शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

केळी निर्यातीला ‘कोराना’चा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 25, 2020 13:54 IST

लोकमत न्यूज नेटवर्क शहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने आंतरराज्य वाहतुकीसह आंतरराष्ट्रीय पातळीवरही हवाई वाहतूक बंद केला ...

लोकमत न्यूज नेटवर्कशहादा : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केंद्र व राज्य शासनाने आंतरराज्य वाहतुकीसह आंतरराष्ट्रीय पातळीवरही हवाई वाहतूक बंद केला आहे. त्याचा फटका जिल्ह्यातील केळी उत्पादकांना बसणार आहे. ३१ मार्चपर्यंत राज्यात संचारबंदी असल्याने या महिन्यात केळीची तोडणी झालेली नाही. एप्रिल महिन्यात परिस्थितीत सुधारणा होईलच याचीही शाश्वती नाही, त्यामुळे केळी उत्पादक शेतकरी अडचणीत सापडणार आहे. परिणामी आखाती देशात होणारी केळीची निर्यात संकटात सापडली आहे.शहादा तालुक्यातील केळी कोल्हापूर येथील धरती अ‍ॅग्रो तर गुजरातमधील देसाई अ‍ॅग्रो व एन. आय. ए. अ‍ॅग्रो या कंपन्यांच्या माध्यमातून देश व आंतरराष्टÑीय पातळीवर निर्यात होते. तालुक्यातील केळी उत्पादकशेतकरी नामांकित कंपन्यांच्या टिशू कल्चरद्वारे निर्मिती रोपांची लागवड करीत आहे. या कंपन्यांच्या माध्यमातून लागवड झाल्यानंतर खत देणे व किटकनाशक फवारणीसह वर्षभर विविध कामे या शेतकऱ्यांची पार पाडली. फळधारणा झाल्यानंतर केळीच्या घडाची देखभाल व निगा राखण्यात आली. फळाची लांबी व गोलाईनुसार केळीला परदेशात भाव मिळत असतो. यासाठी केळीचे बेचाळीस कॅलिबर गुणवत्ता आवश्यक असते.केळीच्या प्रत्येक फळात पाण्याचे प्रमाण आवश्यक असणे गरजेचे आहे. केळी तोडणीपासून परदेशात पोहोचेपर्यंत साधारणत: २० ते ४० दिवसांच्या कालावधी लागत असल्याने तेवढा काळ ते फळ टिकले पाहिजे तरच या निर्यातीतून शेतकºयाला उत्पन्न मिळते.साधारणत: मार्च महिन्यापासून केळी तोडणी सुरु झाली आहे. केंद्र व राज्य शासनाची कुठलीही मदत न घेता ब्राह्मणपुरी ता. शहादा येथील शेतकऱ्यांनी त्यांनी पिकवलेली केळी आखाती देशात निर्यात करून आदर्श निर्माण केला. विशेषत: सुरुवातीला प्रायोगिक तत्त्वावरील निर्यात आज व्यापक झाली आहे. यातून शेतकºयांना भरघोस उत्पन्न मिळत आहे.ब्राह्मणपुरी येथील संजय पाटील, विठ्ठल पाटील, रोहिदास पाटील, गोपाळ पाटील, जगन्नाथ पाटील, अनिल पाटील, अंशुमन पाटील आदी शेतकºयांनी गेल्या तीन वर्षात सर्वाधिक केळी आखाती देशात निर्यात करून शेतकºयांसमोर एक वेगळा आदर्श निर्माण केला आहे. परंतु सद्यस्थिती निर्माण झालेल्या कोरोनाच्या नव्या संकटामुळे अवघ्या जिल्ह्यातील केळीची तोडणी बंद करण्यात आली आहे. पुढील महिन्यातही कोरोनाची परिस्थिती अशीच राहिल्यास केळी उत्पादकांचे मोठे नुकसान होण्याचर शक्यता नाकारता येत नाही.खाजगी कंपन्यांच्या माध्यमातून केळीची निर्यात केली जात आहे. परंतु कोरोनाच्या पार्श्वभूमीवर या महिन्यात केळीची तोडणी झाली नाही. असे असले तरी आम्ही निर्यातदार कंपन्यांच्या संपर्कात आहे. दरम्यान एप्रिलनंतर कंपन्यांचे पदाधिकारी शेतकºयांशी चर्चा करीत पुढील निर्णय घेणार आहे. वर्षभर मेहनत करून उत्पादन घेतले आहे. याची निर्यात झाली नाही तर शेतकºयांना मोठे नुकसान सहन करावे लागणार आहे.-अंशुमन पाटील, केळी उत्पादक, ब्राह्मणपुरी ता. शहादा