शहरं
Join us  
Trending Stories
1
"उद्या सुट्टी आहे, माझ्या अंत्ययात्रेला या"; पतीसाठी भावनिक चिठ्ठी लिहून विवाहितेने संपवलं जीवन!
2
बारामतीची लढत थांबणार? पोटनिवडणुकीत काँग्रेसने उमेदवारी मागे घेण्यासाठी ठेवली 'ही' अट!
3
सुरक्षित आणि करमुक्त गुंतवणुकीसाठी PPF उत्तम पर्याय; दरमहा ११,००० रुपयांच्या गुंतवणुकीवर मिळवा इतका परतावा
4
'तुमच्या तपस्येतच नाही तर फोटोशॉपमध्येही उणीव', हिमंता बिस्वा सरमांच्या पत्नीचा पवन खेडा यांना टोला
5
Crude Oil Price Hike: कच्च्या तेलाच्या किमतीत जोरदार तेजी; ट्रम्प यांच्या धमक्यांनी सातत्यानं बिघतंय सामान्यांचं बजेट
6
मुंबई पालिका क्षेत्रात महिलांकरता मोफत स्वच्छतागृहांच्या सुधारित धोरणासाठी प्रयत्नशील! - महापौर
7
आजचे राशीभविष्य, ०६ एप्रिल २०२६: घरात शांती व समाधानाचे वातावरण; अचानक पैसा खर्च होईल
8
भोंदू अशोक खरात प्रकरणाची EDमार्फत चौकशी; CDR प्रकरणातही मुख्यमंत्र्यांचे चौकशीचे आदेश
9
Gaurav More: 'हास्यजत्रा' फेम गौरव मोरेने गुपचुप केलं लग्न? ऋतुजा बागवे लिहिते- "Mr. & Mrs मोरे"
10
लेख: मुंबईकरांची लोकलराणी वारंवार का अडखळतेय? आजकाल धाप लागल्यासारखी करतेय...
11
होर्मुझ उघडा, अन्यथा तुम्ही नरकात सडाल! ट्रम्प यांची शिवराळ भाषेत इराणवर जबर हल्ल्याची धमकी
12
लेख: शिक्षिकेऐवजी नेत्याचा, पोलिसाचा मुलगा असता तर..? चार वर्षांच्या विघ्नेशची उपचारासाठी फरफट
13
विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीत चार राज्यांमध्ये तब्बल ६५० कोटींची रोख रक्कम-मद्य जप्त
14
राज्याच्या अर्थ खात्यातील बडा मासा गळाला; सहा लाखांची लाच घेताना एसीबीने ठोकल्या बेड्या
15
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
16
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
17
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
18
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
19
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
20
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
Daily Top 2Weekly Top 5

नंदुरबार जिल्ह्यात अफवांचा बाजार आणतोय कायदा व सुव्यवस्था धोक्यात

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: June 29, 2018 13:17 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अफवांची मानसिकता नागरिकांच्या मनात कशी घर करून जाते याचे उदाहरण गेल्या दोन महिन्यांपासून पहावयास मिळत आहे. लहान मुले पकडणारे गावोगावी, शहराशहरात फिरत असल्याच्या अफवा आणि त्यातून समाजमनात निर्माण झालेली अस्थिरता याचे उदाहरण अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. नंदुरबारात देखील महिनाभरात किमान दहा जणांना अशा ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अफवांची मानसिकता नागरिकांच्या मनात कशी घर करून जाते याचे उदाहरण गेल्या दोन महिन्यांपासून पहावयास मिळत आहे. लहान मुले पकडणारे गावोगावी, शहराशहरात फिरत असल्याच्या अफवा आणि त्यातून समाजमनात निर्माण झालेली अस्थिरता याचे उदाहरण अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. नंदुरबारात देखील महिनाभरात किमान दहा जणांना अशा प्रकारे संशयावरून विनाकारण मार खावा लागल्याचे चित्र आहे. वास्तविक जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात लहान मुलांचे अपहरण होणे किंवा बेपत्ता होण्याचे जेही प्रकार गैरसमजातून घडले आहेत त्यातील मुलं सुखरूप परत आली आहेत. त्यामुळे अशा प्रकारची टोळी किंवा व्यक्ती जिल्ह्यात कार्यरत आहेत ही बाबच अनाकलनीय आहे. यासंदर्भात पोलिसांनी अशा अफवांबाबत उशीराने कडक कारवाईचे धोरण अवलंबले असल्याने अशा अफवांना पायबंद बसेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.   