शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Ambani : अनिल अंबानी अडचणीत? घरासह इतरही ठिकाणांवर सकाळपासूनच छापे; १७००० कोटींच्या बँक कर्ज घोटाळाप्रकरणी CBI ची कारवाई!
2
'भारत-पाकिस्तान मुद्द्यावर कोणतीही मध्यस्थी स्वीकार्य नाही', परराष्ट्र मंत्री एस जयशंकर यांनी नाव न घेता ट्रम्प यांना स्पष्टच सांगितले
3
मुंबईत घडामोडींना वेग, शिवसेना शिंदे गटाच्या मंत्र्यांनी घेतली शरद पवारांची भेट; कारण काय?
4
सरकारची 'उपसमिती' म्हणजे 'जुनेच खुळ', आमच्या मागण्यांचे काय? मनोज जरांगेंचा संतप्त सवाल
5
नागपूर: चालकाला येऊ लागली झोप, स्वतःच कार...; अपघातात कुलगुरू हरेराम त्रिपाठी यांचा पत्नीसह मृत्यू
6
एक ऑर्डर पोहोचवण्यासाठी Myntra आणि Amazon च्या डिलिव्हरी बॉयला किती पैसे मिळतात?
7
मुंबईत घडतेय तरी काय? आता अमित ठाकरेंनी घेतली आशिष शेलारांची भेट; राजकीय वर्तुळात चर्चा
8
"छन छन छन...असा आवाज करत ते...", प्रिया बापटनं सांगितला दादरच्या घरातील थरकाप उडवणारा प्रसंग
9
ठरलं! मेस्सी अर्जेंटिनाचा अख्खा वर्ल्ड चॅम्पियन संघ घेऊन भारतात खेळायला येतोय! कधी अन् कुठं रंगणार सामना?
10
विराट आणि रोहित वनडेतून कधी निवृत्त होणार? राजीव शुक्ला स्पष्टच बोलले...
11
भाद्रपद महिन्यात गौरी, गणपती आणि पितृपक्षही; जाणून घ्या या मराठी महिन्याचे महत्त्व!
12
अखेर लग्नाच्या ३८ वर्षांनंतर गोविंदा आणि सुनीताचा होतोय घटस्फोट? चीचीचे वकील म्हणाले...
13
खिलाडी अन् अनाडी १६ वर्षांनंतर एकत्र येणार, अक्षय कुमार-सैफ अली खानच्या 'हैवान'चं शूट सुरु
14
काजोलच्या 'द ट्रायल' सीझन २ चा दमदार ट्रेलर पाहिलात का? सोनाली कुलकर्णीचीही मुख्य भूमिका
15
विराट-धोनी नव्हे, तर हा आहे जगातला सर्वात श्रीमंत क्रिकेटर; बघा टॉप-5 क्रिकेटर्सची लिस्ट...!
16
उपराष्ट्रपती निवडणूक २०२५: “पवार-ठाकरेंची भूमिका विरोधाभासी, राष्ट्रहितविरोधी”; भाजपाची टीका
17
कर्जाचं ओझं कमी करतेय अनिल अंबानींची कंपनी; आता २००० कोटी रुपयांत विकणार पुणे-सातारा टोल रोड प्रोजेक्ट
18
जगदीप धनखड नेमके आहेत तरी कुठे? ते सध्या काय करतात?; महत्त्वाची माहिती समोर आली, पत्ता लागला!
19
काळाचा घाला...! पाटण्यात भीषण अपघात, ट्रक-ऑटोच्या धडकेत गंगा स्नानासाठी जात असलेल्या ७ महिलांसह ८ जणांचा मृत्यू!
20
रात्रभर नोटा जाळल्या, तरीही पैसे संपले नाहीत; अधीक्षक अभियंता निघाला काळ्या धनाचा कुबेर!

एकल खाते बंद करण्याबाबत बँकांना पत्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 14, 2018 12:49 IST

