शहरं
Join us  
Trending Stories
1
८० वर्षांपूर्वी उत्खननात सापडलेले शिवमंदिर; आता पुन्हा धराली दुर्घटनेत जमिनीखाली गाडले गेले
2
एकनाथ शिंदे-उद्धव ठाकरेंची एकाचवेळी दिल्लीवारी; टायमिंगची चर्चा, नवे समीकरण दिसणार?
3
वडिलांना सांगितलं कॉल सेंटरमध्ये नोकरी मिळाली; रोज ८-१० ग्राहकांना खूष...
4
देशातील विमानतळांवर दहशतवादी हल्ल्याचा धोका; बीसीएएसकडून सुरक्षा वाढवण्याच्या सूचना
5
Photo : डोळ्यांदेखत अख्खं गाव वाहून गेलं, क्षणार्धात होत्याचं नव्हतं झालं; उत्तरकाशीत दिसलं निसर्गाचं रौद्र रूप
6
Afghanistan Squad For Asia Cup 2025 : संघ ठरला! गिलच्या नेतृत्वाखाली खेळणारा पठ्ठ्या झाला कॅप्टन
7
३५ हजारात गोरेगाव इथं १ बीएचके भाड्याने घ्यायला गेला; ब्रोकरने सांगितलेला दर ऐकून 'तो' थक्क झाला
8
ते शिट्ट्या वाजवून मजा घेत होते का? उत्तरकाशीच्या धरालीमधील ढगफुटीवेळच्या व्हिडीओवर अनेक प्रश्न...
9
IND vs ENG: इंग्लंडविरूद्ध कसोटी विजयानंतर WTC मध्ये टीम इंडिया कितव्या नंबरवर? जाणून घ्या
10
'महादेवी' परतणार! नांदणी मठाजवळच हत्तीणीसाठी पुनर्वसन केंद्र उभारण्यास 'वनतारा' मदत करणार
11
लक्ष्मीकांत बेर्डेंनी का नाकारला 'नवरा माझा नवसाचा' सिनेमा?, सचिन पिळगावकर म्हणाले...
12
NSDL IPO Listing: पहिल्याच दिवशी ९०० पार गेला NSDL चा शेअर; IPO झालेला ४१ पट सबस्क्राईब
13
Video: चीन आता 'लांडग्याला' युद्धावर पाठविणार, मिनिटाला ६० गोळ्या झाडणारा रोबो; सैन्यासोबत सरावाचा व्हिडीओ... 
14
टी-२० अन् वनडेत फर्स्ट क्लास; पण टेस्टमध्ये ATKT; असं आहे हेडमास्टर गंभीरचं 'प्रगती पुस्तक'
15
IPLमधील या क्रिकेटपटूने ॲडल्ट साईटवर केली एंट्री, क्रिकेटप्रेमी अवाक्, आपल्या निर्णयाबाबत म्हणाला...
16
कशी सुरु झाली मृणाल ठाकूर अन् धनुषची लव्हस्टोरी?, 'तो' सेल्फी पुन्हा होतोय व्हायरल
17
एकदा करून बघाच! वजन कमी होईल अन् केस गळणंही थांबेल... इवल्याशा वेलचीचे मोठे फायदे
18
रेल्वे कंत्राटावरून वाद, ३ मराठी भावंडांवर परप्रांतीयांचा प्राणघातक हल्ला; रॉडने डोके फोडले अन् रचला बनाव
19
तुमचा iPhone धोक्यात? ॲपल युजर्ससाठी भारत सरकारचा 'रेड अलर्ट', लगेच 'हे' काम करा!
20
रक्षाबंधन २०२५: गजलक्ष्मी योगात श्रावण पौर्णिमा; लक्ष्मीकृपेने 'या' राशींच्या आनंदाला येणार भरती

रंगावली नदीवरील पुलाचे लोकार्पण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 31, 2017 10:50 IST

