शहरं
Join us  
Trending Stories
1
Manoj Jarange Patil: मनोज जरांगेंना मुंबई पोलिसांचे समन्स; १० नोव्हेंबरला तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहण्याचे निर्देश!
2
अरे देवा! मेट्रो स्टेशन तयार झालं पण नंतर कळालं उंचीच कमी, पुढं जे केलं ते पाहून थक्क व्हाल
3
स्टाँग रूमचे CCTV बंद, मध्यरात्री एका पिकअप व्हॅनची एन्ट्री; RJD च्या आरोपानंतर तपासाचे आदेश
4
चीनने वाढवली लष्करी ताकद! तिसरी विमानवाहू युद्धनौका 'फुजियान' तयार, अमेरिकेची चिंता वाढली
5
आधी ४५ कोटींचे मेट्रो स्टेशन बनवले, नंतर लक्षात आलं की उंची कमी झाली; मग...; हा जुगाड जाणून डोक्यावर हात माराल
6
कोण आहेत गजाला हाशमी? ज्यांनी अमेरिकेत रचला नवा इतिहास; भारताशी थेट कनेक्शन, जाणून घ्या
7
वीज चमकली की सुरू होतं काउंटडाउन!… काय आहे क्रिकेटच्या मैदानात क्वचित लागू होणारा '30:30 नियम'?
8
चॉकलेट की बिस्किट... आरोग्यासाठी जास्त धोकादायक काय? खाण्याआधी एकदा विचार कराच
9
बिहारमध्ये वाढलेल्या मतदानाचा अर्थ काय, कोणता फॅक्टरमुळे वाढलं मतदान? प्रशांत किशोरांनी मांडलं गणित
10
ब्रिस्बेनच्या मैदानात पावसाची बॅटिंग! टीम इंडियानं ऑस्ट्रेलियाविरुद्धची टी-२० मालिका २-१ अशी जिंकली
11
'...तर आम्ही शिंदेंच्या शिवसेनेसोबतची दोन जिल्ह्यात युती तोडू'; नारायण राणेंचा इशारा, तेलींबद्दल काय बोलले?
12
डॉक्टरच्या लॉकरमध्ये मिळाली AK-47 रायफल, जम्मू-काश्मीर पोलीसही चकित; नेमकं प्रकरण काय?
13
"भैया मत करो...", बाईकवर मागे बसलेल्या तरुणीसोबत रॅपिडो चालकाचं धक्कादायक कृत्य
14
Mumbai: कूपर रुग्णालयात मृत रुग्णाच्या नातेवाईकाकडून डॉक्टरांना मारहाण
15
"आधी कर्जबाजारी व्हायचं आणि मग पुन्हा कर्जमाफी मागायची"; राधाकृष्ण विखे पाटलांची शेतकऱ्यांवर आगपाखड
16
"पंतप्रधान मोदींनीही घातली होती टोपी, मी फोटो पाठवेन", मुस्लीम तुष्टीकरणाच्या आरोपांवर काय म्हणाले रेवंत रेड्डी?
17
लय मोठा विषय चाललाय! चीन, पाकिस्तान अन् बांगलादेशला एकाचवेळी झटका; भारतीय सैन्य काय करतंय?
18
Rishabh Pant: टीम इंडियाचं टेन्शन वाढलं, ऋषभ पंत पुन्हा जखमी, अर्ध्यातच मैदान सोडलं!
19
बिहार निवडणुकीनंतर भाजपाला मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष? बड्या नेत्याने दिले सूचक संकेत
20
स्टंटबाजी करणाऱ्या टवाळखोरामुळं युवती जीवाला मुकली; ११० च्या स्पीडनं उडवलं, दात तुटले अन्...

कोरोना संकट निवारणार्थ हिंदू सेवा साहाय्य समितीने केला महामृत्युंजय यज्ञ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 14, 2021 04:27 IST

गेल्या एक महिन्यापासून भारतभरामध्ये त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून नंदुरबार जिल्ह्यात दररोज या महामारीमुळे अनेकांना आपला जीव ...

गेल्या एक महिन्यापासून भारतभरामध्ये त्यातच महाराष्ट्रात कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून नंदुरबार जिल्ह्यात दररोज या महामारीमुळे अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. या कोरोना महामारीचे उच्चाटन व्हावे; त्याचबरोबर विश्वामध्ये सर्व लोकांना उत्तम आरोग्य लाभावे, विश्वात शांती नांदावी या विश्वव्यापक हेतूने आध्यात्मिक उपाय करणे आवश्यक आहे; कारण या संकटाचे निवारण ईश्वर आणि आध्यात्मिक उपायच करू शकतात; म्हणून आध्यात्मिक उपायार्थ महामृत्युंजय यज्ञाचे आयोजन करण्यात आले, असे हिंदू सेवा साहाय्य समितीचे डॉ. नरेंद्र पाटील यांनी म्हटले आहे.

भागवतकार रवींद्र पाठक गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली हे आयोजन करण्यात आले. यात प्रथम श्री गणेशपूजन, नंतर मातृका स्थापना, नवग्रह स्थापना तसेच श्री रुद्रस्थापना आणि पूजन करण्यात आले. महामारी संकट निवारण होऊन विश्वशांती स्थापित होवो; हा प्रधान संकल्प आधी करण्यात आला. नंतर संकट विनाश होण्यासाठीचे मंत्र, जप, हवन आणि पूजन करण्यात आले.

अधिवक्ता अनिल लोढा, अभय अग्रवाल, कपिल चौधरी, संतोष जैन यांच्या शुभ हस्ते सपत्निक पूजन झाले. यज्ञाचा संकल्प सुमित परदेशी यांनी केला. यावेळी हिंदू सेवा साहाय्य समितीचे धर्मसेवक डॉ. नरेंद्र पाटील, मयूर चौधरी, जितेंद्र मराठे, पंकज डाबी, आकाश गावित, आदी उपस्थित होते. कोरोनाचे सर्व नियम पाळत दोन दोन जोडपी बोलवून सामाजिक अंतर ठेवून हा यज्ञ झाला.