शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! दिवाळीच्या ताेंडावर वीज दरवाढीचा 'उत्सव'; प्रति युनिट ३५ ते ९५ पैशांपर्यंत बिल वाढणार
2
पैसेच नव्हते, मग दुसऱ्याच्या तुटलेल्या बॅटने खेळलो, जिंकलोही; तिलक वर्माने सांगितला आपला प्रवास
3
सगळे काही मराठा समाजालाच का? ओबीसी नेत्यांचा सवाल, मोर्चावर ठाम
4
आज हायव्होल्टेज लढत! भारत-पाकिस्तान महिला संघ आज भिडणार, हस्तांदोलन करणार? 
5
राज-उद्धव एकत्र आल्याने काही फरक पडणार नाही : गृहराज्यमंत्री योगेश कदम
6
रोहित शर्माची उचलबांगडी, ऑस्ट्रेलिया दौऱ्यात शुभमन गिलकडे नेतृत्व; विराटसह संघात ठेवले हेच...
7
‘त्या’ कफ सिरपच्या नमुन्यांत भेसळ; उत्पादन, विक्री थांबवण्याचे आदेश
8
पाकव्याप्त काश्मीरमध्ये आंदोलन, शरीफ नरमले; आंदोलन मागेही घेतले
9
५० हजारांना मुलीची खरेदी; जबरीने लग्न
10
ईएमआय की एसआयपी? तुम्हाला कोण करेल श्रीमंत?
11
कफ सिरपने जीव घेणारी यंत्रणाच ‘विषारी’
12
बांबू मेंटॅलिटी असेल तर यश तुमचेच आहे...
13
परीक्षेचा अटॅक: ताण, चिंता इतकी वाढते की ज्यामुळे अभ्यासात लक्ष लागत नाही
14
पावसाच्या 'बॅटिंग'च्या जोरावर श्रीलंकेनं उघडलं खातं; पाकला पराभूत करताच टीम इंडिया होईल टॉपर
15
अमेरिकेत भारतीय विद्यार्थ्याची गोळ्या घालून हत्या; शिक्षणासोबत पेट्रोल पंपावर करत होता पार्ट-टाईम काम
16
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
17
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
18
निसर्ग अशांतच! अतिवृष्टीनंतर आता ‘शक्ती’ चक्रीवादळाचा धोका; किनारपट्टी भागात सतर्कतेचा इशारा
19
वनडे क्रिकेटच्या इतिहासातील सर्वात यशस्वी कर्णधार; रोहित शर्मा दुसरा, मग पहिला कोण?
20
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी

करजई गावाजवळील तलाव धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 22, 2021 04:34 IST

रस्त्यासह इतर विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही.; परंतु विकास होत असताना नागरिकांचेही हित जोपासणे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. प्रकाशा-शहादा ...

रस्त्यासह इतर विकासकामांना नागरिकांचा विरोध नाही.; परंतु विकास होत असताना नागरिकांचेही हित जोपासणे प्रशासन व लोकप्रतिनिधींचे कर्तव्य आहे. प्रकाशा-शहादा रस्त्याचे रुंदीकरणाचे काम झाले आहे. या रस्त्याच्या कामात मातीचा भराव करण्यासाठी संबंधित ठेकेदाराने करजई गावालगत गावठाण जागेची निवड केली. त्या जागेवर जेसीबी व पोकलेन मशीनद्वारे मातीचा उपसा करण्यात आला. त्यामुळे सुमारे ७० ते ८० फूट खोल व १०० फूट लांब असा मोठा खड्डा झाला आहे. हा खड्डा म्हणजे तलावच तयार झाला आहे. येथून मातीचा उपसा करण्यासाठी ठेकेदाराने संबंधित विभागाची परवानगी घेतली होती का? असा सवाल परिसरातील ग्रामस्थ उपस्थित करीत आहेत. जर परवानगी दिली घेतली असेल तर नियमाप्रमाणे खोदकाम झाले आहे का? असे एक ना अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत. ठेकेदाराने रस्त्यावर टाकण्यासाठी माती उपसल्यानंतर खड्ड्याभोवती संरक्षक कठडे केलेले नाहीत. नुकत्याच झालेल्या जोरदार पावसामुळे या खड्ड्यात मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे. या पाण्यामुळे १० ते १२ किलोमीटर अंतरातील कूपनलिकांना फायदा होणार आहे ही चांगली बाब असली तरी तेथे उपाययोजना करणे आवश्यक आहे. अनंत चतुर्दशीच्या दिवशी शेळ्या चारण्यासाठी गेलेला करजई येथील २१ वर्षीय तरुण भिकेसिंग सरदारसिंग गिरासे हा या खड्ड्यातील पाण्यात बुडून मरण पावला. घरातील कर्ता व एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाल्याने त्याच्या कुटुंबावर मोठा आघात झाला आहे. या तलावासदृश खड्ड्याजवळून लोकांचे व गुरा-ढोरांचे नेहमी येणे-जाणे असते. मात्र, त्याठिकाणी सुरक्षेसाठी कुठल्याही उपाययोजना केलेल्या नाहीत. त्यामुळे भविष्यात हा तलाव लोकांसाठी व गुरा-ढोरांसाठी जीवघेणा ठरू शकतो, अशी भीती ग्रामस्थांमधून व्यक्त होत आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने ही बाब गांभीर्याने घेऊन याठिकाणी वेळीच उपाययोजना करण्याची गरज आहे, अन्यथा अनंत चतुर्दशीला घडलेल्या घटनेप्रमाणे घटना घडतच राहतील.