शहरं
Join us  
Trending Stories
1
सी.पी राधाकृष्णन यांना उपराष्ट्रपतिपदाचे उमेदवार बनवण्यामागे भाजपाची खेळी काय? जाणून घ्या
2
जलसमाधी आंदोलनावेळी नदीत उडी घेणाऱ्या 'त्या' आंदोलनकर्त्याचा मृतदेह १५ किमी अंतरावर सापडला
3
दहीहंडीला २४ तासांत तब्बल १.१३ कोटी दंड वसूल; वाहतूक पोलिसांनी बेशिस्त गोविंदांना लावला चाप
4
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
5
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
6
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
7
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
8
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
9
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
10
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
11
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
12
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
13
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
14
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
15
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
16
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
17
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
18
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

नंदुरबार जिल्ह्यातील 14 हजार घरात प्रकाश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 6, 2018 12:19 IST

ग्रामज्योती : 40 कोटींच्या निधीतून विविध कामे

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 6 : दिनदयाल ग्राम ज्योती योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 14 हजार 700 वीज ग्राहकांना लाभ मिळाला आहे. या योजनेसाठी वीज वितरण कंपनीने जिल्ह्याला 40 कोटी 26 लाख रुपये निधी मंजुर झाला आहे.जिल्ह्याची भौगोलिक परिस्थिती लक्षात घेता अनेक भागात वीज पोहचू शकत नाही. त्यामुळे अनेक गावे व पाडे अद्यापही अंधारात आहे. याशिवाय अनेक ठिकाणी वीज उपकेंद्र आणि रोहित्रांची देखील कमतरता आहे. त्यामुळे पुरेशा प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्यात देखील अडचणी निर्माण होतात. ही बाब लक्षात घेता जिल्ह्याला पंडित दिनदयाल ग्राम ज्योती योजना मंजुर करण्यात आली आहे. त्याअंतर्गत आता विजेची विविध कामे करण्यात येत आहे.जिल्ह्याला सन 2030 र्पयत लागणा:या विजेचा आराखडा तयार करून त्यानुसार काम सुरू करण्यात आले आहे. त्याअंतर्गतच दिनदयाल ग्राम ज्योती योजनेचेही काम सुरू करण्यात आले आहे. या योजनेअंतर्गत 40 कोटी 26 लाख रुपये निधीतून कामे करण्यात येत आहेत. याअंतर्गत गावठाण फिडर विलगीकरणाचे 34 प्रस्ताव आहेत. ही कामे प्रगतीपथावर आहेत. 33 के.व्ही.उपकेंद्र चार असून त्यांचीही कामे सुरू करण्यात आली आहेत. याअंतर्गत एकुण 14 हजार 700 ग्राहकांना त्याचा फायदा मिळणार आहे.राज्याचे उर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे हे दोन महिन्यांपूर्वी नंदुरबारात आले असता त्यांनी या कामांचा आढावा घेवून अधिका:यांना सुचना केल्या होत्या. जिल्ह्यातील भौगोलिक परिस्थिती पहाता 61 गाव आणि 235 पाडय़ांना अद्यापही वीज पुरवठा होऊ शकलेला नाही. येत्या वर्षात जिल्हा नियोजन व विकास समितीच्या माध्यमातून निधी मंजुर करून 17 गावांना वीज पुरवठा करण्याचे उद्दीष्ट ठेवण्यात आले आहे. भौगोलिक परिस्थितीमुळे ज्या पाडय़ात वीज पोहचू शकणार नाही अशा ठिकाणी सौर उज्रेचा वापर करण्यावर भर राहणार आहे. त्यासाठी नियोजनही करण्यात आले आहे. पंडित दिनदयाल उपाध्याय ग्राम ज्योती योजनेअंतर्गत देखील विविध ठिकाणी वीज उपकेंद्र आणि रोहित्रांची संख्या वाढविण्यात येत आहे.