शहरं
Join us  
Trending Stories
1
२६/११ चा उल्लेख करत प्रियंका गांधींचे अमित शाहांवर टीकास्त्र; म्हणाल्या, तेव्हा मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी...
2
Pakistan Water : पाकिस्तानमध्ये पाण्याचं संकट वाढलं! भारतासोबतचा संघर्ष महागात पडला
3
शेअर बाजारात NSDL ची होणार CDSL शी टक्कर; ग्रे मार्केटमध्ये काय संकेत, किती गुंतवणूक करावी लागणार?
4
सरकारी कर्मचाऱ्यांसाठी सोशल मीडिया वापराबाबत नवे नियम; उल्लंघन केल्यास नोकरी गमवाल!
5
प्रियंका गांधी म्हणाल्या, 'मी शिवस्तोत्र म्हणून आलेय'; लोकसभेत नेमकं काय घडलं?
6
३ दिवसांच्या घसरणीला ब्रेक, टाटा-रिलायन्ससह 'या' शेअर्समुळे गुंतवणूकदारांना दिलासा! तुमच्या पोर्टफोलिओचं काय झालं?
7
आमिर खानने घेतला मोठा निर्णय, अभिनेत्याने सुरू केलं 'जनता का थिएटर'
8
"ऑपरेशन महादेव कालच का झालं?"; अखिलेश यादवांनी सरकारला घेरलं, पुलवामा हल्ल्यातील 'त्या' गाडीबद्दल काय बोलले?
9
शैलेश जेजुरीकर बनले 'या' अमेरिकन कंपनीचे CEO! मायक्रोसॉफ्ट, गुगलनंतर आता P&G लाही मिळणार 'भारतीय' नेतृत्व!
10
Tripti Dimri : "मी ३० वर्षांपासून गप्प...", तृप्ती डिमरीने खूप काही केलंय सहन, का नाही उठवला आवाज?
11
Russia Ukraine War: "हल्ले थांबवा अन्यथा..."; रशिया-युक्रेन युद्धादरम्यान डोनाल्ड ट्रम्पकडून पुतिन यांना इशारा!
12
BCCI च्या ऑफिसमध्ये चोरी; सुरक्षा रक्षकाने लाखोंच्या IPL जर्सी चोरुन हरयाणात विकल्या
13
"कलंकित मंत्र्यांचा राजीनामा न घेणाऱ्या सरकारने गोमूत्र शिंपडून त्यांना पवित्र करून घ्यावे", विजय वडेट्टीवार यांची टीका
14
चीनमध्ये Apple ला मोठा झटका! एका रिटेल स्टोअरवर लावले टाळे, पण भारतासाठी आहे 'खुशखबर'!
15
हिंजवडीतील रस्ते अपुरे का पडू लागले? यावर काही उपाय आहेत का, की काहीच नाहीत... करणार कोण?
16
Asia Cup 2025 : रिषभ पंतच्या जागी अकोल्याच्या पठ्ठ्याची होऊ शकते टीम इंडियात एन्ट्री
17
हर्षवर्धनचा नवा कारनामा; Reliance च्या नावाने उघडल्या ५ बनावट कंपन्या, तपास अधिकारी चक्रावले
18
Priyanka Gandhi : "लोक सरकारवर विश्वास ठेवून पहलगामला गेले, पण सरकारने लोकांना देवाच्या भरवश्यावर सोडलं"
19
'तुमचा वेळ वाया घालवू नका, काळजी घ्या'; आईवडिलांसाठी चिठ्ठी अन् पुण्यात इंजिनिअर तरुणाने स्वतःला संपवले
20
समुद्राचे पाणी पिण्यायोग्य होणार; मुंबई महानगरपालिकेने हाती घेतला महत्त्वाचा प्रकल्प!

चांदसैली घाटात भाविकांचे वाहन पलटी लोकमत न्यूज नेटवर्क

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2018 10:52 IST

कोठार :  रंजनपूर येथील संत गुलाम बाबांच्या  दिंडीत सहभागी होण्यासाठी येणा:या भाविकांची जीप चांदसैली घाटात पलटी झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. यात बारा जण जखमी झाले असून त्यातील चार जण गंभीर जखमी असून त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव कुंडल येथील ...

कोठार :  रंजनपूर येथील संत गुलाम बाबांच्या  दिंडीत सहभागी होण्यासाठी येणा:या भाविकांची जीप चांदसैली घाटात पलटी झाल्याची घटना सोमवारी दुपारी तीन वाजेच्या सुमारास घडली. यात बारा जण जखमी झाले असून त्यातील चार जण गंभीर जखमी असून त्यांना नंदुरबार जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, धडगाव कुंडल येथील भाविक शेवटच्या श्रावण सोमवारनिमित्त संत गुलाम महाराज यांच्या चौपळे येथून निघणा:या दिंडीत सहभागी होण्यासाठी जीप गाडीने निघाले होते. त्यांची गाडी कोठार ते चांदसैली दरम्यानच्या घाटात असताना चालकाला रस्ताच्या अंदाज न आल्याने गडावरील ताबा सुटून ती पलटी झाली. या अपघात हुण्या सोमा पाडवी (रा.खांडबारा), आहलीबाई रावला पाडवी, जात्र्या फुल्या पाडवी, गुलाब रावला पाडवी हे गंभीर जखमी झाले. जखमींना नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी हलविण्यात आले आहे. तर या अपघातातील अन्य जखमीमध्ये भागिराम बासरा पाडवी(55), भगतसिंग उस:या पाडवी(56), किशोर खेमा पाडवी(11), रावल्या तेज्या पाडवी(चालक) (रा.सर्व कुंडल) प्रताप गिम्ब्या वळवी(30), खेमजी पुण्या वळवी(32) (रा.कात्री), किसन कामा वसावे(30),गोवल्या बाया पाडवी(60) (रा.खांडबारा) यांचा समावेश आह़े यांना तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. भागिराम बासरा पाडवी यांच्या फिर्यादीवरुन जीप चालकाविरुद्ध तळोदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल जगलसिंग वसावे व पोलीस कॉन्स्टेबल तारसिंग वसावे हे करीत आहेत.तळोदा ते धडगाव दरम्यान चांदसैली घाटमार्गे मोठय़ा प्रमाणात जीवघेणी अवैध प्रवासी वाहतूक केली जाते. गाडीच्या टपावर 8 ते 10  प्रवासी बसलेले असतात. तर गाडीच्या आजूबाजूला देखील अनेक प्रवाशी लटकलेले असतात. वाहनातसुध्दा अनेक प्रवाशी शेळ्या मेंढय़ा सारखे कोंबलेले असतात. याकडे पोलीस यंत्रणेकडून कानाडोळा केला जात असल्याचा आरोप करण्यात येत      आह़े