शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS प्रमुख मोहन भागवत यांना पकडा, माजी ATS अधिकाऱ्याचा हा दावा विशेष कोर्टाने फेटाळला
2
निर्जन रस्ता, अर्धवट जळालेला मृतदेह अन् रहस्यमय गुंता...; १३ वर्षीय मुलाच्या हत्येमागे ट्विस्ट काय?
3
मतांच्या चोरीबाबत भक्कम पुरावे, निवडणूक आयोगाला तोंड लपवायला जागा उरणार नाही: राहुल गांधी
4
'या' सरकारी बँकेत जमा करा ₹१,००,००० आणि मिळवा ₹१४,८८८ चं फिक्स व्याज; पाहा स्कीमच्या डिटेल्स
5
जम्मू-काश्मीर: कुलगाममध्ये चकमक, सुरक्षा दलांनी एका दहशतवाद्याला केले ठार
6
आजचे राशीभविष्य २ ऑगस्ट २०२५ : कामात आघाडीवर राहाल, कौटुंबिक सौख्य लाभेल!
7
भारत आता रशियाकडून तेल खरेदी करणार नाही? डोनाल्ड ट्रम्प यांच्या चेहऱ्यावर उमटले हास्य! म्हणाले...
8
बिहारमध्ये ६५ लाख मतदार वगळले; नोंदणी केलेल्या मतदारांची संख्या ७.२४ कोटींपर्यंत घटली
9
कोल्हापुरात हायकोर्टाचे १८ ऑगस्टपासून ‘सर्किट बेंच’; ४० वर्षांच्या प्रदीर्घ लढ्याला अखेर यश
10
मालेगाव स्फोटप्रकरणी सिमीच्या अँगलने तपास व्हायला हवा होता; विशेष न्यायालयाने केले स्पष्ट
11
‘एफ-३५’ फायटर खरेदी प्रस्ताव रोखला; भारताचे अमेरिकेला प्रत्युत्तर, लोकसभेत सरकारची माहिती
12
आठवडाभर लांबले; भारतावरील २५ टक्के टॅरिफची अंमलबजावणी ७ ऑगस्टपासून, पाकचा कर घटवला
13
जनता दल सेक्युलरचे माजी खासदार प्रज्वल रेवण्णा दोषी, आज होणार शिक्षा; मोलकरणीचा लढा यशस्वी
14
आक्रमक खासदारांना रोखण्यासाठी थेट कमांडो; लोकशाही इतिहासातील हा एक काळा दिवस: काँग्रेस
15
युतीबाबत कुठेही भाष्य नको, महापालिका निवडणूक...; राज ठाकरे यांच्या पदाधिकाऱ्यांना कानपिचक्या
16
ST महामंडळ पेट्रोल-डिझेल विकणार; केंद्र व राज्य सरकारचा भागीदारी प्रकल्प: प्रताप सरनाईक
17
एकनाथ शिंदेंच्या त्रासाला कंटाळून नरेश म्हस्के काँग्रेसमध्ये जाणार होते!; ठाकरे गटाचा दावा
18
परवाना परत करण्याचे कारण काय? गैरकृत्य होत असल्याचे अप्रत्यक्षपणे मान्य: अनिल परब
19
आता जगभरात व्यापार युद्धाचा भडका! अमेरिकेकडून ७० देशांसाठीही शुल्काची यादी जाहीर
20
कांजूर डम्पिंग ग्राउंड सुरूच राहणार; सुप्रीम कोर्टाचा मुंबई पालिकेला मोठा दिलासा

महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण व केंद्रीय भूजल प्राधिकरण कार्यालय स्थापन करावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 13, 2021 05:22 IST

या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्याची स्थापना होऊन जवळपास २२ वर्षे झाली आहेत. या कालावधीत विविध शासकीय कार्यालये ...

या निवेदनात म्हटले आहे की, नंदुरबार जिल्ह्याची स्थापना होऊन जवळपास २२ वर्षे झाली आहेत. या कालावधीत विविध शासकीय कार्यालये येथे स्थापन झाली आहेत. त्यामुळे जिल्हावासीयांची स्थानिक स्तरावरच महत्त्वाची कामे होऊ लागली आणि जिल्ह्याच्या विकासाला हातभार लागत आहे. परंतु जिल्ह्याच्या आरोग्याच्या बाबतीत दूषित पाण्याद्वारे होणारे आजार मोठ्या प्रमाणावर आहेत. त्यासाठी नंदुरबार जिल्ह्यात प्रदूषण नियंत्रण मंंडळ व केंद्रीय भूजल प्राधिकरण कार्यालयाची स्थापना होणे गरजेचे आहे. जिल्ह्यात शहरी व ग्रामीण भागात शुद्ध पाण्याचे प्रकल्प व्यवसाय मोठ्या प्रमाणावर सुरू आहेत. परंतु त्यांच्यावर नियंत्रण करणारी किंवा नोंदणी करणारी यंत्रणा कुठेही दिसून येत नाही. जलप्रक्रिया उद्योगांवर नियंत्रण व नोंदणी नसल्यामुळे पर्यायाने महसूलही मोठ्या प्रमाणावर बुडत आहे. तसेच जलप्रक्रियेवरील शुद्ध मानकांचे योग्यप्रमाणे पालन होत आहे किंवा नाही, याकडे लक्ष देणारी यंत्रणा नसल्यामुळे जिल्हाभरात मोठ्या प्रमाणावर दूषित पाण्यामुळे होणारे आजार लक्षणीय आहेत. त्यासाठी प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय भूजल प्राधिकरण कार्यालयाची नितांत गरज आहे.

जिल्ह्याची एकूण भौगोलिक परिस्थिती पाहता भूगर्भात मोठ्या प्रमाणावर मिथेन, गंधक, नायट्रोजन व इतर खनिजे मोठ्या प्रमाणावर आहेत. त्याचाही परिणाम मानवी शरीरावर होत असतो. त्याकरिता जलशुद्धीकरण प्रकल्पांवर अटी-शर्तींसह परवानगीकरीता नियंत्रण ठेवणारी संस्था नंदुरबार जिल्ह्यात कार्यान्वित होणे आवश्यक आहे. नंदुरबार जिल्ह्यातील जलप्रक्रिया, शुद्धीकरण प्रकल्प यांना अधिकार किंवा परवानगी प्रदान करणारी यंत्रणा जिल्ह्यातच असावी. इतर जिल्ह्यातून परवानगी किंवा नियंत्रण असणे प्रशासकीयदृष्ट्या योग्य नाही. या मागणीवर गांभीर्याने विचार करुन प्रदूषण नियंत्रण मंडळ व केंद्रीय भूजल प्राधिकरण कार्यालयाची जिल्हास्तरीय यंत्रणेचे कार्यालय स्थापन करावे, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे. राष्ट्रवादी वक्ता प्रशिक्षण विभागाचे जिल्हाध्यक्ष ॲड. प्रकाश भोई यांनी हे निवेदन दिले आहे.