शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2025 : गुजरात टायटन्ससह रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु अन् पंजाब किंग्जला मिळालं प्लेऑफ्सचं तिकीट
2
ज्योती मल्होत्रा बनली होती पाकिस्तानसाठी 'अ‍ॅसेट', 'ऑपरेशन सिंदूर'च्या काळात होती शत्रूच्या संपर्कात
3
मुंबईत तिहेरी हत्याकांड! दोन कुटुंबाचा वाद विकोपाला, कोयत्यानेच एकमेकांवर हल्ला; ४ जण जखमी
4
'गौरव गोगोई ट्रेनिंगसाठी पाकिस्तानला गेले होते', काँग्रेसच्या खासदारावर भाजपच्या मुख्यमंत्र्याचा गंभीर आरोप
5
Mumbai: ड्रग्ज तस्करांना दणका! १३ कोटींचे एमडी जप्त; मुंबई आणि नवी मुंबईतील पाच जणांना अटक
6
Solapur Fire: आगीत ८ जणांचा मृत्यू, PM मोदींनी व्यक्त केला शोक; CM फडणवीसांकडून पाच लाखांच्या मदतीची घोषणा
7
किंग कोहलीपेक्षा फास्टर निघाला KL राहुल! टी-२० त जलदगतीने गाठला ८००० धावांचा पल्ला
8
हल्दी घाटीमध्ये सराव, CDS ची रणनीती आणि..., अशी आहे ऑपरेशन सिंदूरच्या यशाची Inside Story  
9
गडचिरोली: यू-टर्न घेताना घात झाला अन् भरधाव ट्रक येऊन धडकला, कारमधील चौघे जागीच ठार
10
नाम तो सुना होगा! केएल राहुलनं शतकी खेळीसह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा एकमेव फलंदाज
11
कुख्यात दहशतवादी सैफुल्लाह खालिद ठार, भारतात झालेल्या तीन हल्ल्यांमागे होता हात, पाकिस्तानमध्ये अज्ञातांनी झाडल्या गोळ्या  
12
या महिलेवर लक्ष ठेवा, त्याने वर्षभरापूर्वीच दिला होता इशारा, आता त्या ट्विटची होतेय चर्चा
13
अभिनेत्री नुसरत फारियाला ढाका विमानतळावर अटक; कोणत्या प्रकरणात झाली कारवाई?
14
आणखी एका पाकिस्तानी हेराला ठोकल्या बेड्या, ISIला भारताची गोपनीय माहिती पुरवणारा अरमान अटकेत  
15
RR विरुद्धच्या विजयासह PBKS चा प्लेऑफ्सचा पेपर झाला सोपा! आता GT च्या निकालावर असतील नजरा, कारण...
16
भोकरदन तालुक्यात दोन वेगवेगळ्या ठिकाणी वीज कोसळून दोघांचा दुर्दैवी मृत्यू
17
समुद्रात तैनात केला जाणार मेड इन इंडिया 'रक्षक', गौतम अदानी यांच्या कंपनीने केली मोठी डील
18
IPL 2025: मोठी बातमी! SRHचा स्टार क्रिकेटर कोरोना पॉझिटिव्ह; काव्या मारनची डोकेदुखी वाढली!
19
'लष्कराचा पराक्रम वस्तू असल्यासारखं विकत आहेत', तिकीट दाखवत कुणी केलीये भाजपवर टीका?
20
ज्योती मल्होत्राचा पहलगाम दहशतवादी हल्ल्याशी काय संबंध? पोलिसांनी केला मोठा खुलासा...

जमिन खरेदीकडे लाभाथ्र्याची पाठ : दादासाहेब गायकवाड सबलीकरण योजना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2018 12:45 IST

नंदुरबार : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेंतर्गत 13 वर्षात केवळ 507 लाभाथ्र्याना शेत जमिनी मिळवून  देण्यास समाज कल्याण विभागाला यश आले आह़े सदर योजना संपूर्ण राज्यभरात 2004 पासून सुरु करण्यात आलेली आह़ेअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान  योजना सन 2004 पासून संपूर्ण राज्यभरात लागू ...

