शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
4
Ravindra Erande : खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
5
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
6
मराठ्यांच्या अंगावर धनगर, मुस्लिम आणि दलित घालण्याचे षडयंत्र आहे का? : मनोज जरांगे पाटील
7
अशोक खरात प्रकरण: "संजय राऊतांनी बाकीची उठाठेव सोडून आपल्या..."; भाजपचा उद्धवसेनेवर पलटवार
8
Vastu Shastra: तुमच्या घरातील घड्याळ तुमची प्रगती थांबवतंय का? वास्तुशास्त्राचे 'हे' नियम एकदा नक्की वाचा!
9
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
10
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
11
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
12
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
13
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
15
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
16
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
17
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
18
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
19
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
20
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
Daily Top 2Weekly Top 5

ले मशाले चल पडे है लोग मेरे गांव के..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2019 12:18 IST

जिल्हा प्रशासनासह गाव एकवटले : दुष्काळाचा अंध:कार दूर करण्यासाठी कोठली ग्रामस्थ सज्ज

नंदुरबार : ‘ले मशाले चल पडे है लोग मेरे गांव के, अब अंधेरा जीतलेंगे लोग मेरे गांव के..’ हिंदीचे प्रख्यात कवी बल्लीसिंह चिमा यांच्या या प्रेरणा गीतातील बोलीचा प्रत्यय कोठली, ता.नंदुरबार येथे ग्रामस्थांच्या कृतीतून पहायला मिळाले. निमित्त होते दुष्काळावर मात करण्यासाठी पाणी फाऊंडेशनच्या कामाच्या शुभारंभाचे.जिल्ह्यात सध्या पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहे. जमिनीतील पाण्याची पातळी गेल्या काही वर्षापासून खोल जात असल्याने अनेक गावात भीषण दुष्काळी स्थिती निर्माण झाली आहे. अशा स्थितीत पाण्यासाठी ग्रामीण भागातील लोक अक्षरश: पेटून उठले आहेत. पाणी फाऊंडेशनतर्फे गेल्या वर्षापासून वॉटरकप स्पर्धा सुरू आहे. त्यानिमित्ताने अनेक गावे श्रमदानातून व लोकसहभागातून जलसंधारणाची कामे राबवून दुष्काळावर मात करण्याचा प्रय} करीत आहे. या वर्षी देखील या स्पर्धेला सोमवार दि.8 एप्रिलपासून सुरूवात झाली. त्यासाठी जिल्हाभरातील जवळपास 40 पेक्षा अधिक गावांनी मध्यरात्रीच श्रमदानाला सुरूवात करून कामाचा शुभारंभ केला आहे.याच पाश्र्वभूमीवर रविवारची मध्यरात्र कोठली, ता.नंदुरबार येथील ग्रामस्थांसाठी एक आगळी आणि चैतन्यदायी ठरली. याठिकाणी जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील, उपमुख्य कार्यकारी अधिकारी सांगळे, अनिकेत पाटील, गटविकास अधिकारी अशोक पटाईत, शिक्षणाधिकारी डॉ.राहुल चौधरी, पाणी फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक सुकदेव भोसले, तालुका समन्वयक सूरज शिंदे, कथाकार जिज्ञासा दिदि, ग्रामविकास अधिकारी आर.डी. पवार, कोठलीचे जलमित्र व ग्रामस्थांच्या उपस्थितीत या कार्याचा शुभारंभ झाला. यासाठी तेथील जिल्हा परिषद शाळेचे आवार आबालवृद्ध व महिलांनी गच्च भरले होते. सारे गाव एकवटले होते. याचठिकाणाहून दुष्काळमुक्तीचा संकल्प करीत मशाल पेटवून संपूर्ण गावात मशाल रॅली काढण्यात आली. या रॅलीने गावक:यांमध्ये एक अनोखे चैतन्य भरले. गावातील प्रत्येक गल्लीबोळातून ही रॅली निघाली. गावालगतच असलेल्या एका शेतशिवारात त्याचा समारोप झाला. तेथे दुष्काळरूपी प्रतिकात्मक रावणाचे दहन करण्यात आले आणि मध्यरात्री बरोबर 12 वाजून एक मिनीटांनी श्रमदानाला सुरूवात झाली. जवळपास  दोन हजारापेक्षा अधिक ग्रामस्थ, महिला, युवक, युवती, ज्येष्ठ नागरिक यात सहभागी झाले. पहाटे अडीचर्पयत या सर्वानी श्रमदान केले. तब्बल सहा तास चाललेल्या या कार्यक्रमात ग्रामस्थांच्या चेह:यावर जबरदस्त आत्मविश्वास व उत्साह ओसंडून वाहताना दिसला. दुष्काळाशी दोन हात करण्यासाठी आणि त्याला हरविण्याची एक अनोखी जिद्द ग्रामस्थांमध्ये पाहायला मिळाली. गावातील जलमित्र दीपक पाटील, सागर पटेल, विलास पटेल, डॉ.शिरीष पाटील, प्रल्हाद पाटील, बलराम पाटील, संदीप पाटील, जगदीश पाटील, कुंदन पाटील, रामेश्वर पाटील, नारायण पाटील, कैलास पाटील, राहुल पाटील, गणेश पाटील, मनीष पाटील, वैभव पाटील, योगेश पाटील, दुर्गा पाटील, दत्तात्रय पाटील, दीपक पाटील यांच्यासह ग्रामस्थांनी नियोजनासाठी परिश्रम घेतले.