अफवांचे मानसशास्त्र मोठे विचित्र असते. वारंवार एकच अफवा किंवा बातमी फैलवली, कानावर पडली तर त्याबाबत समाजमनात विश्वास निर्माण होऊन ते खरेच असल्याचे बिंबत असते. आता तर सोशल मिडियाची भर पडली आहे. उठसूठ कुणीही काहीही मेसेज तयार करतो आणि देतो सोशल मिडियावर टाकून. परिणामी तो व्हायरल होऊन तो खराच असल्याची चर्चा रंगते. त्याची सत्यता कुठेही पडताळली जात नाही. एकापेक्षा अधीक गृपवरून तो मेसेज आल्यावर तर सत्य असल्याचा त्यावर शिक्कामोर्तबच होतो. सध्या लहान मुलांच्या अपहरणाचे मेसेज देखील पोलिसांची आणि एकुण समाजमनाची मोठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. यामुळे अनेकांना मार खावा लागला तर काहींच्या जिवावरही बेतले आहे. एका शिक्षिकेलाही त्यातून जावे लागले. पोलीस दप्तरी नोंदी लक्षात घेतल्या तर गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत बालकांचे अपहरण झाल्याच्या अवघ्या तीन ते चार नोंदी आहेत. त्या प्रकरणातील बालकं नंतर सुखरूप घरी पोहचली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मुलांचे अपहरणाचे वृत्त निराधार ठरते. नंदुरबार शहरात गेल्या महिन्यात रेल्वे स्थानकावरून एका तीन वर्षाच्या बालकाला एक माथेफिरू घेवून जात असल्याचे लक्षात आल्यावर त्याला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. त्याची चौकशी करता तो परप्रांतीय असून मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरी घटना सिंधी कॉलनीत घडली. घराच्या अंगणात खेळत असलेल्या एका चार वर्षीय बालकाला एकाने सायकलवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. संबधीत व्यक्ती देखील चांगल्या घरातील असून मानसिक तणावाखालील होती. या दोन घटनांचा अन्वायर्थ सहज म्हणून घेतला गेला. परंतु अशा लोकांचा अपहरणाचा उद्देश राहत नसला तरी त्यांच्याकडून मुलांना काही अपाय झाला तर त्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न कायम राहतो. प्रकाशा येथील दोन बहिणींच्या अपहरणाचे प्रकरणही चांगलेच गाजले. न्यायालयात शिक्षा भोगून आलेल्या एका वृद्धाने मुलींना सोबत नेले. त्या मुली सुरत येथे सुखरूप सापडल्या. सुदैवाने त्या सुरक्षीत राहिल्या. या प्रकरणात देखील मुली घेवून गेलेल्याचा उद्देश अपहरणाचा नसल्याचे स्पष्ट होते. परंतु आणखी काही दिवसात या मुली सुरत सारख्या शहरात एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या हातात पडल्या असत्या तर?  हा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे एखाद्या घटनांची अफवा पसरवतांना त्यातून पुढे काय वाढून ठेवलेले असेल याचाही विचार करणे आवश्यक असतो.अफवा पसरविणा:या आणि सोशल मिडियावर चुकीचे मेसेज टाकणा:यांवर आता सायबर अॅक्टनुसार कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकाराला काही प्रमाणात पायबंद बसेल यात शंका नाही. परंतु अशा बाबतीत पोलिसांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून दक्ष राहावे. अफवांच्या चर्चेत काहीवेळा समाजकंटक आपला उद्देशही साध्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘लांडगा आला रे आला..’ या म्हणीसारखी गत होऊ नये एवढेच.