शहरं
Join us  
Trending Stories
1
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
2
अग्नितांडव! दिल्लीतील रुग्णालयाला भीषण आग; एकाचा मृत्यू, काचा फोडून रुग्णांना वाचवलं
3
ओलाची लाली उतरू लागली! ईलेक्ट्रीक मोटरसायकल आणली तरी खरेदीदार मिळेनात, जुलैची विक्री पहाल तर...
4
जगदीप धनखड बेपत्ता? उपराष्ट्रपती पदाचा राजीनामा दिल्यापासून संपर्कात नाहीत; विरोधकांनी सरकारला घेरले
5
एका घरात दोनच 'लाडक्या बहिणी', इतरांचा होणार पत्ता कट; सरकारच्या नियमानं महिला धास्तावल्या
6
मायेची सावली! भावासाठी बहीण झाली ढाल; किडनी डोनेट करुन दिलं जीवदान, रक्षाबंधन झालं खास
7
मर्चंट नेव्ही अधिकाऱ्याच्या पत्नीचा लग्नानंतर ६ महिन्यातच मृत्यू; प्रकरणात आला नवा ट्विस्ट
8
ऑपरेशन सिंदूरवेळी एकट्या S-400 ने पाकिस्तानची एवढी विमाने पाडली, हवाईदलप्रमुखांचा मोठा गौप्यस्फोट
9
Salim Pistol: बेकायदेशीर शस्त्रांचा पुरवठा करणाऱ्या 'सलीम पिस्तूल'ला नेपाळमधून अटक!
10
PIB Fact Check: रजिस्टर्ड पोस्ट सेवा बंद करण्यात आलीये का? पाहा व्हायरल दाव्यामागील सत्य
11
टीम इंडियाचा कॅप्टन गिल इथंही टॉपला! क्रिकेटच्या पंढरीत घातलेली जर्सी लिलावात ठरली लाख मोलाची
12
Video - २ रुपयांची राखी १०० रुपयांना; दुकानदाराने सांगितला व्यवसायामागच्या 'चालूगिरी'चा खेळ
13
Monsoon Travel : कुर्ग की मुन्नार; पावसाळी पिकनिकसाठी कोणतं ठिकाण ठरेल बेस्ट?
14
अमेरिका १, सिंगापुर २, नॉर्वे ३... ही यादी पाहून डोनाल्ड ट्रम्प डोकं पकडतील, कोणती आहे यादी? जाणून घ्या
15
मध्यमवर्गीयांना गरिबीच्या खाईत लोटतात या पाच सवयी, त्वरित न बदलल्यास होईल पश्चाताप
16
शरणूसोबत 'मस्साजोग' करायचं होतं; सोबत ट्रिमर, साडी, ब्लाऊज अन् कंडोम होतं, सत्य समजताच पोलीस चक्रावले
17
काश्मीर मुद्द्यावर पाकिस्तानचं पुन्हा रडगाणं; आता म्हणतायत "अमेरिका किंवा इतर कोणत्याही देशाची मध्यस्थी चालेल पण..."  
18
रेल्वेची राऊंड ट्रिप योजना...! तिकिटांवर २० टक्के डिस्काऊंट देणार, अटी एवढ्या की...; एवढे करून मिळाले जरी...
19
ICC नं टीम इंडियाला दिली होती वॉर्निंग; तरीही कोच गंभीर राहिला 'खंबीर', अन्... पडद्यामागची गोष्ट
20
अतूट नातं! १७ वर्षांपासून 'या' अभिनेत्याला राखी बांधतेय ऐश्वर्या राय; प्रेमाने मारते 'अशी' हाक

लोकसभा व विधानसभा स्वबळावरच लढणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 28, 2018 12:00 IST

सेनानेते संजय राऊत : प्रचाराची सुरुवात नंदुरबारातून करण्याचा मानस

नंदुरबार : आगामी लोकसभा व विधानसभा निवडणुका शिवसेना स्वबळावरच लढणार असल्याचा पुनरुच्चार सेनेचे नेते खासदार संजय राऊत यांनी नंदुरबार येथे पत्रकारांशी बोलतांना केला. आगामी प्रचाराची सुरुवात देखील नंदुरबारातूनच करणार असल्याचेही त्यांनी सांगितले. दरम्यान, नंदुरबार व अक्कलकुवा येथे झालेल्या कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी निवडणुकांसाठी तयारीला लागण्याचे आवाहन केले.कार्यकर्ता मेळाव्यासाठी खासदार संजय राऊत गुरुवारी नंदुरबारात आले होते. सायंकाळी त्यांनी पत्रकार परिषद घेवून माहिती दिली. ते म्हणाले, पक्षाच्या दृष्टीने आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका महत्त्वाच्या आहेत. जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुका स्थानिक पातळीवर लढल्या जातील. निवडणुकांच्या तयारीच्या दृष्टीनेच आपण राज्यभर दौरे करीत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. येत्या काळात नंदुरबारातूनच प्रचाराची सुरुवात करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. त्यासाठी नंदुरबार किंवा अक्कलकुवा येथे पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांचा जाहीर मेळावा घेण्यात येणार असल्याचे खासदार राऊत यांनी सांगितले. काँग्रेसला नंदुरबार लकी होते. निवडणुकांच्या प्रचाराची सुरुवात, योजनांची सुरुवात ते येथूनच करीत होते. त्यामुळे आता उद्धव ठाकरे यांनी देखील नंदुरबारला पसंती देत शिवसेनेसाठी देखील नंदुरबार लकी राहील असा आशावाद व्यक्त केला आहे. आतार्पयत काँग्रेस, भाजप, राष्ट्रवादीने आदिवासींना गृहीत धरूनच राजकारण केले आहे. परंतु आता दुसरी पिढी ही शिवसेनेकडे वळत आहे. त्यांनाही त्यांच्या हक्काची, अधिकाराची जाणीव झाली असल्याचे त्यांनी सांगितले. भाजपचे प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब दानवे यांनी युती करण्याबाबतचे सुतोवाच केल्याचे विचारले असता ते त्यांनाच माहिती. 2014 मध्ये का सुचले नाही. युती तोडण्याचा पुढाकार त्यांचाच होता. आता शिवसेना 2014 प्रमाणेच स्वबळावर आणि लोकसभा व विधानसभेच्या संपुर्ण जागांवर लढणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. आयोध्येचा प्रश्न न्यायालयात सुटणारा नाही. केंद्र शासनाने अध्यादेश काढून हा प्रश्न सोडवावा अशी आमची मागणी आहे. आता प्रत्येक बाबतीत न्यायालयांमध्ये जाण्याचा प्रघातच पडला आहे. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशाची गरज नाही. शासनानेच काय ते ठरवून राममंदीराचा प्रश्न सोडावा असेही खासदार राऊत यांनी सांगितले. मराठा क्रांती मोर्चाच्या आंदोलनावेळी जिल्हाप्रमुख आमशा पाडवी यांनी केलेले विधान हे स्थानिक परिस्थितीला धरून योग्यच होते असेही त्यांनी स्पष्ट करीत पाडवी यांची पाठराखन केली. यावेळी सेना नेते संजय उकिरडे, जिल्हाप्रमुख डॉ.विक्रांत मोरे, आमशा पाडवी आदी उपस्थित होते.