प्रारंभी मान्यवरांच्या हस्ते सानेगुरूजींच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. अध्यक्षस्थानी जायन्ट्सचे फेडरेशनचे अधिकारी माणक चौधरी तर प्रमुख पाहुणे म्हणून अवंतिका फाउंडेशनच्या अध्यक्षा पल्लवी प्रकाशकर, शहादा जायन्ट्सचे अध्यक्ष भूषण बाविस्कर, सहेली अध्यक्षा दीपाली बाविस्कर, एकलव्य भिल्ल सेवा संघटनेचे अध्यक्ष तुकाराम मोरे, रवींद्र प्रकाशकर, मुख्याध्यापक धरमदास पाटील उपस्थित होते.
यावेळी मार्गदर्शन करताना माणक चौधरी म्हणाले की, निसर्ग साखळीतील महत्त्वाची दुवा असलेली चिमणी वाचावी, म्हणून आपण दरवर्षी चिमणी दिवस साजरा करतो. गेल्या काही वर्षापासून झपाट्याने चिमण्या नष्ट झाल्या, त्याचे प्रमुख कारण म्हणजे वृक्षांची झालेली कत्तल, टोलेगंज इमारती, मोबाइलचे टावर आणि मोठ्या प्रमाणावर कीटकनाशक औषधी वापरल्याने नष्ट झाल्या. पल्लवी प्रकाशकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्रास्तविक भूषण बाविस्कर यांनी केले. सूत्रसंचालन श्यामलाल पावरा तर आभार मनिषा कुंदे यांनी मानले. कार्यक्रमासाठी शाळेत कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.