शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
3
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
4
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
5
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
6
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
7
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
8
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
9
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
10
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
11
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
12
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
13
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
14
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
15
हा सदोष मनुष्यवधच!
16
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
17
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
18
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
19
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु

लॉकडाऊनने केल्या पपईच्या बागा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणू संकट आणि वाढत्या तापमानाचा फटका अशा दुहेरी संकटात नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणू संकट आणि वाढत्या तापमानाचा फटका अशा दुहेरी संकटात नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी सापडला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी येत नाही तर वाढत्या तापमानात पपईची फळे पिवळी पडत असल्याने शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त होत आहेत. केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.नंदुरबार जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जाते. यावर्षी पपईचा हंगाम सुरू झाला आणि कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. कोरोनाच्या धास्तीने व्यापारी आले नाहीत आणि जे आले त्यांच्याकडून मातीमोल भावात पपईची मागणी केली जात आहे. परिणामी दुष्काळात तेरावा महिना अशी गत बळीराजाची झाली आहे. जिल्ह्यात तापमानात अचानक वाढ झाली आहे. मे हिटचा तडाखा जाणवत असून तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्यावर आहे. तापमानाचा पारा दुपारी १२ ते चार वाजेदरम्यान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस असतो. त्याचा परिणाम पपईच्या फळावर झाला असून ते झाडावर खराब होऊन पिवळी पडत आसल्याने ते काढून फेकल्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे नाही. अनेक शेतकºयांनी पपईला योग्य भाव मिळत नसल्याने शेतातच ती खराब होत असल्याने नाईलाजाने पपईच्या शेतात रोटावेटर व कल्टीवेटर मारून पपईचे पिक शेतातून उखडून फेकले आहे.पपई पिकाचा शासनाने फळपीक योजनेत समावेश केला नसल्याने यास विम्याचे संरक्षण नाही. त्याचप्रमाणे हमीभाव नाही यामुळे व्यापारी प्रत्येक हंगामात शेतकºयांची दराबाबत फसवणूक करत असतात. दरवर्षी शेतकरी व व्यापारी यांच्यात पपईच्या दरावरून मोठा संघर्ष होतो. असे असतानाही जिल्ह्यात दरवर्षी पपई लागवड वाढत चालली आहे. नगदी पीक म्हणून शेतकºयांनी पपईच्या लागवडीवर भर दिला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईचे उत्पादन घेतले जाते. मात्र त्याची विक्री परप्रांतीय व्यापाºयांच्या हातात असते. उत्तर भारतात थेट जम्मू-काश्मीरपर्यंत येथील पपईला सर्वाधिक मागणी आहे. परिणामी परप्रांतीय व्यापारी जो दर देतील तोच शेतकºयांना घ्यावा लागतो. गेल्या चार वर्षात पहिल्यांदा शेतकºयांना १४ रुपये दर यावर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला मिळाला होता. त्यानंतर व्यापाºयांनी एकजूट करून चार ते पाच रुपये प्रति किलो एवढा दर खाली आणला होता. असे असतानाही शेतकºयांनी पपईची तोड सुरू ठेवली होती. मात्र कोरोनाचे संकट उद्भवले आणि पपईची तोड थांबली.