शहरं
Join us  
Trending Stories
1
वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरण: गळफासासाठी वापरलेली साडी आणि पंखा ७१ किलो वजन पेलू शकतो का?
2
सैनिकांचे मृतदेह, युद्धकैद्यांची अदलाबदल,...; रशिया-युक्रेन यांच्या शांतता बैठकीत काय ठरलं?
3
३.५ किलो सोने, २ किलो चांदी अन् १ कोटी रोकड...: IRS अधिकाऱ्याच्या घरी सापडलं घबाड
4
NEET PG 2025 Exam: नीट परीक्षा पुढे ढकलली, सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतर एनबीईएमएसचा मोठा निर्णय
5
परीक्षेहून घरी परतणाऱ्या तरुणांना टिप्परनं उडवलं; एकाचा जागीच मृत्यू, दुसऱ्याने पाय गमावला
6
विराटचा षटकार भारी; की श्रेयस अय्यरनं मारलेला चौकार? दोघांसमोरही होता बुमराह (VIDEO)
7
पाकिस्तान काही सुधारणार नाही! पुन्हा भारताची कॉपी केली, शिष्टमंडळ परदेशात पाठवणार
8
IPL 2025 Final : कमालीचा योगायोग! ७ महिन्यांत दुसऱ्यांदा फायनलमध्ये भिडणार अय्यर-पाटीदार
9
भारताशी गद्दारी करणाऱ्या रवी वर्माच्या पाेलीस काेठडीत वाढ; वकिलाचा कोर्टात भलताच दावा
10
Thane Water Cut: ठाणेकरांनो लक्ष द्या! 'या' दिवशी १२ तास शहरातील पाणीपुरवठा राहणार बंद
11
रशियाला आणखी एक देश ताकद दाखवणार; १२ अणु पाणबुड्यांची घोषणा
12
पहाटे तीन वाजताच एटीएसची छापेमारी; ISIS चा म्होरक्या साकिब नाचणच्या गावात मोठी कारवाई
13
जोतिबाला गेला अन् वाट चुकला...शेवटचा काॅल भावाला केला; परळीच्या तरुणाची लातुरात आत्महत्या
14
'ऑपरेशन सिंदूर'नंतर परदेश दौऱ्यावर गेलेलं शिष्टमंडळ परतल्यावर PM नरेंद्र मोदींंना भेटणार
15
Women's ODI World Cup 2025 : शेड्यूल ठरलं! पण पाकमुळं 'फायनल' भारतात होणार की, बाहेर हा प्रश्न उरला
16
Ajit Pawar: दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार? अजित पवार म्हणाले, "आमची विचारधारा वेगवेगळी असली तरी…"
17
रिंकू सिंहची होणारी पत्नी खासदार, किती आहे तिची संपत्ती...; डोळ्यांवर विश्वास बसणार नाही...
18
सत्यजित तांबेंचे विधान बालिशपणाचे, काँग्रेसने त्यांना...; बाळासाहेब थोरातांनी फटकारले
19
शिलाँगला हनिमूनसाठी गेलेल्या राजाचा मृतदेह सापडला; सोनम अद्याप बेपत्ताच...
20
पाटण्याहून उड्डाण केलेल्या विमानाला गिधाडाची धडक, रांचीत इमर्जन्सी लँडिंग; 4000 फूट उंचावर अडकला होता 175 जणांचा जीव

केंद्र सरकारच्या योजना बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी किसान मोर्चा कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियान सुरू करण्यात आले असून, या निमित्ताने गुरुवारी तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक ...

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियान सुरू करण्यात आले असून, या निमित्ताने गुरुवारी तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सरचिटणीस सुधाकर भोयर, प्रदेश संघटक मकरंद कोरडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश वळवी, पंचायत समिती सदस्य विक्रम पाडवी, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपूत, पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, विजयसिंह राजपूत, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, संजय वाणी, ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी, प्रवीणसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारमुळे केंद्र सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास उशीर होत आहे. अनेक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनांपासून वंचित राहावे लागते. यासाठी आता आम्ही शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन जनजागृती मोहीम राबविणार आहोत. योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने शेतकरी सन्मान योजनेसह शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आर्थिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कसलीच मदत केली नाही उलट पीक विम्याचे निकष बदलून विमा कंपन्यांना मालामाल केले. खऱ्या अर्थाने राज्यातील ठाकरे सरकार शेतकरी हिताविरोधी आहे, अशी टीकाही त्यांनी केली. प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी केले. या मेळाव्याला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश मराठे तर आभार पंचायत समिती सदस्य विजयसिंग राजपूत यांनी मानले.