शहरं
Join us  
Trending Stories
1
RSS सरसंघचालक मोहन भागवत यांची पंतप्रधान मोदींशी महत्त्वाची भेट; सुमारे दीड तास चर्चा - रिपोर्ट्स
2
IPL 2025 DC vs KKR : सुनील नरेन मॅजिक! ७ चेंडूत फिरवली मॅच; फाफची फिफ्टी ठरली व्यर्थ
3
धक्कादायक! वडिलांनी आठ वर्षांच्या मुलाचा गळा आवळून खून केला, मृतदेह पोत्यात भरला अन्...
4
काळजी करण्यासारखं काही नाही! खुद्द अजिंक्य रहाणेनं दिली आपल्या दुखापतीसंदर्भातील माहिती
5
VIDEO: रत्नागिरीजवळ रनपार खाडीत मासेमारी पाहण्यासाठी गेलेल्या १६ जणांना वाचविण्यात यश
6
भाजपाच्या अनेक नेत्यांचं आयएसआयशी संबंध, काँग्रेसचे ज्येष्ठ नेते रणदीप सुरजेवाला यांचा गंभीर आरोप   
7
गंभीर गुन्हा होण्यापूर्वीच पोलिसांनी डाव हाणून पाडला; परभणीत घरझडतीत घातक शस्त्र जप्त
8
IPL 2025 : 'चमत्कारी' चमीरा! 'सुपरमॅन' होऊन सीमारेषेवर टिपला IPL मधील एक सर्वोत्तम कॅच (VIDEO)
9
'ब्रेक फेल' झाल्याने पुण्याच्या चांदणी चौकात भीषण अपघात; PMPML बसने उडवली अनेक वाहने
10
लातूरच्या लेकींचा आंतरराष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत बोलबाला! ज्योती पवारमुळे भारताला उपविजेतेपद
11
अक्षय्य तृतीयेच्या पूर्वसंध्येला नागपूर जिल्ह्यात दोन बालविवाह; काटोल, कन्हान हद्दीतील घटना
12
दक्षिण नागपूरात कमी दाबाने पाणीपुरवठा, हनुमाननगर झोनमध्ये शिवसेनेतर्फे पाण्यासाठी आंदोलन
13
ब्रेकरने खड्डे करत फाउंडेशन केले मजबूत! क्रीडा संकुलातील महिलांच्या ओपन जीमची नव्याने दुरुस्ती
14
आता पाकिस्तानची खैर नाही! पीएम मोदींचे सैन्याला फ्री हँड, उच्चस्तरीय बैठकीत ठरली रणनीती
15
पाकिस्तानात पाणी प्रश्नावरून जनता संतापली! लोक आक्रमक होत रस्त्यावर उतरले, वाहतूक अडवली...
16
जय हिंद म्हणत अतुल कुलकर्णीं यांनी लाल चौकातून देशवासीयांना दिला जबरदस्त संदेश, म्हणाले...  
17
श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखीचे १८ जुनला प्रस्थान; ६ जुलैला पंढरपूरमध्ये होणार दाखल
18
अंत्यसंस्कार न करता मुलाने दोन वर्षे कपाटात लपवून ठेवला वडिलांचा मृतदेह, पोलिसांनी केली अटक, कारण वाचून येईल डोळ्यात पाणी
19
"नाशिकच्या हिंसक घटनेतील आरोपींना कठोर शिक्षा करा"; काँग्रेसची महायुती सरकारकडे मागणी
20
नवज्योत सिंग सिद्धू भाजपात सामील होणार? या पोस्टने वेधले लक्ष, उद्या करणार घोषणा

रंगावली नदीवरील पुलाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 10:50 IST

चार कोटी खर्च : आदिवासी विकास निधीतून नवापूर शहरातील पूल

ऑनलाईन लोकमत31 ऑगस्ट नवापूर : चार कोटी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या रंगावली नदीवरील स्व.केशवराव गावीत सेतू पुलाचे लोकार्पण आमदार सुरूपसिंग नाईक व माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.तालुक्याच्या पश्चिम भागास शहराशी जोडण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून या पुलासाठी चार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती. या वेळी आमदार नाईक, माजी केंद्रीयमंत्री गावीत यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत, नगराध्यक्षा रेणुका गावीत, माजी नगराध्यक्ष विपीन चोखावाला, पंचायत समिती उपसभापती दिलीप गावीत, माजी नगराध्यक्ष दामू बि:हाडे, गटनेते गिरीष गावीत, विरोधी पक्ष प्रमुख नरेंद्र नगराळे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आर.सी. गावीत, जिल्हा परिषद     सदस्य रतन गावीत, माजी नगरसेवक विनय गावीत, माजी उपनगराध्यक्ष फारूक शाह, शैलाबाई टिभे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, नगरसेवक व नगरसेविका आदी उपस्थित होते.प्रास्ताविकात गिरीष गावीत यांनी पुलाच्या उभारणीतील घडामोडींची माहिती देत आदिवासी विकासमंत्र्यांचे आभार मानले. सर्वात उपयुक्त काम असा उल्लेख करून विपीन चोखावाला यांनी मागील काळात शहरात लोकविकासाची अनेक कामे झाल्याचे सांगितले. भरत गावीत यांनी पुलाच्या उभारणीने आमदार नाईक यांनी दिलेला शब्द पूर्ण झाला आहे. पाच वर्षात अनेक कामे झालीत. विकासाची अनेक कामे दृष्टीपथास येत असतानाही विरोधक काम झाली नसल्याची टिका करीत असल्याची खंतही व्यक्त केली. शहरात सौरदिवे बसविण्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. शिरीष नाईक यांनी विकास कामांमध्ये तुलनात्मक नवापूर पालिका अग्रेसर असल्याचे सांगितले. शिरपूर, नंदुरबार नंतर नवापूरचा उपक्रम येतो, असे ते म्हणाले.माणिकराव गावीत यांनी लोकविकासाची कामे करणे सोपे नसते, असे सांगून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी योजना होत आहे. जलशुद्धीकरण योजनेचे पाणी स्वतंत्रपणे वितरणासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यासाठी योजना करावी लागणार आहे, असे सांगितले.उद्घाटनपर मनोगतात आमदार नाईक यांनी या सेतुच्या उभारणीमुळे परिसरातील ग्रामीण भागातील जनतेसाठी चांगली सोय झाली आहे, असे सांगितले. ग्राम पंचायत असतानाच्या काळापासून नवापूरच्या विकासासाठी प्रय}रत असल्याचे म्हणाले. आगामी काळात विकास कामे करणारे प्रतिनिधी लोकांसमोर आणू, असे सांगून जनतेचा निर्णय मान्य करू, असे म्हणाले. पंचायत समिती सदस्य जालमसिंग गावीत, माजी नगरसेवक भालचंद्र गावीत, विजया सोनार, मिराबाई गावीत, ज्येष्ठ नागरिक जी.के. पठाण, विक्रम पाटील, विनायक गावीत, डॉ.वसंत गावीत आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण तर आभार आरिफ बलेसरिया यांनी मानले.