शहरं
Join us  
Trending Stories
1
Mantha Cyclone: मोंथा चक्रीवादळ किनारपट्टीवर धडकले! वेग प्रतितास 100 किमी, विदर्भाला ऑरेंज अलर्ट
2
वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटची खरंच चौकशी सुरू केली आहे का? मुख्यमंत्री फडणवीसांनी दिले उत्तर
3
"निवडणुकीत लक्ष्मी दर्शन, कुणाला चपटी, कुणाला कोंबडं बकरू लागतं, तयारी ठेवा"; अजित पवारांच्या आमदाराचे विधान
4
पुण्यात भीषण अपघात! फरश्या घेऊन जाणाऱ्या ट्रकची तीन वाहनांना धडक,ट्रकचालकला पोलिसांच्या ताब्यात
5
१० हजारांचं जेवण करून बिल न भरता पळाले; ट्रॅफिकमध्ये झाला घोळ, रेस्टॉरंट मालकाने रस्त्यात गाठलं अन्...
6
वेळेत ब्लाऊज शिवून न देणे टेलरला पडलं महागात; ग्राहक कोर्टाने सुनावली शिक्षा, काय आहे प्रकार?
7
जळगाव जिल्ह्यात एसटी बसचा भीषण अपघात, चालकासह 8 प्रवाशी जखमी
8
"अतिवृष्टीग्रस्त शेतकर्‍यांना आतापर्यंत ८ हजार कोटी वाटप, पुढील १५ दिवसांत ११ हजार कोटी देणार"
9
Mohammed Shami: "मी काही बोललो तर, वाद होईल!" संघ निवडीबाबत उपस्थित होणाऱ्या प्रश्नांवर शमीचं उत्तर
10
"त्यांना फाशीशिवाय दुसरी शिक्षा असूच शकत नाही"; डॉक्टर तरुणी मृत्यू प्रकरणात उदयनराजेंनी लोकांना काय केले आवाहन?
11
Viral Video: फलंदाजाला 'असं' आउट होताना कधीच पाहिलं नसेल; षटकार मारूनंही पंचांनी वर केलं बोट!
12
अजबच! गावठी कुत्रा बनला ज्वेलरी शॉपचा रखवालदार, गळ्यात घालतो ५० तोळ्यांची सोन्याची चेन
13
Inspiring Story: तरुणीला किडनीची गरज, तरुणाला कर्करोग...; गोष्ट एका अनोख्या प्रेमाची!
14
'५० कोटींच्या धमकीला भीक घालत नाही', सुषमा अंधारेंनी रणजितसिंह नाईक निंबाळकरांविरोधात पुरावे दाखवले
15
4 दुचाकी, 6 सिलिंडर...बसमध्ये ठेवलेले 'हे' सामान; भडका उडाल्याने दोघांचा जागीच मृत्यू, डझनभर जखमी
16
UPSC Student Murder: लिव्ह पार्टनरची थंड डोक्याने हत्या, फॉरेन्सिक सायन्सची विद्यार्थिनी अमृताकडून 'ती' एक चूक झाली अन्...
17
'महायुती सरकारचे ११ हजार कोटींचे पॅकेजही ३२ हजार कोटींच्या पॅकेजसारखे फसवेच', हर्षवर्धन सपकाळ यांची टीका
18
मोठी बातमी! कर्जमाफीसाठी परभणी जिल्हाधिकाऱ्यांच्या गाडीवर शेतकऱ्याची दगडफेक
19
ट्रम्प आणि पुतिन यांच्यातील दरी वाढली, रशियन तेल साम्राज्याला मोठा झटका; परदेशी मालमत्ता विकण्यास सुरुवात
20
8th Pay Commission: १४०००, १५००० की १८०००...एक लाख सॅलरीवर किती होणार दरमहा वाढ?

पाण्याअभावी पपई पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:54 IST

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमध्ये पाण्याअभावी पपई पिकाची वाढ खुंटली आह़े पिक वाया जाणार असल्याने शेतक:यांकडून चिंता ...

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमध्ये पाण्याअभावी पपई पिकाची वाढ खुंटली आह़े पिक वाया जाणार असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े परिसरातील पाणी पातळी खोल गेली असल्याने साहजिकच पिण्याच्या पाण्याचाही मोठा तुटवडा आह़ेनंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, खोडसगाव, शिंदे, समशेरपूर, खोंडामळी, विखरण, बामडोद, भागसरी, कोळदे, पळाशी, पातोंडा, पथराई, सिंदगव्हाण, भालेर आदीसह परिसरात पपईचे पिक मोठय़ा प्रमाणात घेण्यात आलेले आह़े परंतु यंदा पावसाने पाठ फिरवल्याने या ठिकाणची पपईसह सोयाबीन, केळी, कापूस आदी पिकांची वाढ खुंटली आह़े पाण्याअभावी परिसराची स्थिती अत्यंत विदारक झालेली आह़े या ठिकाणच्या विहिरी तसेच कुपनलिकांनाही पाणी नसल्याने पिकांसाठी पाणी आणावे कुठून असा प्रश्न शेतक:यांसमोर निर्माण झाला आह़े पाणी नसल्याने बहुतेक शेतक:यांनी आपली शेते रिकामी केली आहेत़ याचेच एक प्रातिनिधीक उदाहरण म्हणजे खोडसगाव येथील सुरेश पाटील यांनी आपल्या 5 एकरावरील पपईवर रोटोव्हेटर फिरवून पिक नष्ट केले आह़े तसेच विलास पाटील, मोहन पाटील यांनीदेखील अनुक्रमे पपई व मिरचीच्या पिकावर रोटोव्हेटर फिरवले आह़े पाण्याची पातळी खोल गेलेली आह़े त्यातच सूर्य आग ओकत आह़े त्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत दैनिय झालेली आह़े पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांची वाढ खुंटली आह़े केळी, पपई, मिरची आदी पिक करपायला सुरुवात झालेली आह़े पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झालेला आह़े काही ठिकाणी पपईचे झाड आकुंचन पावत आह़े पावसाअभावी कापूस, पपई, मिरची आदीचा उत्पादन खर्च काढणेही शेतक:यांना कठीण होऊन बसले आह़े त्यामुळे साहजिकच यातून मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े विहिरींचे खोलीकरणनंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहिरींचे खोलीकरण करण्यात येत आह़े त्यातून पाण्याचा उपसा केला जात आह़े दरम्यान, जिल्हा प्रशासनातर्फे यंदा मोठय़ा प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे करण्यात आलेली होती़ परंतु पावसाने पाठ फिरवल्याने पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला नाही़ शिवाय धरणे, लघुप्रकल्प तसेच इतर जलस्त्रोतही भरले नसल्याने पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढली आह़े जिल्ह्यात केवळ 67 टक्के इतका पाऊस झाला आह़े परतीच्या पावसानेही घोर निराशा केली आह़े त्यामुळे पुढील उन्हाळ्यार्पयत पाण्याची सोय होणे महत्वाचे आह़े पुढील पाऊस लांबला तर भिषण दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आह़े