नंदुरबार : कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण स्वाभिमान योजनेंतर्गत 13 वर्षात केवळ 507 लाभाथ्र्याना शेत जमिनी मिळवून  देण्यास समाज कल्याण विभागाला यश आले आह़े सदर योजना संपूर्ण राज्यभरात 2004 पासून सुरु करण्यात आलेली आह़ेअनुसूचित जाती व नवबौध्द घटकांसाठी कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबलीकरण व स्वाभिमान  योजना सन 2004 पासून संपूर्ण राज्यभरात लागू  करण्यात आली आहे. या योजनेंतर्गत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील दारिद्रय रेषेखालील भूमिहीन कुटुंबियांना 4 एकर जिरायत (कोरडवाहू), दोन एकर बागायती (ओलीताखालील) जमिन उपलब्ध करून देण्यात येते. जमिन खरेदीसाठी येणा:या खर्चापैकी 50 टक्के रक्कम बिनव्याजी कर्ज व 50 टक्के रक्कम अनुदानाव्दारे देण्यात येत असत़े जिरायत आणि बागायत बागायत जमिन खरेदी करण्यासाठी शासनाकडून अनुदान देण्यात येत असत़े दरम्यान, प्रती एकर जिरायत क्षेत्रासाठी 5 लाख तर, बागायती क्षेत्रासाठी 8 लाखांची मदत करण्यात येत असत़े अनुसूचित जाती तसेच नवबौध्द  समाजातील भूमिहिन कुटुबियांचे जीवनमान सुधारावे, त्यांना उत्पन्नाचे साधण निर्माण व्हावे, तसेच त्यांना कायमस्वरुपी रोजगार मिळावा यासाठी राज्य शासनाकडून समाज कल्याण विभागामार्फत कर्मवीर दादासाहेब गायकवाड  सबलीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत असत़े या माध्यमातून लाभाथ्र्याना शेती करण्यासाठी जमिन मिळवून देण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून प्रयत्न करण्यात येत असतात़ सदर योजना 1 एप्रिल 2004 पासून सुरु करण्यात आली असली तरी प्रत्यक्षात योजनेबाबची कार्यवाही 2005 पासून सुरु करण्यात आली़ त्यामुळे 2005 ते 2017 र्पयत केवळ 507 लाभाथ्र्यानाच योजनेचा लाभ मिळाला असल्याची माहिती समाज कल्याण विभागाकडून देण्यात आलेली आह़े त्यामुळे योजनेचा खरा उद्देश सफल होतोय की नाही? याबाबत अनेकांकडून शंका उपस्थित करण्यात येत आह़े लाभाथ्र्यामध्ये निरुत्साहलाभाथ्र्याना जमिन मिळवून देण्यासाठी समाज कल्याण विभागाकडून जमिन विक्रेत्यांचा शोध घेण्यात येत असतो़ परंतु शासकीय दरानुसार जमिनीची विक्री करणे अनेकांना परवडणारे नसत़े त्यामुळे अल्पदरात जमिन विक्री करण्यास जमिन मालक सहमत नसल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले आह़े त्याुळे साहजिकच लाभाथ्र्यानाही योजनेअंतर्गत जमिन मिळण्यास अडचणी निर्माण होत असल्याचे सांगण्यात आल़े शासनाकडून मिळणार 100 टक्के अनुदान जमिन खरेदी करण्यासाठी लाभाथ्र्याला जमिनीची 50 टक्के किंमत मोजावी लागत असत़े तर उर्वरी 50 टक्के रक्कम शासनाकडून निधीच्या स्वरुपात भरली जात असत़े परंतु तरीदेखील योजनेसाठी लाभाथ्र्याचा निरुत्साह दिसून येत असल्याने शासनाकडून याबाबत 100 टक्के अनुदान देण्याबाबत विचार सुरु असल्याची माहिती आह़े त्यामुळे योजनेसाठी लाभार्थी संख्येत भर पडेल अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आह़े  समाज कल्याण विभागातर्फे अनुसूचित जाती तसेच नवबौध्दांसाठी विविध शासकीय योजना राबविण्यात येत असतात़ त्यापैकीच एक अत्यंत महत्वाकांक्षी योजना म्हणून कर्मवीर दादासाहेब गायकवाड सबळीकरण व स्वाभिमान योजना राबविण्यात येत आह़े या योजनेचा मुख्य उद्देश लाभाथ्र्याना शेत जमिनी मिळवून देणे आह़े परंतु बदलत्या शेती पध्दती, आसमानी संकटामुळे शेती करण्यासाठी धजावत नसल्याचे सांगण्यात येत आह़े त्यामुळे योजनेंतर्गम जमिन घेऊन तीला कसण्याबाबत उदासिनता दिसून येत असल्याचे दिसून येत़े दारिद्रय रेषेखालील अनुसूचित जाती व नवबौध्दांना जी जमिन वाटप करावयाची आह़े त्या जमिनीचे दर निश्चित करणे, खरेदी करणे, तसेच लाभाथ्र्याची निवड करण्यासाठी, संबंधित जिल्ह्याचे जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती स्थापन करण्यात येत असत़े यात, समितीचे अध्यक्ष जिल्हाधिकारी, सदस्य म्हणून जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, जिल्हा कृषी अधिकारी, जिल्हा अधिक्षक भूमिअभिलेख, सह निबंधक, नोंदणी शुल्क व मुल्यांकन, संबंधित तालुक्याचे उपविभागीय अधिकारी व सदस्य सचिव म्हणून समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त काम करीत असतात़