शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
2
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले
3
Kishtwar Cloud Burst Photos: मृत्यूचं तांडव... जीवलगांचा आक्रोश; जिवंत माणसं गाडली, 52 मृतदेह सापडले, 200 बेपत्ता
4
धनंजय मुंडेकडून १० हजार रुपये वसूल करण्याचे खंडपीठाचे आदेश; नेमके कारण काय?
5
हॉटेलच्या रुममध्ये सापडला महिला आणि पुरुषाचा मृतदेह; पोलिसांनी दरवाजा तोडला धक्काच बसला
6
जजच्या परीक्षेची तयारी करणारी युवती चालत्या ट्रेनमधून गायब; ७ दिवस सुगावा नाही, ५ थेअरी समोर आल्या
7
मैत्रिणीने पार्टीला बोलावलं आणि दारूमध्ये मिसळले ड्रग्ज; तरुणीवर सामूहिक बलात्कार करून बनवले व्हिडीओ
8
Aadhaar Card : खुशखबर! ई-आधार अ‍ॅपवरुन घरबसल्या काही मिनिटांत नाव, पत्ता, मोबाईल नंबर अपडेट करता येणार
9
वाहनधारकांना मोठा दिलासा! हाय सिक्युरिटी नंबर प्लेट लावण्यास 'या' तारखेपर्यंत मुदतवाढ
10
'ट्रम्प यांनी टॅरिफवर चर्चा करण्यासाठी बोलावले, पण नोबेलबद्दल बोलायला लागले'; नॉर्वेजियन वृत्तपत्राने डोनाल्ड ट्रम्प यांचा पर्दाफाश केला
11
'मी फक्त मटण हंडीचं आमंत्रण स्वीकारतो'; दहीहंडीच्या मुद्द्यावर राज ठाकरेंचं उत्तर, काय घडलं?
12
मोठी बातमी! सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात खंडपीठाचे एसआयटी स्थापन करण्याचे आदेश
13
ही घरे नाहीत तर पुढच्या पिढ्यांसाठी ‘सोन्यासारखी’ गुंतवणूक; CM देवेंद्र फडणवीसांचा BDD वासियांना सल्ला
14
"जबान संभालें, वरना...!"; पाकिस्तानच्या चिथावणीखोर वक्तव्यांवर भारताचं चोख प्रत्युत्तर
15
दिल्ली, बीजिंग आणि मॉस्कोच्या लागोपाठ बैठका; काय आहे पंतप्रधान मोदींची SCO रणनीती?
16
Vir Chakra: दहशतवाद्यांचे अड्डे उद्ध्वस्त करणाऱ्या फाइटर पायलट्सना 'वीर चक्र'! कोण आहेत ते नऊ जवान?
17
ढगफुटीनंतर किश्तवाडमध्ये मृत्यूचं तांडव, आतापर्यंत ३३ जणांचा मृत्यू, १२० हून अधिक जखमी, २०० जण बेपत्ता
18
आमदार पतीची हत्या, पुढे 3 वेळा जिंकली निवडणूक; आता सपाने केली हकालपट्टी, कोण आहे पूजा पाल?
19
India-Pakistan Tension : '...तर तुम्हाला सोसणार नाही', पाकिस्तानच्या धमकीला भारताने फटकारले
20
सावत्र आईबरोबर मुलगा करत होता अश्लील चाळे, नेमकं त्याच वेळी बापाने पाहिलं अन् मग...

खान्देश लोककला महोत्सव ठरला लक्षवेधी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 26, 2018 13:03 IST

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : शहादा तालुक्यातील असलोद येथे खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाच्या वतीने खान्देश लोककला महोत्सव 2018 उत्साहात झाला. ग्रामीण भागातील कलावंतांनी सादर केलेल्या भजने, भारुडे, एकतारी भजन यामुळे प्रेक्षक भारावून गेले. ग्रामीण संस्कृतीचे व विविध कला दर्शनाने उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. निस्वार्थ भावनेने कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणा:या ...

