शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
2
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
3
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
4
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
5
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
6
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
7
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
8
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
9
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
10
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
11
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
12
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
13
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
14
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
15
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
16
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
17
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
18
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
19
Numerology: २०२६ चं भविष्य लपलंय तुमच्या जन्मतारखेत; नव्या वर्षात प्रगती होणार की अधोगती? वाचा
20
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
Daily Top 2Weekly Top 5

खंडीत वीज पुरवठय़ाने जनजीवन ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2019 11:48 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : वादळ व पावसामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब व तारा तुटल्याने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपासून ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : वादळ व पावसामुळे अनेक ठिकाणचे विद्युत खांब व तारा तुटल्याने मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजेपासून खंडित झालेला वीज पुरवठा बुधवारी सायंकाळी साडेचार वाजता सुरळीत झाला. तब्बल 23 तासापेक्षा अधीक काळ काही अपवाद वगळता संपुर्ण शहराचा वीज पुरवठा खंडित होता. यामुळे शहराच्या पाणी पुरवठा ठप्प झाला. अनेक शासकीय कार्यालये, बँकामधील कामकाज देखील प्रभावीत झाले होते. दरम्यान, वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचा:यांनी रात्री दोन वाजेपासूनच युद्धपातळीवर दुरूस्तीच्या कामांना वेग दिला होता. परंतु वीज खांब मोठय़ा प्रमाणावर पडल्याने आणि तारा तुटल्याने त्याला वेळ लागला. मंगळवारी सायंकाळी पाच ते साडेपाच वाजेच्या सुमारास अचानक वादळासह पावसाला सुरुवात झाली. वादळाचा जोर अधीक असल्यामुळे दोंडाईचा ते पातोंडा आणि पातोंडा ते नंदुरबार अशा मुख्य वीज वाहिनीचे अनेक खांब उन्मळून पडले तर अनेक ठिकाणी वीज तारा तुटल्या. यामुळे नंदुरबारातील 80 टक्के भागात 20 तासापेक्षा अधीक काळ वीज पुरवठा खंडित होता. यामुळे जनजिवनावर परिणाम दिसून आला. असह्य उकाडा आणि वाढलेले तापमान यामुळे घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते. मुख्य वीज वाहिनी प्रभावीतदोंडाईचा येथील मुख्य वीज केंद्रातून येणारी उच्च दाबाची वीज वाहिनीचे अनेक ठिकाणचे खांब वादळामुळे वाकले होते. काही ठिकाणी खांब उन्मळून पडले. वीज तारांवर वृक्ष कोसळल्याने देखील मोठे नुकसान झाले. परिणामी दोंडाईचा ते पातोंडा वीज केंद्रार्पयत वीज पुरवठा ठप्प झाला. त्याच दरम्यान पातोंडा ते नंदुरबारातील नेहरूनगर वीज केंद्रार्पयतच्या अंतरात देखील मोठय़ा प्रमाणावर वीज खांब कोसळले होते. एवढी मोठी हाणी लक्षात घेता वीज कंपनीच्या अधिकारी व कर्मचा:यांनी रात्री दोन वाजेपासूनच कामाला सुरुवात केली होती. परिणामी पहाटे तीन वाजता काही भागातील वीज पुरवठा सुरळीत होऊ शकला. परंतु नंतर तो देखील खंडित झाला. 80 टक्के भागातील वीज पुरवठा मात्र बंदच राहिला.जनजिवनावर परिणाम23 तासापेक्षा अधीक काळ वीज पुरवठा खंडित राहिल्याने त्याचा परिणाम जनजिवनावर झाला. अनेक भागातील मोबाईल टॉवर बंद झाले होते. परिणामी नेटवर्कला समस्या येत होत्या. मोबाईल चाजिर्ग देखील होऊ न शकल्याने अनेकांचे मोबाईल शोपीस ठरले होते.शासकीय कार्यालयांमधील इन्व्हर्टरचा बॅक संपल्याने व जनरेटरलाही मर्यादा आल्याने कामकाजावर परिणाम झाला होता. पाणी विक्री करणा:यांचे  फिल्टरेशन प्लॅट देखील वीजेअभावी बंद राहिल्याने अनेक शासकीय कार्यालये, बँका, खाजगी कार्यालये, घरांमध्ये होणारा पाणीपुरवठा होऊ शकला नाही. घामाच्या धारांनी हैराणमंगळवारी रात्रभर आणि बुधवारी दुपार्पयत वीज पुरवठा खंडित राहिल्याने आणि त्यातच वातावरणातील आद्रतेत झालेली वाढ व तापमानाचाही वाढलेला पारा यामुळे घामाच्या धारांनी नागरिक हैराण झाले होते. घरांमधील इन्व्हर्टरचा बॅकअप संपलेला होता. परिणामी उकाडय़ातच रात्र आणि दिवसही काढावा लागला. यामुळे लहान बालकं आणि वृद्धांना मोठय़ा त्रासाला सामोरे जावे लागल्याचे चित्र होते. रुग्णालयांमध्येही समस्याखंडित वीज पुरवठय़ाचा परिणाम रुग्णालयांमध्येही झाला. ज्या ठिकाणी जनरेट होते तेथे काही वॉर्ड पुरता वीज पुरवठा करण्यात येत होता काही ठिकाणी तर रुग्णांचे मोठे हाल झाले. जिल्हा रुग्णालयात हे चित्र मोठय़ा प्रमाणावर होते.