लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : रोजगार उपलब्ध होत नसल्यामुळे धडगाव व मोलगी परिसरातील मजूर किरकोळ शेतीची कामे आटोपून महाराष्टÑासह गुजरात, मध्यप्रदेशात स्थलांतरीत होत आहे. त्यामुळे बहुतांश गावे ओस पडली आहे.दुर्गम भागातील शेत जमिनी चांगल्या उत्पादनांसाठी प्रतिकुल आहे, तेथील शेतकऱ्यांना बागायती शेती करताच येत नाही. शेती केवळ पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. त्यामुळे बहुतांश शेतकऱ्यांकडून खरीप हंगामातील शेतीच केली जात आहे. उर्वरित वेळेत या भागातील नागरिकांना कुठलाही रोजगार उपलब्ध होत नाही. त्यामुळे काही मजुरांनी आॅक्टोबर व नोव्हेंबरमध्ये महाराष्ट्रासह गुजरात व मध्यप्रदेशात स्थलांतरीत झाले होते. काही नागरिक खरीप हंगामातील पिकांची कापणी व मळणीची कामे अवकाळी पावसामुळे लांबणीवर पडल्याने मुळगावीच थांबले होते. थांबलेल्या या नागरिक तथा शेतकºयांमार्फत खरीपातील उरली-सुरली कामे पूर्ण केली. त्यानंतर हे नागरिकही तिन्ही राज्यात स्थलांतरीत होऊ लागली आहे.या भागातील मजूर हे प्रामुख्याने उसतोड व साखर कारखान्यांमध्ये कामासाठी जात आहे. उसतोडीसाठी धडगाव तालुक्यातील कुंडल, पाठाली, गोरांबा, जुगणी, त्रिशुल, निगदी, झुम्मट, केली मोजरा, या भागातील मजुरांनी स्थलांतर केले आहे. हे मजूर पुणे जिल्ह्यासह कºहाड, पंढरपूर, सातारा, अहमदनगर या भागात स्थलांतरीत झाले आहे. तर जुगरातमधील सुरत जिल्ह्यात तर मध्यप्रदेशातील ठिकरी भागात गेल्याचे आढळून येत आहे. या पाठोपाठ अक्कलकुवा तालुक्यातील पिंप्रापाणी, उमटी, पिंवटी, चनवाई, या भागातील मजूर गुजरातमध्ये रवाना झाले आहे.साखर कारखान्यांमधील कामासाठी प्रामुख्याने कुंकरमुंडा, मटावली येथी कारखाने गुजरातमधील असले तरी मुळगावापासून जवळ पडत असल्याने सर्वाधिक मजूर या गावांमध्ये दाखल झाले आहे. तर मध्यप्रदेशातील दुर्गा खांडसरी हा कारखानाही तोरणमाळ भागातील मजूरांना जवळ तथा सोयीस्कर ठरत असल्याने तेथेही मजूर रवाना झाले आहे. मजुरांच्या स्थांतरामुळे काही गावे ओस पडली आहे.
दुर्गम भागातील मजूर तीन राज्यात विभागले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 21, 2019 12:31 IST