शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
म्हाडाने घर विक्रीसाठी प्रतिनिधी नेमलेले नाहीत; ५,२८५ घरांसाठी नोंदणी सुरू; १३ ऑगस्टपर्यंत करा अर्ज 
3
आजचे राशीभविष्य, १५ जुलै २०२५: नकारात्मक वृत्ती दूर ठेवल्याने आर्थिक लाभ होईल
4
दीड महिना झाला... भोलानाथ, सांग पाऊस कधी येणार! शहर, उपनगरात हजेरी; मात्र मोठ्या पावसाची प्रतीक्षा
5
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
6
संपादकीय: रयतेच्या राजाचा वारसा! आपल्याला तरी समजला आहे का?
7
कुचकामी कायदा, बनावट प्रमाणपत्रे आणि खोटे दिव्यांग; पूजा खेडकर एकटी नाही...
8
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
9
नवीन शिक्षण धोरणानुसार राज्यातील पुस्तके टप्प्याटप्प्याने बदलणार!
10
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
11
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
12
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
13
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
14
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
15
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
16
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
17
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
18
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
19
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
20
प्रतिभा अमेरिकेबाहेर पडते आहे? - वेलकम टू इंडिया!

नंदुरबार जिल्ह्यात अफवांचा बाजार आणतोय कायदा व सुव्यवस्था धोक्यात

By मनोज.आत्माराम.शेलार | Updated: June 29, 2018 13:17 IST

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अफवांची मानसिकता नागरिकांच्या मनात कशी घर करून जाते याचे उदाहरण गेल्या दोन महिन्यांपासून पहावयास मिळत आहे. लहान मुले पकडणारे गावोगावी, शहराशहरात फिरत असल्याच्या अफवा आणि त्यातून समाजमनात निर्माण झालेली अस्थिरता याचे उदाहरण अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. नंदुरबारात देखील महिनाभरात किमान दहा जणांना अशा ...

मनोज शेलार । लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : अफवांची मानसिकता नागरिकांच्या मनात कशी घर करून जाते याचे उदाहरण गेल्या दोन महिन्यांपासून पहावयास मिळत आहे. लहान मुले पकडणारे गावोगावी, शहराशहरात फिरत असल्याच्या अफवा आणि त्यातून समाजमनात निर्माण झालेली अस्थिरता याचे उदाहरण अनेक ठिकाणी पहावयास मिळत आहे. नंदुरबारात देखील महिनाभरात किमान दहा जणांना अशा प्रकारे संशयावरून विनाकारण मार खावा लागल्याचे चित्र आहे. वास्तविक जिल्ह्यात गेल्या सहा महिन्यात लहान मुलांचे अपहरण होणे किंवा बेपत्ता होण्याचे जेही प्रकार गैरसमजातून घडले आहेत त्यातील मुलं सुखरूप परत आली आहेत. त्यामुळे अशा प्रकारची टोळी किंवा व्यक्ती जिल्ह्यात कार्यरत आहेत ही बाबच अनाकलनीय आहे. यासंदर्भात पोलिसांनी अशा अफवांबाबत उशीराने कडक कारवाईचे धोरण अवलंबले असल्याने अशा अफवांना पायबंद बसेल अशी अपेक्षा करण्यास हरकत नाही.   अफवांचे मानसशास्त्र मोठे विचित्र असते. वारंवार एकच अफवा किंवा बातमी फैलवली, कानावर पडली तर त्याबाबत समाजमनात विश्वास निर्माण होऊन ते खरेच असल्याचे बिंबत असते. आता तर सोशल मिडियाची भर पडली आहे. उठसूठ कुणीही काहीही मेसेज तयार करतो आणि देतो सोशल मिडियावर टाकून. परिणामी तो व्हायरल होऊन तो खराच असल्याची चर्चा रंगते. त्याची सत्यता कुठेही पडताळली जात नाही. एकापेक्षा अधीक गृपवरून तो मेसेज आल्यावर तर सत्य असल्याचा त्यावर शिक्कामोर्तबच होतो. सध्या लहान मुलांच्या अपहरणाचे मेसेज देखील पोलिसांची आणि एकुण समाजमनाची मोठी डोकेदुखी ठरू लागले आहेत. यामुळे अनेकांना मार खावा लागला तर काहींच्या जिवावरही बेतले आहे. एका शिक्षिकेलाही त्यातून जावे लागले. पोलीस दप्तरी नोंदी लक्षात घेतल्या तर गेल्या सहा महिन्याच्या कालावधीत बालकांचे अपहरण झाल्याच्या अवघ्या तीन ते चार नोंदी आहेत. त्या प्रकरणातील बालकं नंतर सुखरूप घरी पोहचली आहेत. त्यामुळे जिल्ह्यात मुलांचे अपहरणाचे वृत्त निराधार ठरते. नंदुरबार शहरात गेल्या महिन्यात रेल्वे स्थानकावरून एका तीन वर्षाच्या बालकाला एक माथेफिरू घेवून जात असल्याचे लक्षात आल्यावर त्याला पोलिसांच्या स्वाधिन करण्यात आले. त्याची चौकशी करता तो परप्रांतीय असून मनोरुग्ण असल्याचे पोलिसांनी सांगितले. दुसरी घटना सिंधी कॉलनीत घडली. घराच्या अंगणात खेळत असलेल्या एका चार वर्षीय बालकाला एकाने सायकलवर बसवून नेण्याचा प्रयत्न केला. संबधीत व्यक्ती देखील चांगल्या घरातील असून मानसिक तणावाखालील होती. या दोन घटनांचा अन्वायर्थ सहज म्हणून घेतला गेला. परंतु अशा लोकांचा अपहरणाचा उद्देश राहत नसला तरी त्यांच्याकडून मुलांना काही अपाय झाला तर त्याची जबाबदारी कोणाची हा प्रश्न कायम राहतो. प्रकाशा येथील दोन बहिणींच्या अपहरणाचे प्रकरणही चांगलेच गाजले. न्यायालयात शिक्षा भोगून आलेल्या एका वृद्धाने मुलींना सोबत नेले. त्या मुली सुरत येथे सुखरूप सापडल्या. सुदैवाने त्या सुरक्षीत राहिल्या. या प्रकरणात देखील मुली घेवून गेलेल्याचा उद्देश अपहरणाचा नसल्याचे स्पष्ट होते. परंतु आणखी काही दिवसात या मुली सुरत सारख्या शहरात एखाद्या गुंड प्रवृत्तीच्या हातात पडल्या असत्या तर?  हा प्रश्न कायम राहतो. त्यामुळे एखाद्या घटनांची अफवा पसरवतांना त्यातून पुढे काय वाढून ठेवलेले असेल याचाही विचार करणे आवश्यक असतो.अफवा पसरविणा:या आणि सोशल मिडियावर चुकीचे मेसेज टाकणा:यांवर आता सायबर अॅक्टनुसार कारवाईचे संकेत पोलिसांनी दिले आहेत. त्यामुळे या प्रकाराला काही प्रमाणात पायबंद बसेल यात शंका नाही. परंतु अशा बाबतीत पोलिसांनीही सतर्क राहणे आवश्यक आहे. नागरिकांनी देखील आपली जबाबदारी ओळखून दक्ष राहावे. अफवांच्या चर्चेत काहीवेळा समाजकंटक आपला उद्देशही साध्य करण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे ‘लांडगा आला रे आला..’ या म्हणीसारखी गत होऊ नये एवढेच.