शहरं
Join us  
Trending Stories
1
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
2
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
3
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
4
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
5
कोल्हापूर सर्किट बेंचचे थोड्याच वेळात उद्घाटन होणार, पहा कसे बनवलेय कोर्ट चकाचक...
6
नात्याला काळीमा फासणारी घटना; मुलाचा ६५ वर्षीय आईवर तीनदा अत्याचार, आरोपी अटकेत
7
भारतातील ५ ऐतिहासिक गुहा; 'या' ठिकाणांच सौंदर्य तुमच्याही मनाला पाडेल भुरळ!
8
सौदी-इराण नाही, 'या' देशात फक्त २.५ रुपयांना मिळते १ लिटर पेट्रोल; भारताचा कितवा नंबर..?
9
सूर्याचा स्वराशीत प्रवेश: १० राशींचे ग्रहण सुटेल, चौफेर लाभ; सुबत्ता-भरभराट, शुभ-कल्याण काळ!
10
पुरंदर विमानतळ : शेतकऱ्यांचा मोबदला प्रलंबित, शरद पवारांची मुख्यमंत्र्यांशी चर्चा होणार
11
पैसे कमवण्याची मोठी संधी! पुढील आठवड्यात बाजारात येणार ५ कंपन्यांचे IPO; ग्रे मार्केटमध्ये आधीच तुफान
12
“नाशिकमध्ये आमचे ७ आमदार, पालकमंत्रीपद आम्हाला मिळायला हवे”; छगन भुजबळ स्पष्टच बोलले
13
प्रेयसीच्या लग्नाने प्रियकर संतापला; तिच्या कुटुंबाला उडवण्यासाठी होम थिएटरमध्ये ठेवला बॉम्ब
14
इस्रायली नौदलाचा येमेनवर मोठा हल्ला, क्षणार्धात इमारतीतून येऊ लागले धुराचे लोट; पाहा व्हिडीओ
15
ज्योती चांदेकर यांच्यावर पुण्यात अंत्यसंस्कार, आईला शेवटचा निरोप देताना तेजस्विनी पंडितची भावुक अवस्था
16
महामंडळ वाटपाचं ठरलं, कोणाला मिळणार संधी? अजित पवार म्हणाले...
17
भारताला वेगळा न्याय? तेल खरेदीवरुन भारतावर निर्बंध, पण ट्रम्प यांनी स्वतः रशियासोबत वाढवला व्यापार!
18
निवृत्त झालेल्या आजोबांना मिळाले ३ कोटी, आनंदात पत्नीला सोडून राहू लागले वेगळे! पण पुढे काय झालं वाचाच...
19
'खुदा'ने मला रक्षक बनवले, मला पद..; सत्तापालटाच्या चर्चेदरम्यान असीम मुनीरचे सूचक विधान
20
म्यानमार सैन्याने स्वतःच्याच देशावर केला हवाई हल्ला; २१ जणांचा मृत्यू, १५ घरांचे नुकसान

करजई गावाजवळील तलाव धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST

रस्त्यासह इतर विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही.; परंतु विकास होत असताना नागरिकांचेही हित जोपासणे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. प्रकाशा-शहादा ...

रस्त्यासह इतर विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही.; परंतु विकास होत असताना नागरिकांचेही हित जोपासणे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. प्रकाशा-शहादा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम झाले आहे. या रस्त्याच्या कामात मातीचा भराव करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने करजई गावालगत गावठाण जागेची निवड केली. त्या जागेवर जेसीबी व पोकलेन मशीनद्वारे मातीचा उपसा करण्यात आला. त्यामुळे सुमारे ७० ते ८० फूट खोल व १०० फूट लांब असा मोठा खड्डा झाला आहे. हा खड्डा म्हणजे तलावच तयार झाला आहे. येथून मातीचा उपसा करण्यासाठी ठेकेदाराने संबंधित विभागाची परवानगी घेतली होती का? असा सवाल परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. जर परवानगी दिली घेतली असेल तर नियमाप्रमाणे खोदकाम झाले आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ठेकेदाराने रस्त्यावर टाकण्यासाठी माती उपसल्यानंतर खड्ड्याभोवती संरक्षक कठडे केलेले नाहीत. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यामुळे १० ते १२ किलोमीटर अंतरातील कूपनलिकांना फायदा होणार आहे ही चांगली बाब असली तरी तेथे उपाययोजना करणे आवश्यक आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शेळ्या चारण्यासाठी गेलेला करजई येथील २१ वर्षीय तरुण भिकेसिंग सरदारसिंग गिरासे हा या खड्ड्यातील पाण्यात बुडून मरण पावला. घरातील कर्ता व एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या तलावासदृश खड्ड्याजवळून लोकांचे व गुरा-ढोरांचे नेहमी येणे-जाणे असते. मात्र, त्याठिकाणी सुरक्षेसाठी कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात हा तलाव लोकांसाठी व गुरा-ढोरांसाठी जीवघेणा ठरू शकतो, अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन याठिकाणी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा अनंत चतुर्दशीला घडलेल्या घटनेप्रमाणे घटना घडतच राहतील.