शहरं
Join us  
Trending Stories
1
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
2
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
3
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
6
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
7
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
8
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
9
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
10
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
11
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
12
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
13
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
14
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
15
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
16
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
17
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
18
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
19
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
20
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
Daily Top 2Weekly Top 5

क्रीडा क्षेत्रावरील लॉकडाऊन आता उठवायलाच हवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 18, 2021 04:22 IST

कोरोनाने गेले दीड वर्ष आपले सर्व व्यवहार अक्षरशः बंद पाडले. यामुळे अनेक अनिवार्य कामेही करणे कठीण होवून बसले. नित्याच्या ...

कोरोनाने गेले दीड वर्ष आपले सर्व व्यवहार अक्षरशः बंद पाडले. यामुळे अनेक अनिवार्य कामेही करणे कठीण होवून बसले. नित्याच्या दैनंदिन जीवनातही काही गरजा पूर्ण करता-करता नाकेनऊ आले. टीव्हीवरचे मनोरंजन हेच जणू जीवन वाटू लागले. अगदी मॉर्निंग वॉकला जाणेही गेल्या काळात अवघड होवून बसले होते. कोरोनाच्या रहस्यमयी अस्तित्वाने काहीही केले तर कोरोना होणार असे समीकरण झाले होते.

दीड वर्षात अनेकांची शारीरिकपेक्षा मानसिक स्थितीच जास्त बिघडली. सर्वदूर हीच परिस्थिती असल्याने इतर वेळी दैनंदिन आयुष्यात ज्या स्पर्धांची, शिबिरांची आपण आतुरतेने वाट पहायचो त्या सुद्धा रद्द झाल्या. काही स्पर्धा घेण्याचा प्रयत्न झाला, परंतु शासनाच्या निर्बंधामुळे त्या लागलीच रद्द कराव्या लागल्या. आता कुठे जनजीवन दीड वर्षानंतर हळूहळू सुरळीत होवू लागले आहे. कोरोना प्रतिबंधक लसीकरणातून वातावरण थोडेसे सकारात्मक झाले. दैनंदिन व्यवहार कुठे पूर्ण, कुठे अंशतः सुरू झाले. नोकरी, व्यवसाय रूळावर येवू लागले. उद्योग वाहतूक सुरू झाली. मॉल, थिएटर सुरू झाले. मैदानेही थोड्याफार प्रमाणात सुरू झाले. नेहमी प्रमाणेच खेळाडू मैदानावर येवू लागले. परंतु पुन्हा कोणत्या व्हेरिएंटमुळे प्रतिबंध लागतील याची धास्ती अजूनही खेळाडूंच्या मनामध्ये आहे. अशा या युद्धजन्य परिस्थितीवर मात करण्याकरीता खेळाडूंनी पुरेशी काळजी घेवून, लसीकरण करून आरोग्याची काळजी घेत खेळाची मैदाने संपूर्णपणे खुली करणे आजची अत्यावश्यक गरज बनली आहे.

