शहरं
Join us  
Trending Stories
1
"पुढील २४ तासांत मी भारतावर आणखी..."; डोनाल्ड ट्रम्प यांचा पुन्हा थयथयाट; नवीन इशारा काय?
2
जायचं होतं जपानला, पोहोचल्या जयपूरला! युक्रेनच्या अध्यक्षांची बायको भारतात कशा पोहोचल्या?
3
₹500 नोट एटीएममधून मिळणे बंद होणार? मोदी सरकारने संसदेत दिले उत्तर
4
मुलगा वापरायचा मृत आईचं बँक खातं, अचानक खात्यात आले १०० कोटी रुपये, त्यानंतर...
5
निळेशार डोळे असलेल्या मॉडेलचं डोनाल्ड ट्रम्प का करतायत तोंडभरून कौतुक? कारण खूपच खास
6
Video - "पळ भावा पळ..."; ढिगाऱ्यात अडकलेल्या दोघांनी मृत्यूला दिला चकवा, पुरात चमत्कार
7
कबुतरांना खाद्य मिळण्याचा मार्ग मोकळा; कबुतरखान्यांबद्दल CM फडणवीसांचा महत्त्वाचा निर्णय
8
भारताला धमकी मिळाल्यानंतर रशिया संतापला; अमेरिकेला सांगितलं, 'धमकी देऊ नका'
9
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीचा कार्यक्रम ठरला; कधी होणार महापालिका निवडणुका?
10
निसर्गाचा प्रकोप! ३४ सेकंदात सगळंच संपलं, सुंदर धरालीच्या विनाशाचे धडकी भरवणारे फोटो
11
एसटी महामंडळ राज्य शासनाचे अधिकृत यात्री ॲप चालवणार, परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा
12
तयारीला लागा! उद्धव ठाकरेंचे पदाधिकाऱ्यांना आदेश; मनसेसोबतच्या युतीबाबत म्हणाले...
13
बेस्टच्या ऑफिसमध्ये पैसे उडवून डान्स? २०१७ मधल्या 'त्या' घटनेवर माधवी जुवेकर म्हणाली- "रात्री दोन मंत्र्यांचे फोन आले..."
14
७०, ५०, ४० की ३५ किलो; ट्रेनमध्ये किती सामान घेऊन जाऊ शकता? अन्यथा मोठा दंड होऊ शकतो
15
Vastu Tips: दारात ठेवण्याचे पायपुसणे हिरव्याच रंगाचे का असावे? खरंच होतो का भाग्योदय?
16
खिशातून एक रुपयाही न भरता शेतकऱ्यांना मिळेल वार्षिक ३६,००० पेन्शन, योजनेचा कसा घ्यायचा फायदा?
17
Shravan Purnima 2025: नारळी पौर्णिमेला समुद्राला श्रीफळ का अर्पण करतात? त्यामागे आहे 'हे' विशेष कारण!
18
"न्यायपालिकेला राजकीय आखाडा बनवण्याचा प्रकार नाही का?", आरती साठेंच्या न्यायमूर्तीपदी नियुक्तीला रोहित पवारांचा विरोध
19
Mumbai: कबुतरखान्यावरून आदित्य ठाकरेंची देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदेंवर टीका
20
"ढगफुटीमुळे हॉटेल्स, लॉज, बाजारपेठा, गाव उद्ध्वस्त..."; प्रत्यक्षदर्शींनी सांगितला भयंकर अनुभव

ले मशाले चल पडे है लोग मेरे गांव के..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:18 IST

जिल्हा प्रशासनासह गाव एकवटले : दुष्काळाचा अंध:कार दूर करण्यासाठी कोठली ग्रामस्थ सज्ज

नंदुरबार : ‘ले मशाले चल पडे है लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीतलेंगे लोग मेरे गांव के..’ हिंदीचे प्रख्यात कवी बल्लीसिंह चिमा यांच्या या प्रेरणा गीतातील बोलीचा प्रत्यय कोठली, ता.नंदुरबार येथे ग्रामस्थांच्या कृतीतून पहायला मिळाले. निमित्त होते दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या कामाच्या शुभारंभाचे.जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहे. जमिनीतील पाण्याची पातळी गेल्या काही वर्षापासून खोल जात असल्याने अनेक गावात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पाण्यासाठी ग्रामीण भागातील लोक अक्षरश: पेटून उठले आहेत. पाणी फाऊंडेशनतर्फे गेल्या वर्षापासून वॉटरकप स्पर्धा सुरू आहे. त्यानिमित्ताने अनेक गावे श्रमदानातून व लोकसहभागातून जलसंधारणाची कामे राबवून दुष्काळावर मात करण्याचा प्रय} करीत आहे. या वर्षी देखील या स्पर्धेला सोमवार दि.8 एप्रिलपासून सुरूवात झाली. त्यासाठी जिल्हाभरातील जवळपास 40 पेक्षा अधिक गावांनी मध्यरात्रीच श्रमदानाला सुरूवात करून कामाचा शुभारंभ केला आहे.याच पाश्र्वभूमीवर रविवारची मध्यरात्र कोठली, ता.नंदुरबार येथील ग्रामस्थांसाठी एक आगळी आणि चैतन्यदायी ठरली. याठिकाणी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सांगळे, अनिकेत पाटील, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सुकदेव भोसले, तालुका समन्वयक सूरज शिंदे, कथाकार जिज्ञासा दिदि, ग्रामविकास अधिकारी आर.डी. पवार, कोठलीचे जलमित्र व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कार्याचा शुभारंभ झाला. यासाठी तेथील जिल्हा परिषद शाळेचे आवार आबालवृद्ध व महिलांनी गच्च भरले होते. सारे गाव एकवटले होते. याचठिकाणाहून दुष्काळमुक्तीचा संकल्प करीत मशाल पेटवून संपूर्ण गावात मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीने गावक:यांमध्ये एक अनोखे चैतन्य भरले. गावातील प्रत्येक गल्लीबोळातून ही रॅली निघाली. गावालगतच असलेल्या एका शेतशिवारात त्याचा समारोप झाला. तेथे दुष्काळरूपी प्रतिकात्मक रावणाचे दहन करण्यात आले आणि मध्यरात्री बरोबर 12 वाजून एक मिनीटांनी श्रमदानाला सुरूवात झाली. जवळपास  दोन हजारापेक्षा अधिक ग्रामस्थ, महिला, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक यात सहभागी झाले. पहाटे अडीचर्पयत या सर्वानी श्रमदान केले. तब्बल सहा तास चाललेल्या या कार्यक्रमात ग्रामस्थांच्या चेह:यावर जबरदस्त आत्मविश्वास व उत्साह ओसंडून वाहताना दिसला. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आणि त्याला हरविण्याची एक अनोखी जिद्द ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळाली. गावातील जलमित्र दीपक पाटील, सागर पटेल, विलास पटेल, डॉ.शिरीष पाटील, प्रल्हाद पाटील, बलराम पाटील, संदीप पाटील, जगदीश पाटील, कुंदन पाटील, रामेश्वर पाटील, नारायण पाटील, कैलास पाटील, राहुल पाटील, गणेश पाटील, मनीष पाटील, वैभव पाटील, योगेश पाटील, दुर्गा पाटील, दत्तात्रय पाटील, दीपक पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले.