शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! शरद पवारांनी भाकरी फिरवली! जयंत पाटलांचा राजीनामा; या नेत्याकडे सोपवणार सूत्रे
2
१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश; शरद पवारांनी मानले मोदी सरकारचे आभार
3
छत्तीसगडच्या सुकमामध्ये २३ नक्षलवाद्यांनी एकत्र आत्मसमर्पण केले, त्यांच्यावर १.१८ कोटी रुपयांचे होते बक्षीस
4
GST Meeting: मध्यमवर्गीयांना मोठा दिलासा मिळण्याची शक्यता; एसीपासून टुथपेस्टपर्यंत होऊ शकतात स्वस्त
5
लग्नाच्या रात्रीच नवरी करणार होती कांड, पण नवरदेव निघाला भलताच हुशार! मित्रांना घरी बोलावलं अन्... 
6
Recipe : किसलेल्या दोडक्याची ‘अशी’ चमचमीत करा भाजी, चव जबरदस्त-दोडक्याचेच व्हाल फॅन!
7
दोन वर १ शेअर मिळणार फ्री, 'ही' कंपनी ग्रहकांना देणार भेट; याच महिन्यात जमा होणार, तुमच्याकडे आहे का?
8
Air India Plane Crash : इंजिन थांबले, पण प्रयत्न सुरूच होते...; दोन्ही वैमानिकांनी शेवटच्या क्षणापर्यंत झुंज दिली
9
West Bengal Accident: जगन्नाथाच्या दर्शनासाठी जाताना भाविकांवर काळाचा घाला, वाटेतच ट्रकला धडक, कारमधील ४ जण ठार!
10
“१२ किल्ल्यांचा युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत समावेश झाल्याचा आनंद, अभिमान”: DCM अजित पवार
11
UNESCO 12 Forts: "जेव्हा आपण गौरवशाली मराठा साम्राज्याबद्दल बोलतो, तेव्हा..."; PM मोदींनी व्यक्त केला आनंद
12
काँग्रेसला धक्का! धंगेकर, थोपटेनंतर काँग्रेसचा आणखी एक माजी आमदार भाजपमध्ये करणार प्रवेश
13
Ahmedabad Plane Crash : विमानात नेमका कुठे असतो 'फ्यूअल स्विच'? कोण करू शकतं याला चालू-बंद?
14
जनसुरक्षा विधेयकाला उद्धवसेनेचा विरोध; भाजपाची टीका, नेते म्हणाले, “महाविकास आघाडी...”
15
राज ठाकरे मुख्यमंत्री झाले तर महाराष्ट्र कसा असेल?, तेजस्विनी पंडितने दिली प्रतिक्रिया
16
“एसटीने घडविले ९ लाख ७१ हजार भाविक-प्रवाशांना विठ्ठल दर्शन”; प्रताप सरनाईकांची माहिती
17
१२ किल्ल्यांचा युनेस्को यादीत समावेश, राज ठाकरे म्हणाले, "ही अतिशय आनंदाची बाब, त्यासोबतच..."
18
ना कोणता साईड बिझनेस, ना जास्त पगार.., ४५ व्या वर्षी रिटायरमेंट आणि ४.७ कोटींची नेटवर्थ, कसं झालं हे शक्य?
19
Viral Video: भाजप नेत्याला एका महिलेसोबत कारमध्ये नको त्या अवस्थेत पाहिलं, व्हिडीओ व्हायरल!
20
नेपाळ मार्गे भारताला हादरवण्याचा प्लॅन, जैश अन् लष्करची मोठी योजना उघड

विधानसभा निवडणुकीची आजपासून रणधुमाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 27, 2019 12:24 IST

लोकमत न्यूज नेटवर्क नंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह अक्कलकुवा, नवापूर, शहादा विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, 27 सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात ...

लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : जिल्ह्यातील नंदुरबारसह अक्कलकुवा, नवापूर, शहादा विधानसभा मतदारसंघासाठी शुक्रवार, 27 सप्टेंबरपासून अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. यासाठी चारही मतदार संघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालय सज्ज ठेवण्यात आले आहे. जिल्ह्यातील चारही मतदार संघ हे एस.टी.प्रवर्गासाठी राखीव आहेत. दरम्यान, चारही मतदार संघात काँग्रेस, भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, वंचीत आघाडी सक्रीय झाले आहेत. विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी शुक्रवार, 27 पासून सुरू होत आहे. निवडणुकीची अधिसुचना प्रसिद्ध होताच उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात होणार आहे. चारही ठिकाणी तहसील कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी यांचे कार्यालय सज्ज करण्यात आले आहे. शुक्रवार व शनिवार नंतर रविवारी सुट्टी राहील. सोमवार मंगळवार त्यानंतर बुधवारी म.गांधी जयंती दिनाची सुट्टी राहणार आहे. पुन्हा गुरुवार व शुक्रवार ेहे दोन दिवस अर्ज भरण्याचे राहणार आहे. याच दिवशी अर्ज विक्री देखील होणार आहे. अर्ज भरण्यास जाणा:यांना पूर्व परवाणगीने रॅली काढता येणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी यांच्या दालनात अर्ज दाखल करण्यास जातांना मात्र केवळ पाच जणांनाच परवाणगी राहणार आहे. अर्जा सोबत शपथपत्र आणि आवश्यक कागदपत्रांची पुर्तता करणे आवश्यक राहणार आहे. निवडणूक निर्णय अधिकारी कार्यालयात व परिसरात आवश्यक तो पोलीस बंदोबस्त देखील तैणात करण्यात येणार आहे. नंदुरबार जिल्ह्यात चार विधानसभा मतदारसंघात एकुण 12,24, 429 मतदार मतदान करणार आहेत. त्यात 6,12,389 पुरुष तर 6,12,27 महिला मतदार आणि 13 तृतीय पंथी मतदार आहेत. 398 सैनिक मतदार असून त्यात 389 पुरुष तर नऊ महिला मतदार आहेत. निवडणूक निर्णय अधिकारी यांना सहायक म्हणून दोन सहायक निवडणूक अधिकारी देखील राहणार आहेत. सर्वच ठिकाणी स्थानिक तहसीलदार तसेच पालिकेचे मुख्याधिकारी असतील. पालिकेचे मुख्याधिकारीपद रिक्त असल्यास गटविकास अधिकारी हे सहायक राहणार आहेत. राजकीय पक्ष सज्जनिवडणुकीसाठी राजकीय पक्ष देखील सज्ज झाले आहेत. अद्याप कुठल्याही पक्षाने उमेदवारी यादी जाहीर केलेली नसली तरी इच्छूक उमेदवार तयारीत आहेत. काँग्रेस चारही ठिकाणी उमेदवार उभे करणार आहे. तर भाजप-सेना युतीचे काय ठरते त्यावर दोन्ही पक्ष आपले उमेदवार देणार आहेत. राष्ट्रवादीला जिल्ह्यात एकही जागा सुटणार नसल्याचे स्पष्ट झाल्यानंतर जिल्ह्यातील प्रमुख नेत्यांनी पक्ष सोडण्याचा  निर्णय यापूर्वीच जाहीर केला आहे. वंचीत आघाडीने देखील चारही ठिकाणी उमेदवार देणार असल्याचे यापूर्वीच स्पष्ट केले आहे. यामुळे या निवडणुकीत देखील बहुरंगी लढती राहण्याची शक्यता आतार्पयतच्या एकुण राजकीय चित्रावरून दिसून येते. 

उमेदवारी अर्ज दाखल करण्याची वेळ27 रोजी निवडणुकीची अधिसुचना प्रसिद्ध झाल्यापासून अर्ज दाखल करता येतील. सार्वजनिक सुट्टी वगळता सकाळी अकरा ते दुपारी तीन वाजेर्पयत अर्ज दाखल करण्याची वेळ राहणार आहे. 27, 28 रोजी श्राद्ध पक्ष आहे. 29 रोजी रविवारची सुटी असेल. 2 ऑक्टोबर रोजी म.गांधी यांच्या जयंतीची सुट्टी राहणार आहे. त्यामुळे श्राद्ध पक्षानंतर चारच दिवस अर्ज दाखल करण्यासाठी उमेदवारांना मिळणार आहे.