शहरं
Join us  
Trending Stories
1
नागपुरात भाजपमध्ये उमेदवारीसाठी तोबा गर्दी, मुलाखतीच्या वेळापत्रकात करावा लागला बदल
2
पृथ्वीचं 'ग्रहण' सुटलं! दोन वेळा 'अनसोल्ड' राहिल्यावर शेवटी जुन्या मालकानेच दाखवला भरवसा
3
Aadhaar New Rules : आधार फेस ऑथेंटिकेशन म्हणजे काय? केंद्र सरकार नवीन नियम लागू करणार
4
"पंतप्रधान मोदींना दोन गोष्टींचा अत्यंत तिरस्कार, एक गांधींचे विचार अन् दुसरे...!"; राहुल गांधींचा हल्लाबोल
5
पतसंस्था अध्यक्षाला ग्राहक आयोगाने सुनावली दोन वर्षांच्या कारावास, दंडाची शिक्षा
6
विरार हत्याकांड प्रकरण: कुख्यात गुंड सुभाषसिंह ठाकूर याला ७ दिवसांची पोलीस कोठडी
7
मुंबईकर सरफराज खानला मोठा दिलासा! IPL च्या आगामी हंगामात पगारवाढीसह चेन्नईकडून उतरणार मैदानात
8
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
9
IPL Auction 2026 : काव्या मारन vs आकाश अंबानी यांच्यात जुगलबंदी; त्यात अनकॅप्ड खेळाडू झाला 'करोडपती'
10
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
11
IPL 2026 Auction: 'त्या' खेळाडूविषयी मनात आदरच..; आकाश अंबानींनी सांगितली पडद्यामागची गोष्ट
12
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
13
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
14
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
15
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
16
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
17
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
18
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
19
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
Daily Top 2Weekly Top 5

लोकसभा व विधानसभा स्वबळावरच लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 12:00 IST

सेनानेते संजय राऊत : प्रचाराची सुरुवात नंदुरबारातून करण्याचा मानस

नंदुरबार : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याचा पुनरुच्चार सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी नंदुरबार येथे पत्रकारांशी बोलतांना केला. आगामी प्रचाराची सुरुवात देखील नंदुरबारातूनच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नंदुरबार व अक्कलकुवा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले.कार्यकर्ता मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत गुरुवारी नंदुरबारात आले होते. सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. ते म्हणाले, पक्षाच्या दृष्टीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्थानिक पातळीवर लढल्या जातील. निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनेच आपण राज्यभर दौरे करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात नंदुरबारातूनच प्रचाराची सुरुवात करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी नंदुरबार किंवा अक्कलकुवा येथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जाहीर मेळावा घेण्यात येणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. काँग्रेसला नंदुरबार लकी होते. निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात, योजनांची सुरुवात ते येथूनच करीत होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी देखील नंदुरबारला पसंती देत शिवसेनेसाठी देखील नंदुरबार लकी राहील असा आशावाद व्यक्त केला आहे. आतार्पयत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीने आदिवासींना गृहीत धरूनच राजकारण केले आहे. परंतु आता दुसरी पिढी ही शिवसेनेकडे वळत आहे. त्यांनाही त्यांच्या हक्काची, अधिकाराची जाणीव झाली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी युती करण्याबाबतचे सुतोवाच केल्याचे विचारले असता ते त्यांनाच माहिती. 2014 मध्ये का सुचले नाही. युती तोडण्याचा पुढाकार त्यांचाच होता. आता शिवसेना 2014 प्रमाणेच स्वबळावर आणि लोकसभा व विधानसभेच्या संपुर्ण जागांवर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयोध्येचा प्रश्न न्यायालयात सुटणारा नाही. केंद्र शासनाने अध्यादेश काढून हा प्रश्न सोडवावा अशी आमची मागणी आहे. आता प्रत्येक बाबतीत न्यायालयांमध्ये जाण्याचा प्रघातच पडला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही. शासनानेच काय ते ठरवून राममंदीराचा प्रश्न सोडावा असेही खासदार राऊत यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी केलेले विधान हे स्थानिक परिस्थितीला धरून योग्यच होते असेही त्यांनी स्पष्ट करीत पाडवी यांची पाठराखन केली. यावेळी सेना नेते संजय उकिरडे, जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, आमशा पाडवी आदी उपस्थित होते.