शहरं
Join us  
Trending Stories
1
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा पंतप्रधान म्हणून उल्लेख; योगायोग की राजकीय भूकंपाचे संकेत?
2
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
3
जीएसटी कपातीचा फायदा संपत चालला...! एमजीने पहिली घोषणा केली, जानेवारीपासून कारच्या किंमतीत होणार मोठी वाढ
4
एआयमुळे कोणत्या नोकऱ्यांना सर्वाधिक धोका, कोणत्या नोकऱ्यांची घेतोय जागा? जाणून घ्या
5
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामूहिक राजीनामा
6
'३ इडियट्स'च्या सीक्वलचे शीर्षक असेल '४ इडियट्स'! आमिर खानच्या सिनेमासाठी निर्माते चौथ्या अभिनेत्याच्या शोधात
7
Viral Video: "हे फूटपाथ चालण्यासाठी आहेत, गाड्यांसाठी नाही!" परदेशी नागरिकांकडून पुणेकरांना शिस्तीचा धडा
8
ड्रॅगनला मोठा झटका! चिनच्या 'या' वस्तूवर ५ वर्षांसाठी 'अँटी-डंपिंग ड्युटी' लागू; स्थानिक उद्योगांना मिळणार बळ
9
Anurag Dwivedi : क्रूझवर शाही लग्न, लक्झरी कारचा मालक; कोट्यवधींची कमाई करुन दुबईला पळाला प्रसिद्ध युट्यूबर
10
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
11
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
12
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
13
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
14
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
15
ICICI Prudential AMC IPO: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
16
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
17
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
18
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
19
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
20
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याअभावी पपई पिकांचे मोठे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 26, 2018 11:54 IST

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमध्ये पाण्याअभावी पपई पिकाची वाढ खुंटली आह़े पिक वाया जाणार असल्याने शेतक:यांकडून चिंता ...

लहान शहादे : नंदुरबार तालुक्यातील विविध गावांमध्ये पाण्याअभावी पपई पिकाची वाढ खुंटली आह़े पिक वाया जाणार असल्याने शेतक:यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आह़े परिसरातील पाणी पातळी खोल गेली असल्याने साहजिकच पिण्याच्या पाण्याचाही मोठा तुटवडा आह़ेनंदुरबार तालुक्यातील लहान शहादे, खोडसगाव, शिंदे, समशेरपूर, खोंडामळी, विखरण, बामडोद, भागसरी, कोळदे, पळाशी, पातोंडा, पथराई, सिंदगव्हाण, भालेर आदीसह परिसरात पपईचे पिक मोठय़ा प्रमाणात घेण्यात आलेले आह़े परंतु यंदा पावसाने पाठ फिरवल्याने या ठिकाणची पपईसह सोयाबीन, केळी, कापूस आदी पिकांची वाढ खुंटली आह़े पाण्याअभावी परिसराची स्थिती अत्यंत विदारक झालेली आह़े या ठिकाणच्या विहिरी तसेच कुपनलिकांनाही पाणी नसल्याने पिकांसाठी पाणी आणावे कुठून असा प्रश्न शेतक:यांसमोर निर्माण झाला आह़े पाणी नसल्याने बहुतेक शेतक:यांनी आपली शेते रिकामी केली आहेत़ याचेच एक प्रातिनिधीक उदाहरण म्हणजे खोडसगाव येथील सुरेश पाटील यांनी आपल्या 5 एकरावरील पपईवर रोटोव्हेटर फिरवून पिक नष्ट केले आह़े तसेच विलास पाटील, मोहन पाटील यांनीदेखील अनुक्रमे पपई व मिरचीच्या पिकावर रोटोव्हेटर फिरवले आह़े पाण्याची पातळी खोल गेलेली आह़े त्यातच सूर्य आग ओकत आह़े त्यामुळे पिकांची स्थिती अत्यंत दैनिय झालेली आह़े पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांची वाढ खुंटली आह़े केळी, पपई, मिरची आदी पिक करपायला सुरुवात झालेली आह़े पिकांना पाणी मिळत नसल्याने त्यांच्यावर विविध रोगांचा प्रादुर्भाव निर्माण झालेला आह़े काही ठिकाणी पपईचे झाड आकुंचन पावत आह़े पावसाअभावी कापूस, पपई, मिरची आदीचा उत्पादन खर्च काढणेही शेतक:यांना कठीण होऊन बसले आह़े त्यामुळे साहजिकच यातून मोठे आर्थिक नुकसान होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आह़े विहिरींचे खोलीकरणनंदुरबार तालुक्यातील अनेक गावांमध्ये विहिरींचे खोलीकरण करण्यात येत आह़े त्यातून पाण्याचा उपसा केला जात आह़े दरम्यान, जिल्हा प्रशासनातर्फे यंदा मोठय़ा प्रमाणात जलयुक्त शिवार योजनेच्या माध्यमातून कामे करण्यात आलेली होती़ परंतु पावसाने पाठ फिरवल्याने पाहिजे त्या प्रमाणात पाण्याचा साठा झाला नाही़ शिवाय धरणे, लघुप्रकल्प तसेच इतर जलस्त्रोतही भरले नसल्याने पाणीटंचाईची दाहकता अधिकच वाढली आह़े जिल्ह्यात केवळ 67 टक्के इतका पाऊस झाला आह़े परतीच्या पावसानेही घोर निराशा केली आह़े त्यामुळे पुढील उन्हाळ्यार्पयत पाण्याची सोय होणे महत्वाचे आह़े पुढील पाऊस लांबला तर भिषण दुष्काळी स्थिती निर्माण होण्याची शक्यता आह़े