शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे निष्ठावंतांना संधी देतात, तेच बाळासाहेब ठाकरेंचे खरे वारसदार, येणाऱ्या निवडणुकांमध्ये..."
2
'टीम इंडिया'त मिळाली नाही संधी; अखेर परदेशी संघाकडून खेळला, पहिल्याच सामन्यात ठोकलं शतक
3
छोटासा मुद्दा ठरणार सरकार उलथवून टाकण्यास कारणीभूत, इस्रायलच्या राजकारणात 'मोठा ट्विस्ट'
4
"आम्ही दहशतवादासोबतचे सर्व संबंध तोडले"; पंतप्रधान मोदींच्या इशाऱ्यानंतर पाकिस्तान घाबरला
5
दिव्यांग मुलांना बास्केटबॉल शिकवण्याचं 'चॅलेंज', आमिर खानच्या 'सितारे जमीन पर'चा ट्रेलर आउट
6
Mumbai: ताज हॉटेलबाहेर पहाटे संशयास्पद उडणारी वस्तू दिसली, तपासात संतापजनक प्रकार उघड
7
"पाकिस्तानला POK खाली करावा लागेल, काश्मीरच्या मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी मान्य नाही"
8
चितगाव बांगलादेशचे 'बलुचिस्तान' होण्याच्या मार्गावर; युनूस सरकारला धक्का बसण्याची शक्यता
9
दात घासाच! रात्री ब्रश न करणं बेतेल थेट जीवावर; दातांच्या स्वच्छतेचं हार्ट ॲटॅकशी काय कनेक्शन?
10
Narendra Modi : "आम्ही घरात घुसून मारू, पळून जाण्याची संधीही देणार नाही"; मोदींचा पाकिस्तानला सज्जड दम
11
IPL 2025: गावसकर म्हणाले, आता तो डीजेही नको अन् त्या डान्सिंग गर्ल्सही नकोत!
12
Kiran Lahamte: आमदार किरण लहामटे यांच्या कारला ट्रकची जोरदार धडक, थोडक्यात बचावले!
13
ग्लेन मॅक्सेवलशी लग्नासंबंधी चाहत्याने विचारला प्रश्न, प्रिती झिंटाचा राग अनावर, रागारागात म्हणाली...
14
विराट कोहलीच्या रिटायरमेंटनंतर खूप इमोशनल झाली अनुष्का शर्मा, व्हिडीओ होतोय व्हायरल
15
Viral Video: कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल बोलताना भाजप नेत्याची जीभ घसरली, पाहा काय म्हणाले?
16
Nagpur: हेविवेट नेत्यांच्या जिल्ह्यात भाजपमध्ये नेतृत्वबदल, दयाशंकर तिवारी नवे शहराध्यक्ष
17
भारताची S-400 संरक्षण प्रणाली सुरक्षित: पीएम मोदींनी 'त्या' फोटोतून केली पाकिस्तानची पोलखोल
18
निवृत्तीनंतर विराट-अनुष्का प्रेमानंद महाराजांच्या चरणी, हातातील गुलाबी अंगठीनं वेधलं सर्वांचं लक्ष!
19
'हॅलो, तुमच्या विमानात बॉम्ब आहे', एका फोनमुळे विमानतळावर गदारोळ; तत्काळ हाय अलर्ट जारी!
20
कोहलीसाठी कायपण! 'टेस्ट फेअरवेल' देण्यासाठी चाहत्यांनी आखलाय एकदम 'बेस्ट प्लॅन'; जाणून घ्या सविस्तर

करजई गावाजवळील तलाव धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST

रस्त्यासह इतर विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही.; परंतु विकास होत असताना नागरिकांचेही हित जोपासणे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. प्रकाशा-शहादा ...

रस्त्यासह इतर विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही.; परंतु विकास होत असताना नागरिकांचेही हित जोपासणे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. प्रकाशा-शहादा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम झाले आहे. या रस्त्याच्या कामात मातीचा भराव करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने करजई गावालगत गावठाण जागेची निवड केली. त्या जागेवर जेसीबी व पोकलेन मशीनद्वारे मातीचा उपसा करण्यात आला. त्यामुळे सुमारे ७० ते ८० फूट खोल व १०० फूट लांब असा मोठा खड्डा झाला आहे. हा खड्डा म्हणजे तलावच तयार झाला आहे. येथून मातीचा उपसा करण्यासाठी ठेकेदाराने संबंधित विभागाची परवानगी घेतली होती का? असा सवाल परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. जर परवानगी दिली घेतली असेल तर नियमाप्रमाणे खोदकाम झाले आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ठेकेदाराने रस्त्यावर टाकण्यासाठी माती उपसल्यानंतर खड्ड्याभोवती संरक्षक कठडे केलेले नाहीत. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यामुळे १० ते १२ किलोमीटर अंतरातील कूपनलिकांना फायदा होणार आहे ही चांगली बाब असली तरी तेथे उपाययोजना करणे आवश्यक आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शेळ्या चारण्यासाठी गेलेला करजई येथील २१ वर्षीय तरुण भिकेसिंग सरदारसिंग गिरासे हा या खड्ड्यातील पाण्यात बुडून मरण पावला. घरातील कर्ता व एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या तलावासदृश खड्ड्याजवळून लोकांचे व गुरा-ढोरांचे नेहमी येणे-जाणे असते. मात्र, त्याठिकाणी सुरक्षेसाठी कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात हा तलाव लोकांसाठी व गुरा-ढोरांसाठी जीवघेणा ठरू शकतो, अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन याठिकाणी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा अनंत चतुर्दशीला घडलेल्या घटनेप्रमाणे घटना घडतच राहतील.