शहरं
Join us  
Trending Stories
1
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
2
बडोद्यात गणेश मूर्तीच्या विटंबनेचा प्रयत्न; समाजकंटकांनी मूर्तीवर अंडी फेकली, चार जण ताब्यात
3
जरांगेंना आझाद मैदानावर आंदोलन करता येणार नाही; मुंबई हायकोर्टाचा निर्णय, सदावर्ते म्हणाले...
4
'कशाला रोडमॅप? आजच अंमलबजावणी करा!'; जरांगे-मुख्यमंत्र्यांचे OSD यांच्यात काय चर्चा झाली?
5
गणेशोत्सवापूर्वी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ऑगस्टचा पगार आगाऊ देणार, कोणाला मिळणार लाभ
6
कन्नौजचे अत्तर आणि अयोध्येच्या दीपोत्सवाने जिंकले मन, पर्यटन परिषदेत यूपी ठरले आकर्षणाचे केंद्र!
7
ब्यूटी पार्लर, इन्स्टा रिल्स की ३५ लाख हुंडा...काय आहे निक्कीच्या क्रूर अंतामागचं खरं कारण?
8
कॉस्मेटिक सर्जरीवर 'शालिनी'चं प्रामाणिक उत्तर; माधवी निमकर म्हणाली, "कितीतरी कलाकारांनी..."
9
RSS चे प्रार्थना गीत गायल्याने स्वकीयांकडून टीका; आता डीके शिवकुमार यांनी मागितली माफी
10
CM योगींच्या नेतृत्वात तयार झाले विक्रमी 39 कल्याण मंडपम्, आता दुर्बल कुटुंबांनाही धुमधडाक्यात करता येईल समारंभांचे आयोजन
11
जयंती २०२५: गुरुचरित्राप्रमाणे पुण्यदायी श्रीपाद श्रीवल्लभ चरित्रामृत; कसे पारायण कराल? वाचा
12
ना जेवणाची परवानगी, ना ब्रेक... खर्च वाढेल म्हणून वधूचं फोटोग्राफी टीमसोबत धक्कादायक कृत्य
13
कुठल्याही प्रोजेक्टमध्ये त्रुटी आढळल्यास संबंधितांवर कारवाई होणार, अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाणार - मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ
14
ब्रोकरेज फर्मची 'या' ५ स्टॉक्सला पसंती! ऑटो, संरक्षण आणि हॉस्पिटॅलिटी कंपन्यांना मजबूत रेटिंग
15
बुधवारी गणपती २०२५: १ गोष्ट अर्पण करा, पूर्ण पूजा सफल होईल; वर्षभर पुण्य, बाप्पा शुभच करेल!
16
Jasmin Jaffar: बिग बॉस फेम जास्मीन जाफरने श्रीकृष्ण मंदिरातील तलावात धुतले पाय; व्हिडीओ व्हायरल, लोक भडकले
17
Ganpati Puja 2025: घरी स्थापन केलेल्या बाप्पाची दररोज पूजा कशी करावी? ‘या’ गोष्टींचे पालन आवश्यकच
18
Tanya Mittal : १२ वी पास आहे तान्या मित्तल; ५०० रुपयांपासून सुरू केला बिझनेस, आता कोट्यवधींची मालकीण
19
जम्मूच्या दोडा येथे ढगफुटी; डोंगरावरून आलेल्या पुरात चार जणांचा मृत्यू, १० हून अधिक घरे वाहून गेली
20
आयफोन १६ प्लसच्या खरेदीवर मोठी सूट, किंमत पाहून ग्राहकांचा आनंद गगनात मावेना!

