शहरं
Join us  
Trending Stories
1
शिंदेसेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्याचा प्रताप; पक्षप्रवेशात ४०-५० नावे बोगस निघाली, प्रकरण काय?
2
प्रत्येक भारतीयाच्या डोक्यावर १.३२ लाखांचे कर्ज; ...तर कराचा बोजा अधिक वाढेल
3
इथेनॉल मिश्रित पेट्रोल वाहनांचे इंजिन, मायलेजवर परिणाम करते? लोकांमध्ये दावे सुरु होताच मंत्रायलाने केला खुलासा...
4
गुंतवणूकदारांसाठी 'सुवर्ण संधी'! ब्रोकरेज फर्मकडून 'या' ५ शेअर्सना खरेदीचा सल्ला, काय आहे टार्गेट प्राइस?
5
२७ टक्के ओबीसी आरक्षणासह नव्या प्रभाग रचनेनुसार निवडणुका; पालिका निवडणुकांबाबतच्या दोन याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळल्या
6
अमेरिकेला भारताची गरज, डीलसाठीच ट्रम्प यांची धडपड; एक्सपर्टनं सांगितली इन्साईड स्टोरी
7
त्यानं लग्नात दिलेलं वचन पाळलं, पत्नीला मृत्यूच्या दारातून खेचून आणलं! पण...; ऐकून डोळ्यांत येईल पाणी
8
बेलापूर न्यायालयामध्ये थेट लिंबू-मिरचीचा उतारा; दुसऱ्यांदा घडली घटना; या प्रकारानंतर एक न्यायाधीश चार दिवस रजेवर
9
महिलेचा दोन महिन्यांपूर्वी मृत्यू, मुलगा वापरत होता आईचं युपीआय अन् अचानक खात्यात आले अरबो रुपये!
10
Share Market Opening: शेअर बाजाराची रेड झोनमध्ये सुरुवात; मोठ्या घसरणीसह उघडले हे स्टॉक्स
11
ऐश्वर्यासोबत घटस्फोट घेतल्यानंतर धनुष या मराठमोळ्या अभिनेत्रीला करतोय डेट?, अशी मिळाली हिंट
12
PPF नाही, पैसे छापण्याची मशीन! दरवर्षी मिळेल ₹२,८८,८४२ चं जबरदस्त व्याज, पाहा सिक्रेट ट्रिक
13
मीरारोडच्या 'केम छो' बारवर धाड; १८ बारबालांसह एकूण ३६ जणांवर गुन्हा दाखल
14
आजचे राशीभविष्य, ०५ ऑगस्ट २०२५: अनपेक्षित यश, अडकलेले पैसे मिळतील; चौफेर लाभ
15
गजलक्ष्मी समसप्तक योगात रक्षाबंधन: १० राशींना लॉटरी, सुख-सुबत्ता; भरभराट-भाग्योदय, वरदान काळ!
16
नोकरीत बिहारींचा पहिला हक्क; नवे ‘डोमिसाइल’ धोरण जाहीर
17
आरोप करणाऱ्या देशांनी आधी स्वतःकडे बघावे! ट्रम्पच्या टॅरिफ धमकीला सरकारचे थेट उत्तर
18
टॉयलेटमध्येही फोन वापरता? मग त्याला किती वेळा स्वच्छ ठेवता? धोका आधीच जाणून घ्या!
19
गरिबांसाठी भिडणाऱ्या, लढणाऱ्या नेत्याची एक्झिट, आदिवासींच्या हक्कांसाठी शिबू सोरेन यांनी दिला लढा

केंद्र सरकारच्या योजना बांधापर्यंत पोहोचविण्यासाठी किसान मोर्चा कटिबद्ध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2021 04:30 IST

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियान सुरू करण्यात आले असून, या निमित्ताने गुरुवारी तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक ...

भाजपा किसान मोर्चाच्या वतीने राज्यव्यापी शेतकरी संवाद अभियान सुरू करण्यात आले असून, या निमित्ताने गुरुवारी तळोदा येथील आदिवासी सांस्कृतिक भवन येथे शेतकरी संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर नगराध्यक्ष अजय परदेशी, प्रदेश सरचिटणीस सुधाकर भोयर, प्रदेश संघटक मकरंद कोरडे, जिल्हा परिषद सदस्य प्रकाश वळवी, पंचायत समिती सदस्य विक्रम पाडवी, भाजपाचे माजी तालुका अध्यक्ष राजेंद्र राजपूत, पंचायत समिती सदस्य दाज्या पावरा, विजयसिंह राजपूत, किसान मोर्चाचे तालुका अध्यक्ष महेंद्र पाटील, संजय वाणी, ओबीसी युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष प्रदीप शेंडे, जिल्हा उपाध्यक्ष शिरीष माळी, प्रवीणसिंह राजपूत आदी उपस्थित होते.

ते पुढे म्हणाले की, राज्य सरकारमुळे केंद्र सरकारच्या योजना शेतकऱ्यांपर्यंत पोहचण्यास उशीर होत आहे. अनेक शेतकऱ्यांना केंद्र सरकारच्या योजनांपासून वंचित राहावे लागते. यासाठी आता आम्ही शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊन जनजागृती मोहीम राबविणार आहोत. योजनांचा लाभ शेतकऱ्यांना कसा घेता येईल, याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

शेतकऱ्यांना केंद्रबिंदू मानून केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वातील सरकारने शेतकरी सन्मान योजनेसह शेतकऱ्यांच्या हिताचे अनेक महत्त्वपूर्ण निर्णय घेऊन आर्थिक प्रगतीच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे काम केले. मात्र, राज्यातील महाविकास आघाडी सरकारने शेतकऱ्यांना कसलीच मदत केली नाही उलट पीक विम्याचे निकष बदलून विमा कंपन्यांना मालामाल केले. खऱ्या अर्थाने राज्यातील ठाकरे सरकार शेतकरी हिताविरोधी आहे, अशी टीकाही त्यांनी केली. प्रास्ताविक महेंद्र पाटील यांनी केले. या मेळाव्याला तालुक्यातील शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सूत्रसंचालन अविनाश मराठे तर आभार पंचायत समिती सदस्य विजयसिंग राजपूत यांनी मानले.