शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

कोरोनामुळे लांबले पाणवठे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 20, 2021 04:29 IST

नंदुरबार : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत विस्तारलेल्या वनक्षेत्रात वनविभाग दरवर्षी कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची निर्मिती करते. परंतु गेल्या वर्षातील कोरोनामुळे ...

नंदुरबार : जिल्ह्यातील सहा तालुक्यांत विस्तारलेल्या वनक्षेत्रात वनविभाग दरवर्षी कृत्रिम आणि नैसर्गिक पाणवठ्यांची निर्मिती करते. परंतु गेल्या वर्षातील कोरोनामुळे शासनाने निधीच न दिल्याने वनक्षेत्रातील पाणवठे होऊ शकलेले नाहीत. यंदाही निधी नसल्याने पाणवठे निर्मितीची प्रक्रिया लांबणार आहे.

साधारण ३४ हजार चाैरस किलोमीटर क्षेत्रात वनक्षेत्र विस्तारले आहे. यात बिबट्या, काळवीट, अस्वल, लांडगे, कोल्हे, ससे, मोर यासह विविध प्रकारचे वन्यप्राण्यांचा रहिवास आहे. या वन्यप्राण्यांच्या सोयीसाठी वनविभागाकडून त्या-त्या वनक्षेत्रात कृत्रिम पाणवठे तयार करण्यात येतात. त्यातून उन्हाळ्यात वन्यप्राणी हे वनक्षेत्रातच थांबून राहत होते. परंतु गेल्या वर्षात पाणवठे निर्मितीची प्रक्रियाच झालेली नसल्याने वन्यप्राणी पाण्याच्या शोधात बाहेर पडत आहेत. नंदुरबार जिल्ह्यातील अक्कलकुवा, तळोदा मेवासी, शहादा व नंदूरबार वनक्षेत्रातील बहुतांश नैसर्गिक पाणवठे हे मानवी वस्त्यांच्या जवळ आहेत. त्यातून वन्यप्राणी त्या पाणवठ्याकडे जाताना शेतशिवाराचा आधार घेत असल्याचे समोर आले होते. यातून जिल्ह्यात वेळोवेळी शेतशिवारात हिंस्त्र व इतर वन्यप्राणी आढळून येत असल्याच्या घटना समोर येत आहेत. यातून यंदा पाणवठ्यांसाठी निधी नसल्याने वन्यप्राण्यांच्या जलस्रोतांचे काय, असाही प्रश्न उपस्थित होते. वनविभागाने याबाबत राज्यशासनाला पाठपुरावा केला असल्याची माहिती आहे. दरम्यान, कोविडमुळे केवळ वन्यप्राण्यांचे पाणवठेच नव्हे तर इतर कामांनाही खीळ बसल्याची माहिती आहे.

जुने पाणवठे शोधणार

नवीन पाणवठ्यांसाठी निधी नसल्याने वनविभागाचे कर्मचारी उपाययोजना म्हणून जुन्या पाणवठ्यांचे जिओ टॅगिंग पाहून त्यांची स्थिती जाणून घेणार आहेत. त्यानुसार त्यांची दुरुस्ती होण्याची शक्यता आहे.