चार कोटी खर्च : आदिवासी विकास निधीतून नवापूर शहरातील पूल

ऑनलाईन लोकमत31 ऑगस्ट नवापूर : चार कोटी रुपये खचरून उभारण्यात आलेल्या रंगावली नदीवरील स्व.केशवराव गावीत सेतू पुलाचे लोकार्पण आमदार सुरूपसिंग नाईक व माजी केंद्रीय मंत्री माणिकराव गावीत यांच्या हस्ते बुधवारी करण्यात आले.तालुक्याच्या पश्चिम भागास शहराशी जोडण्यासाठी आदिवासी विकास विभागाकडून या पुलासाठी चार कोटी रुपयांची भरीव तरतूद करण्यात आली होती. या वेळी आमदार नाईक, माजी केंद्रीयमंत्री गावीत यांच्यासह जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक, आदिवासी सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन शिरीष नाईक, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष भरत गावीत, नगराध्यक्षा रेणुका गावीत, माजी नगराध्यक्ष विपीन चोखावाला, पंचायत समिती उपसभापती दिलीप गावीत, माजी नगराध्यक्ष दामू बि:हाडे, गटनेते गिरीष गावीत, विरोधी पक्ष प्रमुख नरेंद्र नगराळे, काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष आर.सी. गावीत, जिल्हा परिषद     सदस्य रतन गावीत, माजी नगरसेवक विनय गावीत, माजी उपनगराध्यक्ष फारूक शाह, शैलाबाई टिभे, पालिका मुख्याधिकारी राजेंद्र शिंदे, नगरसेवक व नगरसेविका आदी उपस्थित होते.प्रास्ताविकात गिरीष गावीत यांनी पुलाच्या उभारणीतील घडामोडींची माहिती देत आदिवासी विकासमंत्र्यांचे आभार मानले. सर्वात उपयुक्त काम असा उल्लेख करून विपीन चोखावाला यांनी मागील काळात शहरात लोकविकासाची अनेक कामे झाल्याचे सांगितले. भरत गावीत यांनी पुलाच्या उभारणीने आमदार नाईक यांनी दिलेला शब्द पूर्ण झाला आहे. पाच वर्षात अनेक कामे झालीत. विकासाची अनेक कामे दृष्टीपथास येत असतानाही विरोधक काम झाली नसल्याची टिका करीत असल्याची खंतही व्यक्त केली. शहरात सौरदिवे बसविण्यासाठी तीन कोटी रुपये मंजूर झाल्याची माहिती त्यांनी दिली. शिरीष नाईक यांनी विकास कामांमध्ये तुलनात्मक नवापूर पालिका अग्रेसर असल्याचे सांगितले. शिरपूर, नंदुरबार नंतर नवापूरचा उपक्रम येतो, असे ते म्हणाले.माणिकराव गावीत यांनी लोकविकासाची कामे करणे सोपे नसते, असे सांगून सांडपाण्याची विल्हेवाट लावण्यासाठी योजना होत आहे. जलशुद्धीकरण योजनेचे पाणी स्वतंत्रपणे वितरणासाठी स्वतंत्र जलवाहिनी टाकण्यासाठी योजना करावी लागणार आहे, असे सांगितले.उद्घाटनपर मनोगतात आमदार नाईक यांनी या सेतुच्या उभारणीमुळे परिसरातील ग्रामीण भागातील जनतेसाठी चांगली सोय झाली आहे, असे सांगितले. ग्राम पंचायत असतानाच्या काळापासून नवापूरच्या विकासासाठी प्रय}रत असल्याचे म्हणाले. आगामी काळात विकास कामे करणारे प्रतिनिधी लोकांसमोर आणू, असे सांगून जनतेचा निर्णय मान्य करू, असे म्हणाले. पंचायत समिती सदस्य जालमसिंग गावीत, माजी नगरसेवक भालचंद्र गावीत, विजया सोनार, मिराबाई गावीत, ज्येष्ठ नागरिक जी.के. पठाण, विक्रम पाटील, विनायक गावीत, डॉ.वसंत गावीत आदी उपस्थित होते.सूत्रसंचालन राजेंद्र चव्हाण तर आभार आरिफ बलेसरिया यांनी मानले.