जागतिक स्तरावर युरोपिय देशांमध्ये फुटबॉल स्पर्धा, ऑस्ट्रेलियन स्पर्धा, पीसीएल स्पर्धा, त्याचप्रमाणे आता सुरू होत असलेले ऑलम्पिक, अमेरिकन ओपन टेनिस स्पर्धा, क्रिकेटचा वर्ल्डकप, आयपीएल आदींमुळे क्रीडा जगतावरील मरगळ हळूहळू झटकली जावू लागली आहे. प्रेक्षकांना प्रतिबंध करून स्पर्धा घेण्याकडे जागतिक स्तरावर सद्यातरी कल दिसतो. काही स्पर्धांना स्टेडीयमच्या मर्यादेच्या ५० टक्के क्षमतेनुसार प्रेक्षकांना हजेरी लावता येत आहे. परंतु नंदुरबार जिल्ह्याच्या तथा राज्याच्या क्रीडा क्षेत्रातील खेळाडूंच्या मनातून कोरोनाचे भय अजून निघालेले नाही. सामान्य परिस्थितीत खेळाशी तडजोड करणारा खेळाडू लढतो आहे. परंतु पुरेसी साधन सामुग्रीची त्याला गरज भासते आहे. खेळ आणि खेळाच्या स्पर्धा या काही फक्त खेळाडूंपुरताच मर्यादित नसतात. तर त्याला क्रीडा क्षेत्रावर प्रेम करणारे चाहते यांच्या आशा-आकांक्षा त्याला जोडलेल्या असतात. कोरोनामुळे नैराश्य पसरलेल्या या काळात क्रीडा क्षेत्रात मोठे बदल झाले आहेत. खेळाडूंमधील सकारात्मक बदल हा येणाऱ्या काळात होईलच. त्यामुळे मैदानांना सोनेरी दिवस येतील. आजच्या काळाची गरज पाहता आतातरी क्रीडा क्षेत्रावरील बंधन मुक्त करणे गरजेचे झाले आहे. स्पर्धांमधूनच खेळाडूंना आपली कामगिरी दाखविता येते. त्यातूनच सुधारणाही करता येते. वैयक्तिक खेळांना सुरूवात करण्यासाठी शासनाने परवानगी जरी दिली असली तरी खेळाडू म्हटले तर ते एकत्र येतच असतात. त्यासाठी १८ वर्षावरील खेळाडूंना ज्याप्रमाणे लस उपलब्ध आहे, त्याच प्रमाणात बाल खेळाडूंना लसीकरण होणे गरजेचे आहे. नंदुरबार जिल्हा हा आदिवासी दुर्गम जिल्हा आहे. शैक्षणिक स्तर ग्रामीण भागात कमी आहे. व यामुळे खेळाडूंना मार्गदर्शनाचा अभाव आहे. संधी जरी असली तरी योग्य माहिती खेळाडूंपर्यंत पोहोचणे गरजेचे आहे. यासाठी योग्य ती यंत्रणा शासन दरबारी कार्यान्वित झाली पाहीजे. त्याचबरोबर लहान मुलामुलींच्या लसीकरणाला वेळ असला तरी त्यांना आवश्यक टेस्ट घेवून मैदानांवर होणाऱ्या स्पर्धांसाठी परवानगी देणे गरजेचे आहे. ज्यावेळेस स्पर्धा तालुका, जिल्हा, विभागीय, राज्यस्तरीय व राष्ट्रीय स्पर्धा मागच्या गतकाळाप्रमाणेच सुरू होतील. त्यावेळेस क्रीडा जगतात पुन्हा चैतन्य निर्माण होईल व जनजीवन सुरळीत झाल्याचे ते एक आदर्श बनेल. क्रीकेट, हॉकी, हॉलीबॉल, बॅटमिंटन, कबड्डी, खो-खो, टेनिक्वाईट, बुद्धीबळ, ऍथलेटिक्स या मैदानी खेळांच्या स्पर्धा सुरू हाेणे गरजेचे आहे. आरोग्यासाठी खेळ अत्यावश्यकच आहेत. अशा स्थितीत कोरोनाच्या भितीने क्रीडा क्षेत्राचा गळा आवळणे योग्य नाही. ऑलम्पिक स्पर्धा जागतिक स्तरावर होत आहेत. त्या निमित्ताने पुन्हा एकदा संपूर्ण जगभर खेळाविषयी सकारात्मक संदेश जाणार आहे. स्थानिक खेळांना परवानगी मिळाली तर ऑलम्पिक सारख्या स्पर्धेत खेळण्यासाठी सज्ज होणारी नवीन पिढी ही मैदानावर आपले कौशल्य दाखवेल. यासारखी मैदाने सुरू करणे गरजेचे आहे.

खेळ पुढे गेला तर जीवन पुढे जाईल. खेळाडूंचे तथा पालकांचे मनोबल वाढेल. यासाठी मैदान गजबजने गरजेचे आहे. ही बाब लक्षात घेतली पाहीजे. कोरोनाने फिटनेस आणि आरोग्य या दोन बाबी जीवनात महत्त्वपूर्ण असण्याची शिकवण दिली. त्यासाठीच लहान-मोठे सर्वांनी मैदानावर कसरत करणे गरजेचे आहे. स्पर्धांच्या माध्यमातून निर्माण होणारी चुरस ही क्रीडा क्षेत्राला नवी दिशा देणार आहे. यासाठी आपण सर्वांनी कोरोनामुक्तीच्या दिशेने वाटचाल करून खेळाडूंसाठी सकारात्मक विचार करुन आरोग्य संपन्न देशासाठी क्रीडा क्षेत्राकडे पाहणे गरजेचे आहे. - प्रा.डॉ.मयुर ठाकरे, क्रीडा शिक्षक, यशवंत कनिष्ठ महाविद्यालय, नंदुरबार