शहरं
Join us  
Trending Stories
1
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
2
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
3
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
4
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
5
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
6
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
7
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
8
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
9
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
10
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
11
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
12
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
13
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
14
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
15
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
16
“मुंबईत २०० जागांवर तयारी, ५० टक्के फॉर्म्युलाचा आग्रह, काँग्रेस…”; प्रकाश आंबेडकर थेट बोलले
17
MNS Shiv Sena UBT Alliance: ऐनवेळी ठाकरे बंधूंच्या युतीची घोषणा टळली, संजय राऊतांनी सांगितली नवी वेळ
18
Chanakya Niti: रातोरात श्रीमंत व्हाल, जर चाणक्यनीतीच्या 'या' ५ सवयी आजच लावून घ्याल
19
प्रसिद्ध व्हिस्की कंपनीने अचानक उत्पादन केले बंद! तब्बल १ हजार कर्मचाऱ्यांचे भविष्य टांगणीला
20
Dhurandhar: पाकिस्तानातील कराचीमध्ये राहायचे रणवीर सिंगचे आजोबा, पण घडलं असं काही की...
Daily Top 2Weekly Top 5

आॅक्सिजन बाबतही जिल्हा स्वयंपुर्ण करू -डॉ.राजेंद्र भारूड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 6, 2020 12:42 IST

रमाकांत पाटील । लोकमत न्यूज नेटवर्क कोरोनाची खबरदारी व उपाययोजना बाबत नंदुरबार जिल्हा प्रशासन सुरुवातीपासून सुक्ष्म नियोजन करीत असल्याने ...

रमाकांत पाटील ।लोकमत न्यूज नेटवर्ककोरोनाची खबरदारी व उपाययोजना बाबत नंदुरबार जिल्हा प्रशासन सुरुवातीपासून सुक्ष्म नियोजन करीत असल्याने कमी सुविधांमध्येही रुग्णांसाठी सेवेचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे. स्थानिक पातळीवर कोविड तपासणी लॅब सुरू झाल्याने तपासणीचे प्रमाणही वाढले असून रुग्णांची संख्या पूर्वीपेक्षा वाढत आहे. परंतु स्थिती नियंत्रणात असून रुग्णांना अधीक चांगली सेवा देण्यासाठी अनेक नवीन प्रस्ताव तयार केले आहेत. त्यातील महत्वाचा घटक म्हणजे आॅक्सीजनचे जनरेशन. प्रयोगशाळा प्रमाणेच आॅक्सीजनबाबतही जिल्हा स्वयंपुर्ण करण्याचे निश्चित केले असल्याची माहिती जिल्हाधिकारी डॉ.राजेद्र भारूड यांनी दिली.रुग्णांसाठी आॅक्सिजनची अवस्था सद्या काय आहे?जिल्ह्यात सद्या दिडशे रुग्णांना आॅक्सिजन बेड मिळू शकेल अशी सुविधा आहे. पण पुढील काळात जर रुग्ण वाढले तर रुग्णांना चांगली सेवा देता यावी व आॅक्सिजनचा तुटवडा भासू नये यासाठी नवीन प्रस्ताव आपण तयार केले आहेत. सद्या धुळे आणि जळगाव येथून आॅक्सिजनचे सिलिंडर मागविण्यात येत आहे. अर्थातच सिलिंडरसाठीचा प्रवास व दुसऱ्या जिल्ह्यावर अवलंबून राहणे या बाबी एखाद्या वेळी अडचणीच्याही ठरू शकतात. वेळेवर रुग्णांना आॅक्सिजन देता यावा व त्याची व्यापकता वाढावी यासाठी जिल्ह्यातच स्वतंत्र आॅक्सिजन जनरेशनची व्यवस्था आम्ही करीत आहोत. त्याचा प्रस्ताव तयार असून लवकरच मंजुरी मिळून कामाला सुरुवात होईल. साधारणत: २० ते २५ दिवसाचा कालावधी त्यासाठी लागण्याची शक्यता आहे. पण ते आवश्यक आहे. प्रयोगशाळा नसल्याने स्वॅब तपासणीसाठी धुळे व इतर ठिकाणी पाठवावे लागत होते. त्यामुळे अहवाल मिळायला काही किोविड सेटरमधील रुग्णांना चांगली सेवा देण्यासाठी संबधीतांना सुचना देण्यात आली आहे. जर रुग्णांच्या सेवेत कुणी कुचराई केल्यास त्याबाबतही कारवाई केली जाईल. शहाद्यातील मोहिदा केद्रावर काही अडचणी होत्या त्या दूर केल्या आहेत. सर्व रुग्णांना प्रशासनातर्फे आवश्यक ती सेवा दिली जात आहे. दवसांचा अवधी जात होता. तो प्रश्न सोडविण्यासाठी आपण जिल्ह्यातच अत्याधुनिक लॅब उभी केल्याने आता तात्काळ अहवाल मिळत आहे. जिल्ह्यात रुग्णांची संख्या तीन हजारापर्यंत गेली आहे. परंतु बरे होण्याचे प्रमाणही वाढले असून जवळपास साडे अठराशेपेक्षा अधीक रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण बºयापैकी आहे. त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याचे कारण नाही. पण सर्वांनी नियम पाळून जागृत राहणे आवश्यक आहे. स्वॅब तपासणीचे प्रमाणही वाढविले आहे. आतापर्यंत जवळपास ११ हजार जणांचे स्वॅब तपासले आहेत. नंदुरबार तालुक्यात सर्वाधिक पाच हजार १६७ व शहादा तालुक्यातील ३,२५६ जणांचे स्वॅब तपासले.