शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
4
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
5
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
6
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
7
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
8
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
9
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
10
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
11
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
12
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
13
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
14
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
15
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
16
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
17
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
18
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
19
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
20
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
Daily Top 2Weekly Top 5

अवकाळीमुळे केळी व पपईचे रोगराईमुळे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 13, 2019 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राrाणपुरी : अवकाळीने उघडीप दिल्यानंतर आता त्याचे परीणाम समोर येत असून केळी वर करपा तर पपईवर ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राrाणपुरी : अवकाळीने उघडीप दिल्यानंतर आता त्याचे परीणाम समोर येत असून केळी वर करपा तर पपईवर डावणी, करपा आणि मोजखा या रोगांचा प्रादुर्भाव वाढत असल्याने शेतकरी पुन्हा संकटात सापडले आहेत़ यातून रब्बीचीही कामे सुरु करण्यात आल्याने शेतशिवारात शेतकरी आणि मजूर यांची वर्दळ वाढली आह़े शहादा तालुक्यातील  ब्राrाणपुरी सह परिसरात पपई, केळीची वार्षिक नियोजनानुसार शेतक:यांनी लागवड केली होती़ खरीप पिकांसोबत केळी आणि पपईचे संगोपन करत शेतक:यांनी मोठा खर्च केला होता़  परंतू अवकाळी पाऊस आणि सततच्या ढगाळ वातावरणामुळे दोन्ही फळ पिकांना ऊन कमी मिळाल्याने परिणाम झाला आह़े यातून पपईच्या झाडांवर झालेली फळधारणा ही अपेक्षेपेक्षा कमी असल्याने शेतक:यांना फटका बसला आह़े दोन आठवडय़ात ब:याच ठिकाणी शेतात पाणी साचल्याने ब:याच झाडांवर मर येऊन झाडांचे नुकसान झाले होत़े त्यात पुन्हा फळधारणा कमी होण्याची शक्यता असल्याने फवारणीला सुरुवात करण्यात आली आह़े  ब्राrाणपुरी, गोदीपूर, म्हसावद, अंबापुर, गणोर यासह मध्यप्रदेश सिमेलगतच्या गावांमध्ये केळीवर फवारणी करण्यात येत असल्याने शेतकरी कामांमध्ये व्यस्त असल्याचे चित्र आह़े अवकाळीमुळे मका ,सोयाबीन आणि ज्वारीचे नुकसान झाले आह़े हे नुकसान पचवून शेतकरी पुन्हा शेतशिवारात कामाला लागल्याचे चित्र या भागात आह़े गहू आणि हरभरा पिकांचे नियोजन करत शेतक:यांनी कामांना सुरुवात केल्याचे दृश्य ब्राrाणपुरी व परिसरातील गावांमध्ये दिसून येत आह़े येत्या काळात अवकाळीची शक्यता कमी असल्याने हरभरा पेरणीला सर्वाधिक वेग दिला जात आह़े शेतशिवारात ट्रॅक्टरच्या सहाय्याने मशागत करुन येत्या 15 दिवसात हरभरा आणि गहू पेरणी करणार असल्याचे शेतक:यांकडून सांगण्यात आल़े आह़े  दरम्यान एकीकडे खरीप पिकांचे नुकसान झाले असताना अतीवृष्टीमुळे जमिनीत वाढलेला ओलावा हरभरा आणि गहू पिकांना तारक ठरणार असल्याचा अंदाज शेतक:यांचा आह़े या पाश्र्वभूमीवर शहादा तालुक्यात यंदा गहू आणि हरभरा पिकाचे क्षेत्र दुपटीने वाढणार असल्याचे सांगण्यात येत आह़े शेतकरी निर्धारित क्षेत्रापेक्षा हाती असलेल्या पडीक क्षेत्रातही पीकपेरा करण्याच्या पवित्र्यात असल्याने हा अंदाज दृढ होत आह़े ब्राrाणपुरी भागात प्रशासनाने नियुक्त केलेल्या पथकाकडून पंचनामे पूर्ण करण्यात आले आहेत़ परंतू या पंचनाम्यात फळबागांवरील कीड रोग आणि करपा याचा समावेश करण्यासाठी शेतकरी पथकांना माहिती देत आहेत़  करपा रोगाचे निदान झाल्यानंतर शेतक:यांनी रासायनिक औषधींची फवारणी करण्यास सुरुवात केली आह़े काही ठिकाणी पपईवर चांगल्या दर्जाचे फळ आल्याने ते टिकवून ठेवण्यासाठी शेतकरी प्रयत्नशील आहेत़ ब्राrाणपुरी परिसरातील केळी उत्पादकांना अवकाळीचा सर्वाधिक फटका बसला आह़े केळीची झाडे उन्मळून पडण्यासह अनेक ठिकाणी केळीचे घड तुटल्याने नुकसान झाले होत़े करपामुळे या नुकसानीत वाढ होत असल्याने शेतकरी उपाययोजना करण्यावर भर देत आहेत़