शहरं
Join us  
Trending Stories
1
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
2
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
3
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
4
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
5
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
6
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
7
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
8
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
9
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
10
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
11
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
12
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
13
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
14
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
15
टीम इंडियाची 'वाघीण' परत आलीये... Smriti Mandhana चा 'किलर' लूक, पाहा लेटेस्ट PHOTOS
16
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
17
VIDEO : पांड्याची भर मैदानातून गर्लफ्रेंडवर प्रेमाची 'बरसात'; फ्लाइंग किस अन् तिची रिअ‍ॅक्शन चर्चेत
18
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
19
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
20
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनने केल्या पपईच्या बागा उद्ध्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2020 12:35 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोना विषाणू संकट आणि वाढत्या तापमानाचा फटका अशा दुहेरी संकटात नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोना विषाणू संकट आणि वाढत्या तापमानाचा फटका अशा दुहेरी संकटात नंदुरबार जिल्ह्यातील पपई उत्पादक शेतकरी सापडला आहे. कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे व्यापारी येत नाही तर वाढत्या तापमानात पपईची फळे पिवळी पडत असल्याने शेतकऱ्यांच्या बागा उद्ध्वस्त होत आहेत. केलेला खर्चही निघत नसल्याने शेतकरी हवालदिल झाले आहेत.नंदुरबार जिल्ह्यात सुमारे पाच हजार हेक्टर क्षेत्रावर पपईची लागवड केली जाते. यावर्षी पपईचा हंगाम सुरू झाला आणि कोरोनामुळे लॉकडाऊन जाहीर झाले. कोरोनाच्या धास्तीने व्यापारी आले नाहीत आणि जे आले त्यांच्याकडून मातीमोल भावात पपईची मागणी केली जात आहे. परिणामी दुष्काळात तेरावा महिना अशी गत बळीराजाची झाली आहे. जिल्ह्यात तापमानात अचानक वाढ झाली आहे. मे हिटचा तडाखा जाणवत असून तापमान ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्यावर आहे. तापमानाचा पारा दुपारी १२ ते चार वाजेदरम्यान ४२ ते ४३ अंश सेल्सिअस असतो. त्याचा परिणाम पपईच्या फळावर झाला असून ते झाडावर खराब होऊन पिवळी पडत आसल्याने ते काढून फेकल्याशिवाय दुसरा पर्याय शेतकऱ्यांकडे नाही. अनेक शेतकºयांनी पपईला योग्य भाव मिळत नसल्याने शेतातच ती खराब होत असल्याने नाईलाजाने पपईच्या शेतात रोटावेटर व कल्टीवेटर मारून पपईचे पिक शेतातून उखडून फेकले आहे.पपई पिकाचा शासनाने फळपीक योजनेत समावेश केला नसल्याने यास विम्याचे संरक्षण नाही. त्याचप्रमाणे हमीभाव नाही यामुळे व्यापारी प्रत्येक हंगामात शेतकºयांची दराबाबत फसवणूक करत असतात. दरवर्षी शेतकरी व व्यापारी यांच्यात पपईच्या दरावरून मोठा संघर्ष होतो. असे असतानाही जिल्ह्यात दरवर्षी पपई लागवड वाढत चालली आहे. नगदी पीक म्हणून शेतकºयांनी पपईच्या लागवडीवर भर दिला आहे. जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात पपईचे उत्पादन घेतले जाते. मात्र त्याची विक्री परप्रांतीय व्यापाºयांच्या हातात असते. उत्तर भारतात थेट जम्मू-काश्मीरपर्यंत येथील पपईला सर्वाधिक मागणी आहे. परिणामी परप्रांतीय व्यापारी जो दर देतील तोच शेतकºयांना घ्यावा लागतो. गेल्या चार वर्षात पहिल्यांदा शेतकºयांना १४ रुपये दर यावर्षीच्या हंगामाच्या सुरुवातीला मिळाला होता. त्यानंतर व्यापाºयांनी एकजूट करून चार ते पाच रुपये प्रति किलो एवढा दर खाली आणला होता. असे असतानाही शेतकºयांनी पपईची तोड सुरू ठेवली होती. मात्र कोरोनाचे संकट उद्भवले आणि पपईची तोड थांबली.