शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मोठा घोटाळा, राहुल गांधी यांनी सादर केले पुरावे, मतदार यादीतील घोळ केला उघड   
2
केलेल्या आरोपांबाबत २४ तासांत स्वाक्षरीसह शपथपत्र द्या, निवडणूक आयोगाचे राहुल गांधींना आदेश
3
“देशाच्या राजकारणात १५ दिवसांत मोठे बदल दिसतील”; प्रकाश आंबेडकरांचा दावा, विरोधकांवर टीका
4
धक्कादायक! कुत्र्यांनी एका बकरीला मारले, बदला म्हणून त्या माणसाने २५ कुत्र्यांना गोळ्याच घातल्या
5
"ही अमानवी प्रथा बंद करा..."; सरन्यायाधीश संतापले; सुप्रीम कोर्टाचे महाराष्ट्र सरकारला निर्देश
6
मुकेश अंबानींचा पगार किती? आकडा वाचून विश्वास बसणार नाही, ५ वर्षांपासून एकदाही बदल नाही!
7
बापरे! आई-वडिलांच्या एका छोट्याशा चुकीचा मुलांना त्रास, चेहऱ्यावर पडतात पांढरे डाग
8
Video: २५ हजार कमावतो, १० तर भाडेच भरतो...; सैयाराच्या गाण्याचे कार्पोरेट व्हर्जन लोकांच्या काळजाला भिडले...
9
ट्रम्प टॅरिफचा परिणाम, सोन्या-चांदीचे दर उच्चांकी स्तरावर; खरेदीसाठी आणखी खिसा रिकामा करावा लागणार
10
आधी फिल्मी स्टाईलने माहिती घेतली, कारवाई केली, आता त्याच कंपनीने शिंदेंच्या मंत्र्यांच्या कार्यक्रमाला स्पॉन्सर केले
11
इस्रायल, ब्रिटनपासून युक्रेनपर्यंत...; 'ही' धोकादायक मिसाईल खरेदी करण्यासाठी १९ देशांची धडपड!
12
रक्षाबंधन असणार खास! ६५ वर्षांपूर्वी जत्रेत हरवलेली बहीण सापडली, नातवाने भावाशी भेट घडवली
13
'अमेरिका दबाव टाकू शकत नाही; भारतानेही त्यांच्यावर ५०% कर लादावा', शशी थरुर थेट बोलले
14
मुंबई-गोवा ‘वंदे भारत’ २० कोचची होणार? कधीपासून सेवा सुरू करणार? प्रवाशांचा तुफान प्रतिसाद
15
ट्रम्पचा 'टॅरिफ बॉम्ब' थांबता थांबेना! आता थेट चिप्सवर १००% शुल्क, तुमच्या खिशाला किती फटका बसेल?
16
Shravan Purnima 2025: श्रावण पौर्णिमेला कोळीबांधव का करतात रामाची पूजा? जाणून घ्या कारण!
17
मॉर्फ कमी होते म्हणून की काय Elon Musk आता खालच्या पातळीवर उतरले; ग्रोक एआय देणार आता नग्न फोटो 
18
मुलीची पाठवणी करताना वधूपिता गहिवरला, डबडबल्या डोळ्यांनी जावईबापूंना म्हणाला- माझी लेक... (VIDEO)
19
कोरोना काळात एका गोळीसाठी अमेरिका तडफडत होता, भारताने एका कॉलवर ५० लाख टॅब्लेट पाठवल्या आणि आता...
20
५०० रुपयांच्या SIP चा हप्ता चुकला अन् बँकने लावला ५९० रुपये दंड, तुही तर ही चूक करत नाही ना?

