लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील अनेक भागात बुधवारी सायंकाळी पावसाच्या सरी कोसळल्या. धडगावसह अनेक भागात वादळवारा होता. यामुळे दुर्गम भागातील आंबा पिकाचे नुकसान झाल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, २७ तारखेपर्यंत ढगाळ वातावरण आणि पावसाचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला आहे.जिल्ह्यात दोन दिवसांपासून ऊन-सावलीचा खेळ सुरू होता. त्यामुळे आद्रतेत देखील वाढली आहे. बुधवारी सकाळी हलक्या सरी कोसळल्या. दिवसभर ढगाळ वातावरण राहिल्यानंतर सायंकाळी ४ वाजता अनेक भागात पाऊस झाला. यामुळे अनेकांची धावपळ उडाली. मिरची व्यावसायिकांची तारांबळ उडाली. पथारींवर असलेल्या मिरची झाकण्यासाठी धावपळ झाली. परंतु मजूरच नसल्याने पावसातच मिरच्या भिजल्या.धडगाव तालुक्यातील अनेक भागात वादळवाऱ्यासह पाऊस झाला. यामुळे आंबाचे नुकसान झाले. सध्या लहान कैºया लगडलेल्या आहेत. वादळामुळे त्या कैºया पडल्यामुळे मोठे नुकसान झाल्याचे या भागातील नागरिकांनी सांगितले.आणखी दोन दिवस पावसाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांनी आवश्यक त्या उपाययोजना करून पिकांचे नुकसान होणार नाही याची काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अनेक भागात पावसाचा हलकासा शिडकावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 26, 2020 12:22 IST