शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान संघर्ष रोखला तसा इराण-इस्त्रायल युद्ध थांबवणार; डोनाल्ड ट्रम्प यांचा दावा
2
Viral Video : किती तो लग्नाचा आनंद! नवरदेवाचा 'असा' भन्नाट उत्स्फूर्त डान्स कधी पाहिलाच नसेल!
3
भाजप नेत्यांनी संघासमोर मांडला निवडणुकीच्या तयारीचा रोडमॅप; मुख्यमंत्री, गडकरींची उपस्थिती
4
Bridge Collapses : पूल दुर्घटनेबाबत अमित शाहांनंतर PM नरेंद्र मोदींचाही CM देवेंद्र फडणवीसांना फोन
5
Bridge Collapses: सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अक्षम्य दुर्लक्षामुळे कुंडमाळा येथे निष्पाप बळी 
6
इराणची राजधानी तेहरान हादरली: इस्रायलचे एकामागोमाग एक हल्ले; नागरिक भयभीत!
7
जावयाने केली सासऱ्याची हत्या, गडचिरोली जिल्ह्यातील घटना, आरोपीला अटक
8
विमान क्रॅश होण्याआधी दिसलेला 'तो' छोटा डॉट बनलं रहस्य?; तज्ज्ञांनी सांगितली 'RAT' ची थेअरी
9
गडचिरोलीच्या विद्यार्थ्यांचे 'इस्रो'ला ऐतिहासिक उड्डाण, मुख्यमंत्र्यांकडून विद्यार्थ्यांना शुभेच्छा
10
पूल दुर्घटनेच्या कारणांची चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करणार - उपमुख्यमंत्री अजित पवार
11
Bridge Collapses: दुर्घटनेत वाचलेले गणेश पवार म्हणाले, पूल कोसळला तेव्हा मी खाली पडलो मात्र, वाचलो..!
12
हातातला मोबाईल आधी बाजुला ठेवा मगच आरामात जेवा, नाहीतर वाढेल ब्लड शुगर आणि वजन
13
Pune Bridge Collapse: 'आज बोलण्याचा दिवस नाही तर जखमींना मदत' रोहित पवार यांचं मावळ दुर्घटनेवर भाष्य
14
गर्लफ्रेंडने बोलणं टाकलं, बॉयफ्रेंडचं डोकं सटकलं; प्रेयसीच्या घराबाहेरच स्वतःला पेटवलं!
15
AC बंद, ५ तास लहान मुलं, वृद्ध गरमीने हैराण; एअर इंडियाच्या विमानाचा धक्कादायक Video
16
१५ वर्ष भारतीय सेनेत देशसेवा केली, केदारनाथ हेलिकॉप्टर दुर्घटनेत आला मृत्यू; कोण होते पायलट राजवीर सिंह?
17
कुंडमळा पूल दुर्घटनेनंतर सुप्रिया सुळे घटनास्थळी; जखमींना दिला धीर, मदतीचे निर्देश
18
नागरिकांनी अपघाताची केली होती, शक्यता व्यक्त;सार्वजनिक बांधकाम विभाग प्रशासनाने केले दुर्लक्ष
19
राजकोट किल्ल्यावरील शिवरायांच्या पुतळ्याला पुन्हा धोका?; चबुतऱ्याजवळील माती खचली
20
Pune Bridge Collapse: पूल दुर्घटनेत २ मृत्यू, ३२ जखमी, ६ जणांना वाचवले, मात्र आणखी काही...; CM देवेंद्र फडणवीस काय म्हणाले?

रंगावली नदीवरील पुलाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 10:50 IST

चार कोटी खर्च : आदिवासी विकास निधीतून नवापूर शहरातील पूल

ऑनलाईन लोकमत31 ऑगस्ट नवापूर : चार कोटी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या रंगावली नदीवरील स्व.केशवराव गावीत सेतू पुलाचे लोकार्पण आमदार सुरूपसिंग नाईक व माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.तालुक्याच्या पश्चिम भागास शहराशी जोडण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून या पुलासाठी चार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती. या वेळी आमदार नाईक, माजी केंद्रीयमंत्री गावीत यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत, नगराध्यक्षा रेणुका गावीत, माजी नगराध्यक्ष विपीन चोखावाला, पंचायत समिती उपसभापती दिलीप गावीत, माजी नगराध्यक्ष दामू बि:हाडे, गटनेते गिरीष गावीत, विरोधी पक्ष प्रमुख नरेंद्र नगराळे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आर.सी. गावीत, जिल्हा परिषद     सदस्य रतन गावीत, माजी नगरसेवक विनय गावीत, माजी उपनगराध्यक्ष फारूक शाह, शैलाबाई टिभे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, नगरसेवक व नगरसेविका आदी उपस्थित होते.प्रास्ताविकात गिरीष गावीत यांनी पुलाच्या उभारणीतील घडामोडींची माहिती देत आदिवासी विकासमंत्र्यांचे आभार मानले. सर्वात उपयुक्त काम असा उल्लेख करून विपीन चोखावाला यांनी मागील काळात शहरात लोकविकासाची अनेक कामे झाल्याचे सांगितले. भरत गावीत यांनी पुलाच्या उभारणीने आमदार नाईक यांनी दिलेला शब्द पूर्ण झाला आहे. पाच वर्षात अनेक कामे झालीत. विकासाची अनेक कामे दृष्टीपथास येत असतानाही विरोधक काम झाली नसल्याची टिका करीत असल्याची खंतही व्यक्त केली. शहरात सौरदिवे बसविण्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. शिरीष नाईक यांनी विकास कामांमध्ये तुलनात्मक नवापूर पालिका अग्रेसर असल्याचे सांगितले. शिरपूर, नंदुरबार नंतर नवापूरचा उपक्रम येतो, असे ते म्हणाले.माणिकराव गावीत यांनी लोकविकासाची कामे करणे सोपे नसते, असे सांगून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी योजना होत आहे. जलशुद्धीकरण योजनेचे पाणी स्वतंत्रपणे वितरणासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यासाठी योजना करावी लागणार आहे, असे सांगितले.उद्घाटनपर मनोगतात आमदार नाईक यांनी या सेतुच्या उभारणीमुळे परिसरातील ग्रामीण भागातील जनतेसाठी चांगली सोय झाली आहे, असे सांगितले. ग्राम पंचायत असतानाच्या काळापासून नवापूरच्या विकासासाठी प्रय}रत असल्याचे म्हणाले. आगामी काळात विकास कामे करणारे प्रतिनिधी लोकांसमोर आणू, असे सांगून जनतेचा निर्णय मान्य करू, असे म्हणाले. पंचायत समिती सदस्य जालमसिंग गावीत, माजी नगरसेवक भालचंद्र गावीत, विजया सोनार, मिराबाई गावीत, ज्येष्ठ नागरिक जी.के. पठाण, विक्रम पाटील, विनायक गावीत, डॉ.वसंत गावीत आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण तर आभार आरिफ बलेसरिया यांनी मानले.