शहरं
Join us  
Trending Stories
1
"१०% लोकसंख्येचं सैन्यावर नियंत्रण...!", बिहारमध्ये मतदानापूर्वी राहुल गांधींचं वादग्रस्त विधान; भाजप म्हणाला, "आता जातीच्या आधारावर..."
2
टीव्ही, रेफ्रिजरेटर आणि मोबाईल फोन दुरुस्त करण्याचा त्रास संपला; या सरकारी योजनेमुळे लोकांचे हजारो रुपये वाचणार
3
पाकिस्तानच्या हरिस रौफवर दोन सामन्यांसाठी बंदी; ICC ची मोठी कारवाई, बुमराहासह सूर्यकुमारलाही ठोठावला दंड
4
पैलवान सिकंदर शेखला मोठा दिलासा! कोर्टाने जामीन मंजूर केला; सुप्रिया सुळेंनी मुख्यमंत्र्यांचे मानले आभार
5
"तळपायाची आग मस्तकात गेली आणि आता १०० टक्के खात्री पटली की..."; राज ठाकरेंचा निवडणूक जाहीर करताच पारा चढला
6
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
7
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
8
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
9
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
10
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
11
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
12
पलंगावर कुजलेल्या अवस्थेत पडलेले होत पती-पत्नीचे मृतदेह, पोटच्या मुलांनीच संपवले  
13
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
14
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
15
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
16
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...
17
Bilaspur Train Accident: एक जण डब्यात अडकल्याची माहिती, बाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू!
18
Divorce laws: 'या' देशांमध्ये घटस्फोटाचे नियम आहेत खूपच कडक; दोन ठिकाणी तर थेट बेकायदेशीर!
19
'दुधाचा अभिषेक घालायला हा काय देव आहे का?', रामराजेंचा रणजितसिंह निंबाळकरांवर निशाणा
20
Municipal Corporation Election: राज्यातील महापालिकांच्या निवडणुका कधीपर्यंत होणार? निवडणूक आयोगाने दिले उत्तर 

आपल्या वाट्याचे पाणी वापराबाबत महाराष्ट्राची उदासीनता

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 22, 2018 23:48 IST

तापी खोऱ्यातील पाणी देण्याबाबत गुजरात सरकार नकार देत असले तरी यापूर्वी उकाई आणि नर्मदेचे आरक्षित १६ टीएमसी पाणी उचलण्याबाबतही महाराष्ट्र शासनाची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे या १६ टीएमसी पाण्याच्या वापराबाबत योजनांची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.

नंदुरबार : एकीकडे तापी-पार-नर्मदा नद्याजोड प्रकल्पातील महाराष्ट्राच्या हिश्शाचे तापी खोऱ्यातील पाणी देण्याबाबत गुजरात सरकार नकार देत असले तरी यापूर्वी उकाई आणि नर्मदेचे आरक्षित १६ टीएमसी पाणी उचलण्याबाबतही महाराष्ट्र शासनाची उदासीनता दिसून येत आहे. त्यामुळे या १६ टीएमसी पाण्याच्या वापराबाबत योजनांची तत्काळ अंमलबजावणी व्हावी, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.तापी-पार-नर्मदा नद्याजोड प्रकल्पासाठी तापी खोºयातील महाराष्टÑाच्या हिश्शाचे गुजरातकडून ४३४ दशलक्ष घनमीटर पाणी मिळावे, अशी मागणी राज्य शासनाने केली आहे. मात्र त्याबाबत गुजरात सरकारने नकार दिला आहे. त्यामुळे या पाण्यासंदर्भात सध्या दोन्ही राज्यांतील वाद चव्हाट्यावर आला आहे. या पार्श्वभूमीवर उकाई आणि नर्मदेतील आरक्षित पाण्याबाबत जनतेने प्रश्न उपस्थित केला आहे. सरदार सरोवर प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी गुजरातमधील तापीवरील उकाई धरणातील पाच टीएमसी पाणी आरक्षित करण्यात आले आहे. हे पाणी उपसा योजनेद्वारे उचलण्यासाठी गेल्या १० वर्षात तीन वेळा सर्वेक्षण झाले आहे. मात्र प्रत्यक्षात योजनेची अंमलबजावणी झालेली नाही. याशिवाय सरदार सरोवर प्रकल्पातील ११ टीएमसी पाणी महाराष्टÑाच्या हिश्शाला आले आहे. हे पाणी उचलण्याबाबत गेल्या १० वर्षात सर्वेक्षण होऊन प्राथमिक योजना तयार करण्यात आली आहे. त्यासाठी महाराष्टÑ शासनाने सहा कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च केला आहे. जवळपास अडीच हजार कोटी रुपयांची ही योजना आकारास येणार आहे. मात्र अद्यापही योजनेच्या कामाला सुरुवात नाही. ही योजना तांत्रिक सर्वेक्षणाच्या वादातच अजून अडकून आहे.त्यामुळे एकूणच महाराष्टÑ शासनाच्या उदासीन धोरणामुळे पाणी वाटपातील करार वादातीत ठरत आहे. उकाई आणि नर्मदेची योजना अशीच लांबल्यास त्याबाबतदेखील भविष्यात वाद निर्माण होण्याची शक्यता असल्याने आरक्षणाच्या पाणी वापराबाबत तत्काळ निर्णय घेण्याची आवश्यकता आहे.