शहरं
Join us  
Trending Stories
1
सर्वपक्षीय शिष्टमंडळातील समावेशामुळे काँग्रेस नाराज, आता शशी थरूर स्पष्टच बोलले, म्हणाले...  
2
Mumbai Water Storage: मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तलावांमध्ये फक्त १८ टक्के पाणीसाठा शिल्लक
3
IPL 2025 Playoffs Race : आता MI सह ६ संघ शर्यतीत; कुणाचा पेपर सोपा कुणाला आहे सर्वाधिक धोका?
4
"आम्ही अणुबॉम्बच्या धमकीला भीक घालत नाही, पाकिस्तानला १०० किमी आत घुसून मारलं’’, अमित शाहांचा टोला
5
IPL 2025 : गत चॅम्पियन कोलकाता नाईट रायडर्स OUT! 'विराट' शक्ती प्रदर्शनासह RCB टॉपला; पण...
6
"पुतीन यांच्याशी थेट बोलणार, रशिया आणि युक्रेनमधील भीषण युद्ध थांबवणार’’, ट्रम्प यांचं मोठं विधान
7
"पाकिस्तान म्हणजे मानवतेला धोका", ओवेसींचे रोखठोक विधान; म्हणाले- 'आता भारताने..."
8
Pune: पुण्यात १५ वर्षीय मुलीला सर्पदंश, वेळेत उपचार न मिळाल्याने मृत्यू
9
तू स्वप्नातही...! राहुल द्रविडचा हिटमॅन रोहितसाठी खास मेसेज; मुंबई इंडियन्सनं शेअर केला व्हिडिओ
10
"आपल्याजवळ शक्ती असेल तर जग प्रेमाची भाषाही ऐकतं’’, सरसंघचालक मोहन भागवत यांचं मोठं विधान 
11
IPL 2025 : मोहीम फत्ते! 'दर्दी' चाहत्यांनी विराटसाठी व्हाइट जर्सीत केली गर्दी
12
बीसीसीआयकडून सचिन तेंडुलकरला मोठा सन्मान, मुंबई मुख्यालयात दिसणार 'एसआरटी १००' नावाचा बोर्ड रूम
13
ज्योती मल्होत्रा ​​कोण आहे? पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याच्या आरोपाखाली झाली अटक
14
दर्यापूरचे सराफा दुकान फोडणारी आंतरराज्यीय टोळी अटकेत
15
पाच बायका, शाहबाज शरीफ यांची लव्ह स्टोरी ऐका, चुलत बहिणीशी केलं पहिलं लग्न, त्यानंतर...
16
नातेवाईकावर अंत्यसंस्कार करून आंघोळीसाठी नदीत उरतले, बाप-लेकासह तिघांचा बुडून मृत्यू
17
अलिशान स्पोर्ट्स कारवरील स्क्रॅच बघून संतापला रोहित शर्मा; भावावर असा काढला राग (VIDEO)
18
INDvENG: श्रेयस अय्यरला टीम इंडियात न घेण्याचं BCCIने दिलं 'टुकार' कारण, ऐकून तुम्हालाही येईल राग
19
अनाथ मुलीला दत्तक घेऊन वाढवलं, तिनेच आईला संपवलं; इन्स्टाग्रामने उलगडलं हत्येचं गूढ
20
दिल्लीत 'आप'ला मोठा धक्का; १५ नगरसेवकांनी दिला राजीनामा, नवा पक्ष स्थापन करण्याची घोषणा

मोबाईलवरूनच झाला दोघांमध्ये प्रेमाचा संवाद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 7, 2021 04:37 IST

नंदूरबार- खून झालेली तरुणी व संशयित या दोघांमध्ये केवळ मोबाईलवरून प्रेम जुळल्याचे समोर आले आहे. विनयकुमार याला सीताकुमारीचा ...

नंदूरबार- खून झालेली तरुणी व संशयित या दोघांमध्ये केवळ मोबाईलवरून प्रेम जुळल्याचे समोर आले आहे. विनयकुमार याला सीताकुमारीचा मोबाईल नंबर मिळाला होता. त्यावरून त्याने तिला सहज फोन लावला असता, तिने त्याला चांगला प्रतिसाद दिला. त्यानंतर त्यांच्यात फोनवर बोलणे वाढले. त्यातून प्रेम झाले. तिने त्याच्याकडे सुरत येथे येण्यासाठी तगादा लावला. त्यासाठी त्याने २० हजार रुपये तिच्या बँक खात्यात टाकून सुरतला आणले. परंतु तेथे गेल्यावर विनयकुमार हा विवाहित असून, त्याला तीन मुलंदेखील असल्याचे समजल्यावर त्यांच्यात खटके उडू लागले. त्यामुळे सीताकुमारी त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावत होती.

असा केला खून

सीताकुमारीपासून कायमची सुटका मिळावी, या विचारात विनयकुमार राय होता. तिला गावी जाऊन राहा, नंतर लग्न करू असे सांगून गावी जाण्यासाठी भुसावळपर्यंत सुरत-भुसावळ पॅसेंजरने दोघे निघाले. या प्रवासात त्यांच्यात सारखे भांडण सुरू होते. त्यामुळे रात्री दहा वाजता पॅसेंजर ढेकवद स्थानकात आली असता तो खाली उतरला, त्याच्यामागे सीताकुमारीही उतरली. दोघे पायीच नंदूरबारच्या दिशेने निघाले. पोचाराबारी स्थानक पार केल्यानंतर ते बिलाडीमार्गे नंदूरबारकडेे येत होते. बिलाडी शिवारातच रेल्वे रुळाजवळ त्यांच्यात पुन्हा भांडण झाले. त्यावेळी संतापाच्या भरात विनयकुमार याने त्याच्या खिशात असलेल्या टेक्स्टाईल मिलमध्ये धागा कापण्याच्या ब्लेडने तिच्या गळ्यावर वार केले. सीताकुमारी मृत झाल्याचे लक्षात आल्यावर तो नंदूरबार स्थानकात आला आणि तेथून परत सुरत येथे पोहचला. नंतर काही झालेच नाही असे दाखवून तो नियमित आपल्या कामाला लागला.

यांनी केली कामगिरी...

खुनाच्या घटनेचा कुठलाही धागादोरा नसताना एलसीबीच्या पथकाने या घटनेचा उलगडा केला. ही कारवाई पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, अपर अधीक्षक विजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे निरीक्षक रवींद्र कळमकर, हवालदार प्रमोद सोनवणे, सुनील पाडवी, बापू बागुल, मनोज नाईक, किरण मोरे, यशोदीप ओगले, सतीश घुले यांच्या पथकाने केली.