शहरं
Join us  
Trending Stories
1
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
2
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
3
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
4
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
5
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
6
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
7
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
8
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
9
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
10
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
11
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
12
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
13
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
14
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
15
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
16
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
17
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
18
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
19
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
Daily Top 2Weekly Top 5

कोरोनामुळे माहेरची वाट आणि माहेरची साडी सध्या दूरच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:29 IST

लॉकडाऊन परिस्थितीत सध्या २५ लोकांचीच अनुमती लग्नकार्यासाठी शासनाने दिली आहे. अशा परिस्थितीतही अनेक ठिकाणी लग्न सोहळे पार पडत आहेत. ...

लॉकडाऊन परिस्थितीत सध्या २५ लोकांचीच अनुमती लग्नकार्यासाठी शासनाने दिली आहे. अशा परिस्थितीतही अनेक ठिकाणी लग्न सोहळे पार पडत आहेत. लग्न झाल्यावर मुलींना माहेरी न जाता सासरीच रममाण होण्याची वेळ सध्या निर्माण झाली आहे. शासनाने कोरोना साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन लावले असून, महामंडळाच्या बसेस तसेच खासगी वाहनांवरही बंदी आणल्याने लग्नानंतर महिन्याभरात दोन-तीनदा माहेरी जाणारी नवविवाहित सध्या सासरीच माहेरच्या आठवणींना उजाळा देत आहे.

ज्या विवाहितांच्या लग्नाला दहा- बारा वर्षे झाली आहेत, तेही वर्षभरापासून माहेरी जाण्यासाठी कासावीस होत आहेत. सध्या त्यांच्या मुलांच्या शाळांना सुट्टी असल्यामुळे माहेरी चार दिवस जन्मदात्या आई- वडिलांबरोबर राहून त्यांची सेवा करण्याची प्रत्येक मुलीची मनोमन इच्छा असते. मात्र, कोरोनाने माहेरची वाट दूर केली आहे. त्यामुळे नवविवाहित मुली आपल्या माहेरातील आई, वडील, भाऊ, बहीण व इतर मंडळींशी मोबाईलद्वारे आभासी भेट घडवून आणण्याचा प्रयत्न करीत आहेत. कधी - कधी व्हिडिओ कॉल करून माहेरच्या मंडळीशी गप्पा मारून जुन्या आठवणींना उजाळा देत आहेत. लग्न झाल्यावर प्रत्येक मुलीला आपल्या माहेरची आठवण येणे स्वाभाविक आहे; पण सध्या लॉकडाऊनमुळे माहेरच्या पाहुणचाराला सुद्धा त्यांना मुकावे लागत आहे. लग्न कार्याला पंचवीस लोकांचीच परवानगी असल्याने आप्तस्वकीयांच्या लग्नालाही त्यांना उपस्थिती दर्शविता येत नाही.

गेल्या वर्षभरापासून कोरोना महामारीमुळे लॉकडाऊन परिस्थिती निर्माण झाल्यामुळे माहेरच्या साडीपासूनही त्यांना वंचित राहावे लागत आहे. नवविवाहितेसाठी सासरचे घर नवीनच असते. त्यांना एकाकी वाटू नये म्हणून महिनाभरात दोन-तीन वेळा माहेरी आणले जाते किंवा आई-वडील भेटण्यासाठी जातात. मात्र, संचारबंदीमुळे नवविवाहितांचे माहेरी जाणे तूर्तास तरी बंद आहे. तसेच माहेरी एखाद्याचा मृत्यू झाल्यास अंत्यविधीसाठीही शासनाने मोजक्या लोकांची अट घातल्याने त्यांना तेथेही हजेरी लावता येत नाही. म्हणून प्रत्येक ग्रामीण तसेच शहरी भागातील नवविवाहितांना केव्हा लॉकडाऊन खुले होईल आणि केव्हा माहेरी जायला भेटेल याचे वेध लागले आहेत.