहायक, पर्यवेक्षक आणि कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ञांना माहिती दिली होती़ त्यांच्याकडून गत 10 दिवसांपासून वाढत जाणारी लष्करी अळी घालवण्यासाठी प्रयत्न सुरु असले तरी अद्याप संपूर्ण यश मिळालेले नाही़ जिल्ह्यातील मका पिकांवर जागोजागी वाढत जाणा:या अळीला रोखण्यासाठी कृषी विभागाने तातडीने पावले उचलण्याची अपेक्षा शेतक:यांची आह़े पानानंतर पिकाचा ‘पोंगा’ खाऊन टाकणा:या अळीमुळे उत्पादनच येऊ शकत नसल्याने शेतक:यांची मेहनत वाया जाणार असल्याचे चित्र आह़े तूर्तास जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात अळीचा प्रादुर्भाव असल्याची माहिती देण्यात आली आह़े अळी घालवण्यासाठी विविध स्तरावर प्रयत्न सुरु असल्याची माहिती देण्यात येत आह़े 

लष्करी अळी या नावाने सर्वश्रुत असलेली ही अळी सर्वप्रथम जुलै 2018 मध्ये कर्नाटक राज्यात दिसून आली होती़ त्यांनंतर सप्टेंबर महिन्यात सोलापूर जिल्ह्यात आणि मग सहा महिन्यांनी संपूर्ण भारतभर ही अळी वाढीस लागली आह़े अळी निर्माण करणारे पतंग एका रात्रीत 100 किलोमीटर प्रवास करुन अंडी देत असल्याने अळ्यांचा प्रादुर्भाव कमी कालावधीत झाल्याचे समोर आले आह़े नंदुरबार तालुक्याच्या पूर्व भाग, नवापुर तालुक्यातील खांडबारा परिसर, प्रकाशा परिसर आणि धडगाव तालुक्याच्या दुर्गम भागार्पयत ही अळी पोहोचली आह़े पानावरच पतंगाने दिलेल्या अंडय़ातून बाहेर पडणारी अळी पानासह मक्याचा पोंगा खात असल्याचे तज्ञांना दिसून आले होत़े 

नंदुरबार तालुक्यात 4 हजार 522, नवापुर 5 हजार 936, शहादा 5 हजार 45, तळोदा 1 हजार 83, धडगाव 3 हजार 42 तर अक्कलकुवा तालुक्यात  6 हजार 45 हेक्टर क्षेत्रात मका लागवड पूर्ण झाली आह़े अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी तज्ञांनी अनेक पर्याय शेतक:यांना सुचवले आहेत़ यात प्रामुख्याने स्पोडोप्टेरा अळीचे पतंग पाहणीसाठी एकरी पाच कामगंध सापळे लावावे, एकरी 10 पक्षीथांबे उभारावे, सापळा पिक म्हणून नॅपियर गवत 3-4 ओळीत आजूबाजूने पेरावे, स्पोडोप्टेंरा अळी सापळा पिकावर आल्यास 5 टकके निंबोळी अर्क किवा 1500 पीपीएम निमार्कची फवारणी करावी, वेळेवर कोळपणी, खुरपणी करून शेत स्वच्छ ठेवावे, खत व्यवस्थापन करावे असे सुचवले आह़े अळ्या घालवण्यासाठी शेतक:यांनी लागवडीनंतर 30 दिवसात वाळू  आणि चुना यांचे मिश्रण तयार करुन पोंग्यात टाकावे.हाताने अळया, अंडी आणि अळीचे गुच्छांचा नाश करावा किंवा रॉकेलमिश्रित पाणी टाकावे.झपाटय़ाने वाढ होणा:या अळ्यांचा आजघडीस केवळ मकावर प्रादुर्भाव असल्याचे सांगण्यात आले आह़े परंतू ही अळी तृणधान्यांनाही मारक आह़े