‘आपले सरकार’साठी सेतू केंद्रांना कुलूप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 3, 2018 12:30 IST

ऑनलाईन पोर्टलवर भर : दाखले व कागदपत्रांसाठी फिरफिर होण्याची शक्यता

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : शासनाने सर्वच सेतू केंद्र बंद करण्याचा निर्णय घेतल्यामुळे आता थेट ‘आपले सरकार’ आणि महाईसेवा केंद्रावर अवलंबून राहावे लागणार आहे. राज्याच्या माहिती संचालनालयाने हे आदेश काढले आहेत. दरम्यान, ऐन शैक्षणिक वर्ष सुरू होण्याच्या तोंडावरच सेतू केंद्र बंद झाल्याने विद्याथ्र्याना विविध दाखले, कागदपत्रांची अडचण होण्याची शक्यता व्यक्त केल जात आहे. राज्यातील प्रत्येक तहसील कार्यालयांच्या आवारात सेतू सुविधा केंद्र सुरू केले होते. यामुळे वेळेत दाखले किंवा कागदपत्रे मिळून नागरिकांची फिरफिर थांबली होती. शिवाय आर्थिक बचतदेखील झाली होती. सेतू सुविधा केंद्रांबाबत काहीवेळा तक्रारीही वाढल्या होत्या. त्या वेळोवेळी प्रशासनाने दूरदेखील केल्या. परंतु 1 जूनपासून राज्यातील सर्वच सेतू सुविधा केंद्र बंद करण्याचा आदेश राज्याच्या माहिती संचालनालयाने अर्थात डीआयटी काढला आहे. नंदुरबारातील सर्वच सेतू केंद्रांलाही कुलूप लागले आहे.‘आपले सरकारवर’ भरशासनाने गेल्या वर्षापासून आपले सरकार हे पोर्टल सुरू केले आहे. त्यावर सर्वच प्रकारचे दाखले उपलब्ध आहेत. त्यासाठी प्रत्येक तालुक्याचे ठिकाण, अनेक ग्रापपंचायतींमध्ये आपले सरकार केंद्रदेखील सुरू आहे. या माध्यमातूनच आता प्रत्येकाला विविध कागदपत्रे आणि दाखले मिळविण्यासाठी शासन प्रय}शील आहे. त्यासाठी काही ठरावीक कालमर्यादादेखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. आपले सरकार या उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी उपयोग घ्यावा हा उद्देश सेतू सुविधा केंद्र बंद करण्यामागे असल्याचेही बोलले जात आहे. आपले सरकार पोर्टलवर पाचशेपेक्षा अधीक दाखले, कागदपत्र मिळू शकतात. मोबाईलवरील अॅप्स द्वारेदेखील दाखला, कागदपत्रासाठी नोंदणी करता येते.महाईसेवा केंद्रांवर आता या निर्णयामुळे अधिक भार वाढणार आहे. तहसील कार्यालयातून काही कागदपत्रे, दाखले आता सेतूप्रमाणे महाईसेवा केंद्रांकडेदेखील पाठविण्यात येणार आहेत. त्यामुळे महाईसेवा केंद्रांवर अधिक भार वाढणार आहे. मोठय़ा शहरांमध्ये दोन ते तीन तर लहान शहर व गावांमध्येदेखील एक किंवा दोन महाईसेवा केंद्र सुरू आहेत. येत्या 10 दिवसात शैक्षणिक सत्र सुरू होणार आहे. शिवाय विविध अभ्यासक्रमाच्या प्रवेशाचे वेळापत्रकदेखील लवकरच सुरू होणार आहे. त्यासाठी लागणा:या कागदपत्रांकरीता नागरिकांच्या, विद्याथ्र्याच्या तहसील कार्यालयाच्या चकरा वाढू लागल्या आहेत.आपले सरकार पोर्टलवरून विविध कागदपत्र मिळविणे, तक्रारी करणे यासाठी काही ऑनलाईंन प्रक्रिया आहेत. ग्रामिण किंवा आदिवासी दुर्गम भागातील प्रत्येकाला ते जमेलच असे नाही. शिवाय सर्वच ग्रामपंचायतीत सेवा केंद्र आहेत असेही नाही. त्यामुळेदेखील अडचणी येऊ शकतात. परिणामी याबाबत नागरिकांना परिपूर्ण माहिती होणे आवश्यक आहे.