लोकमत ऑनलाईननंदुरबार, दि़ 26 : शहादा तालुक्यातील असलोद येथे खान्देश शाहीर कलावंत वारकरी मंडळाच्या वतीने खान्देश लोककला महोत्सव 2018 उत्साहात झाला. ग्रामीण भागातील कलावंतांनी सादर केलेल्या भजने, भारुडे, एकतारी भजन यामुळे प्रेक्षक भारावून गेले. ग्रामीण संस्कृतीचे व विविध कला दर्शनाने उपस्थित मान्यवरांनी कौतुक केले. निस्वार्थ भावनेने कलेच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणा:या कलाकारांना सरकारने जाचक अटी शिथील करून भरघोस मानधन दिल्यास ग्रामीण कला संस्कृती जीवंत राहण्यास मदत होईल, असा सूर या महोत्सवातून व्यक्त करण्यात आला.जिल्ह्यात प्रथमच हा लोककला महोत्सव असलोद येथील संत ज्ञानेश्वर महाराज भजनी मंडळाच्या प्रयत्नाने भरविण्यात आला. या महोत्सवाचे उद्घाटन मंडळाचे प्रदेश अध्यक्ष अनिल जगताप यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून काँग्रेसचे तालुकाध्यक्ष दिलीप गांगुर्डे, मंडळाचे प्रदेश महासचिव शोभाबाई खैरनार, प्रदेश सदसञया सरुबाई महाजन, जिल्हाध्यक्ष पांडुरंग माळी, तालुकाध्यक्ष छोटू शिंदे, पं.स. सदस्य लगन पावरा, भैय्या वानखेडे, सरपंच बेबीबाई सोनवणे उपस्थित होते.कलावंतांचा गुणगौरवमहोत्सवाच्या प्रारंभी नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यातून आलेल्या शाहीर, भारुड कलावंत, कीर्तनकार, भजन कलावंत अशा 25 कलावंतांचा गुणगौरव मानचिन्ह व शाल, श्रीफळ देऊन मंडळाच्या पदाधिका:यांच्या हस्ते करण्यात आला. याप्रसंगी सहभागी झालेल्या प्रत्येक भजनी मंडळ कलावंतांना उत्तेजनार्थ प्रशस्तीपत्र देण्यात आले.कला सादरीकरणाने प्रेक्षक भारावलेया लोककला महोत्सवात संपूर्ण खान्देशातून सुमारे तीन हजार कलावंत सहभागी झाले होते. त्यात धुळे, साक्री, शिरपूर, नंदुरबार, पारोळा, निजामपूर या भागातील कलावंतांनी हजेरी लावून आपली कला सादर केली. त्यात एका कलापथकाने सादर केलेले समाज जागृतीपर भारुडाने सर्वाचे लक्ष वेधून घेतले. तसे आदिवासी भागातून आलेल्या भजनी मंडळांनीही एकतारी भजने सादर करून सर्वाना आकर्षित केले. अनेक भजनी मंडळातील कलावंतांनी उत्कृष्टपणे भजने सादर केली. सर्व साहित्यानिशी पेटी, तबला, टाळ, मृदुंग यासह कलावंतांनी हजेरी लावल्याने कार्यक्रमात मोठी भर पडली.मान्यवरांची उपस्थितीमहोत्सवात भजनांचा कार्यक्रम सुरू असताना सातपुडा साखर कारखान्याचे चेअरमन दीपक पाटील, माजी मंत्री अ‍ॅड.पद्माकर वळवी, राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत, जि.प.चे उपाध्यक्ष सुहास नाईक, नगरसेवक प्रकाश ठाकरे आदींनी हजेरी लावली. याप्रसंगी राजेंद्रकुमार गावीत यांनी ग्रामीण भागात एवढे चांगले कलावंत असताना कला अकादमीच्या माध्यमातून त्यांची दखल घेतली गेली नाही याबाबत खंत व्यक्त करून महोत्सवात सहभागी कलावंतांचे कौतुक केले. खेडेगावात राहून भजने, कीर्तन, भारुडाच्या माध्यमातून समाज जागृतीचे खरे कार्य करीत लोककला जीवंत ठेवण्याचे काम पिढय़ान्पिढय़ा सुरू ठेवूनही समाजात कशा कलाकारांना किंमत दिली जात नाही. यापुढे अशा कलावंतांची निश्चितपणे दखल घेतली जाईल, असे आश्वासन दिले. अ‍ॅड.पद्माकर वळवी यांनी लोककला महोत्सवाच्या आयोजनाबाबत प्रशंसोद्गार काढून या महोत्सवामुळे कलाकारांच्या कलेचे ख:या अर्थाने दर्शन घडते. खेडेगावात भजनासह भारुड, गवळण सादर करणा:या कलाकारांचे समाजात मोठे योगदान असते. त्यांच्या निस्वार्थी सेवेची सरकारने गंभीरपणे दखल घेऊन अशा कलाकारांना प्रोत्साहन देण्यासाठी शासनाने मानधनात वाढ केली पाहिजे, असे सांगितले. दीपक पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले.या महोत्सवाची सांगता ज्ञानेश्वर भजनी मंडळाने सादर केलेल्या भजनाने झाली. महोत्सव यशस्वीतेसाठी ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे अध्यक्ष शेणू पाटील, प्रवीण गिरासे, देवेसिंग गिरासे, संतोष चव्हाण, रमेश पवार, लिंबा पवार, गणेश निकम, रतिलाल लोहार, धर्मा मराठे, दिलीप राजभोज, तालुकाध्यक्ष छोटू शिंदे व ज्ञानेश्वर भजनी मंडळाचे पदाधिकारी, ग्रामस्थांनी परिश्रम घेतले. सूत्रसंचालन दीपक गिरासे यांनी तर आभार नानाभाऊ शिंदे यांनी मानले.