शहरं
Join us  
Trending Stories
1
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
2
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
3
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
4
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
5
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
6
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
7
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
8
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
9
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
10
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
11
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
12
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
13
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
14
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
15
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
16
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
17
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर
18
लॉरेन्स गँग नाही...! एल्विश यादवच्या घरावर भाऊ गँगने गोळीबार केला; कारणही सांगितले...
19
घरावर गोळीबार झालेल्या प्रसिद्ध युट्यूबर एल्विश यादवची संपत्ती किती? कमाईचं मुख्य साधन कोणतं?
20
२ राजयोगात शेवटचा श्रावण सोमवार: ‘ही’ शिवामूठ अर्पण करा; शिवकृपेची सुवर्ण संधी चुकवू नका!

कोंढावळ गावात एकाच दिवसात ४९ रुग्ण कोरोना पाॅझिटिव्ह

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:32 IST

कोंढावळ : गेल्या आठ दिवसांपासून गावात मलेरिया, टायफाईडसह कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आढळून येत असून, दोन जणांचा ...

कोंढावळ : गेल्या आठ दिवसांपासून गावात मलेरिया, टायफाईडसह कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत असल्याचे आढळून येत असून, दोन जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. त्यामुळे गावात आरोग्य विभागातर्फे २७ मार्च रोजी ११४ जणांचे स्वॅब घेण्यात आले होते. त्यापैकी ४९ जणांचा अहवाल ३१ मार्च रोजी कोरोना पाॅझिटिव्ह आला आहे. त्यामुळे संपूर्ण गावात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

गेल्या चार दिवसांत या ४९ लोकांचा किती जणांशी संपर्क आला हे शोधून काढणे जिकिरीचे झाले आहे. गुरुवारी दुपारी आरोग्य कर्मचाऱ्यांनी व आशा सेविकांनी गावातील कोरोना पाॅझिटिव्ह रुग्णांच्या घरी जाऊन गोळ्यांचे वाटप केले. यावेळी एकही वैद्यकीय अधिकारी उपस्थित नव्हता.

एकाच दिवशी ४९ जणांचा पाॅझिटिव्ह अहवाल आल्याने प्रशासनाने एकाही रुग्णाला रुग्णालयात नेले नसल्याने गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्यामुळे आरोग्य विभागाने वेळीच याकडे लक्ष न दिल्यास मोठ्या प्रमाणावर रुग्णांना आपला जीव गमवावा लागणार असल्याचे बोलले जात आहे. तसेच गावातील प्रत्येक घरोघरी जाऊन कोरोना तपासणी करण्यात यावी, अशी मागणी करण्यात येत आहे.

यावेळी महसूल प्रशासनातर्फे गावाला नाेटीस देण्यात आली असून, १ एप्रिल ते १५ एप्रिलपर्यंत गावात लाॅकडाऊन घोषिक करण्यात आले असून, या बंद कालावधीत अत्यावश्यक सुविधेव्यतिरिक्त कोणतीही प्रतिष्ठाने सुरू राहणार नाही, असे आदेश देण्यात आले आहेत.

यावेळी लक्ष्मण भिल, डिगंबर माळी, पोलीस पाटील सुरेशगीर बावा, मंडळ अधिकारी विजय साळवे, एस. आर. सावळे, महेश ठाकरे, धनंजय वळवी, राकेश माळी, नवनीत माळी, आरोग्य कर्मचारी, आशा सेविका, आदींनी गावात पाहणी केली.

तीन वर्षांपासून बंद पडलेला फिल्टर प्लॅन सुरू करा

गावात शुद्ध पाणीपुरवठा करण्यासाठी उभारण्यात आलेला फिल्टर प्लॅन गेल्या तीन वर्षांपासून बंदावस्थेत पडून आहे. तो लवकरात लवकर दुरुस्त करून सुरू करण्यात यावा, अशी मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे. या प्लॅनमुळे गावातील नागरिकांना शुद्ध पिण्याचे पाणी उपलब्ध होणार आहे.