खंडीत वीज पुरवठय़ाने जनजीवन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वादळ व पावसामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब व तारा तुटल्याने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वादळ व पावसामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब व तारा तुटल्याने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपासून खंडित झालेला वीज पुरवठा बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता सुरळीत झाला. तब्बल 23 तासापेक्षा अधीक काळ काही अपवाद वगळता संपुर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित होता. यामुळे शहराच्या पाणी पुरवठा ठप्प झाला. अनेक शासकीय कार्यालये, बँकामधील कामकाज देखील प्रभावीत झाले होते. दरम्यान, वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचा:यांनी रात्री दोन वाजेपासूनच युद्धपातळीवर दुरूस्तीच्या कामांना वेग दिला होता. परंतु वीज खांब मोठय़ा प्रमाणावर पडल्याने आणि तारा तुटल्याने त्याला वेळ लागला. मंगळवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक वादळासह पावसाला सुरुवात झाली. वादळाचा जोर अधीक असल्यामुळे दोंडाईचा ते पातोंडा आणि पातोंडा ते नंदुरबार अशा मुख्य वीज वाहिनीचे अनेक खांब उन्मळून पडले तर अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्या. यामुळे नंदुरबारातील 80 टक्के भागात 20 तासापेक्षा अधीक काळ वीज पुरवठा खंडित होता. यामुळे जनजिवनावर परिणाम दिसून आला. असह्य उकाडा आणि वाढलेले तापमान यामुळे घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते. मुख्य वीज वाहिनी प्रभावीतदोंडाईचा येथील मुख्य वीज केंद्रातून येणारी उच्च दाबाची वीज वाहिनीचे अनेक ठिकाणचे खांब वादळामुळे वाकले होते. काही ठिकाणी खांब उन्मळून पडले. वीज तारांवर वृक्ष कोसळल्याने देखील मोठे नुकसान झाले. परिणामी दोंडाईचा ते पातोंडा वीज केंद्रार्पयत वीज पुरवठा ठप्प झाला. त्याच दरम्यान पातोंडा ते नंदुरबारातील नेहरूनगर वीज केंद्रार्पयतच्या अंतरात देखील मोठय़ा प्रमाणावर वीज खांब कोसळले होते. एवढी मोठी हाणी लक्षात घेता वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचा:यांनी रात्री दोन वाजेपासूनच कामाला सुरुवात केली होती. परिणामी पहाटे तीन वाजता काही भागातील वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला. परंतु नंतर तो देखील खंडित झाला. 80 टक्के भागातील वीज पुरवठा मात्र बंदच राहिला.जनजिवनावर परिणाम23 तासापेक्षा अधीक काळ वीज पुरवठा खंडित राहिल्याने त्याचा परिणाम जनजिवनावर झाला. अनेक भागातील मोबाईल टॉवर बंद झाले होते. परिणामी नेटवर्कला समस्या येत होत्या. मोबाईल चाजिर्ग देखील होऊ न शकल्याने अनेकांचे मोबाईल शोपीस ठरले होते.शासकीय कार्यालयांमधील इन्व्हर्टरचा बॅक संपल्याने व जनरेटरलाही मर्यादा आल्याने कामकाजावर परिणाम झाला होता. पाणी विक्री करणा:यांचे  फिल्टरेशन प्लॅट देखील वीजेअभावी बंद राहिल्याने अनेक शासकीय कार्यालये, बँका, खाजगी कार्यालये, घरांमध्ये होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. घामाच्या धारांनी हैराणमंगळवारी रात्रभर आणि बुधवारी दुपार्पयत वीज पुरवठा खंडित राहिल्याने आणि त्यातच वातावरणातील आद्रतेत झालेली वाढ व तापमानाचाही वाढलेला पारा यामुळे घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते. घरांमधील इन्व्हर्टरचा बॅकअप संपलेला होता. परिणामी उकाडय़ातच रात्र आणि दिवसही काढावा लागला. यामुळे लहान बालकं आणि वृद्धांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागल्याचे चित्र होते. रुग्णालयांमध्येही समस्याखंडित वीज पुरवठय़ाचा परिणाम रुग्णालयांमध्येही झाला. ज्या ठिकाणी जनरेट होते तेथे काही वॉर्ड पुरता वीज पुरवठा करण्यात येत होता काही ठिकाणी तर रुग्णांचे मोठे हाल झाले. जिल्हा रुग्णालयात हे चित्र मोठय़ा प्रमाणावर होते.