तळोदा तालुक्यातील 67 ग्रामपंचायती : गटविकास अधिका:यांची माहिती

तळोदा : तालुक्यातील सर्वच 67 ग्रामपंचायतींचे बँकेतील एकल खाते बंद करण्याचे पत्र संबंधित बँकांच्या प्रशासनास येथील पंचायत समितीच्या गटविकास अधिका:यांनी दिले आहे. साहजिकच ग्रामसेवकांच्या मनमानी कारभारासही आता चाप बसला आहे.तळोदा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनी ग्रामपंचायतीचे बँकेत संयुक्त खात्याऐवजी एकल खाते उघडले होते. त्यामुळे ग्रामपंचायतीच्या निधी खर्चाबाबत सरपंचांना विश्वासात घेतले जात नसल्याच्या तक्रारी या पदाधिका:यांनी गटविकास अधिका:यांकडे केली होती. या पाश्र्वभूमिवर गेल्या आठवडय़ात गटविकास अधिकारींनी समन्वयासाठी पदाधिकारी अन् ग्रामसेवकांची बैठकही बोलविली होती. या बैठकीत ग्रामसेवकांच्या मनमानी कारभाराबाबत सरपंचांनी तीव्र असंतोष व्यक्त करून सभाही चांगलीच गाजविली होती. त्यानंतर गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांनी अशा ग्रामपंचायतींचे एकल खाते तातडीने बंद करण्याचे आश्वासन पदाधिका:यांना दिले होते. या पाश्र्वभूमिवर त्यांनी तळोदा तालुक्यातील सर्वच 67 ग्रामपंचायतीचे एकल खाते            तातडीने बंद करून त्याऐवजी पदाधिकारी आणि ग्रामसेवकांचे संयुक्त खाते उघडण्याचे पत्र सेंट्रल बँक, बँक ऑफ बरोडा, भारतीय स्टेट बँक, महाराष्ट्र ग्रामीण बँक यांना देण्यात आले आहे. त्यामुळे आता ग्रामपंचायतींचा आर्थिक कारभारही सुरळीत राहणार आहे. पंचायत समितीने तातडीने केलेल्या कार्यवाहीबाबत पदाधिका:यांनी समाधान व्यक्त केले आहे.गावक:यांची कामे तत्काळ होण्यासाठी तालुक्यातील सर्वच ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकांनी आपापल्या कार्यालयाच्या ठिकाणी राहण्याची सक्त ताकीद दिल्याचेही गटविकास अधिका:यांनी सांगितले. ग्रामसेवक कार्यालयाच्या ठिकाणी राहत नसल्याची तक्रारदेखील बैठकीत सरपंचांनी केली होती. या पाश्र्वभूमिवर पंचायत समिती प्रशासनाने ग्रामसेवकांना सूचना दिली आहे. पंचायत समितीतदेखील कामासाठी येणा:या ग्रामसेवकांना सह्यांचे रजिस्टर ठेवण्यात आल्याचे सूत्रांनी सांगितले. प्रशासनाच्या या कार्यवाहीबाबत ग्रामीण भागातील नागरिकांनी समाधान व्यक्त केले असून, या आदेशाची काटेकोरपणे प्रभावी अन् ठोस अंमलबजावणी करण्याची अपेक्षा गावक:यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान याप्रकरणी प्रशासनाने कायम स्वरूपी अंमलबजावणी करावी, अन्यथा याविरोधात पुन्हा जाब विचारण्याचा इशारा संघटनेच्या पदाधिका:यांनी दिला आहे.नंदुरबार जिल्हा परिषदेच्या ग्रामपंचायत विभागाच्या मुख्यकार्यकारी अधिकारी सारीका बारी यांनी तळोदा पंचायत समितीला तीन दिवसांपूर्वी भेट देवून सभागृहात बैठक घेतली होती. या बैठकीत तालुक्यातील सर्व ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकांनादेखील बोलविण्यात आले होते. या बैठकीस जिल्ह्याने केंद्र शासनाच्या स्वच्छ भारत मिशन कार्यक्रमात भाग घेतला असून, त्याबाबत स्वच्छता अॅपच्या माध्यमातून गावक:यांमध्ये जनजागृती करण्याची सूचना या वेळी त्यांनी दिली. मोबाईलवरुन प्रात्याक्षिकदेखील करून दाखविण्यात आले. याप्रसंगी गटविकास अधिकारी सावित्री खर्डे व पंचायत समितीचे विविध विभाग प्रमुख व कर्मचारी उपस्थित होते. दरम्यान गेल्यान आठवडय़ातच सरपंचांच्या तक्रारींच्या पाश्र्वभूमिवर झालेल्या वादळी बैठकीनंतर तिस:या दिवशीच जिल्हा परिषदेच्या अधिका:यांनी बैठक घेतल्यामुळे याबाबत कुठलाही विषय न आल्याने कर्मचा:यांनी सुटकेचा निश्वास सोडल्याची चर्चा पंचायत समितीच्या वतरुळात सुरू होती. मात्र याप्रकरणी वरिष्ठ अधिका:यांनी साफ दुर्लक्ष केल्याने पदाधिका:यांमध्ये तीव्र नाराजीचा सूर होता.