शहरं
Join us  
Trending Stories
1
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
2
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
3
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
4
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
5
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
6
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?
7
"संविधान न्याय देण्यात अपयशी, राजेशाही..."; नेपाळच्या गोंधळावर मनीषा कोईरालाचे रोखठोक मत
8
विरोधकांची इच्छा पूर्ण होणार...? NDA मध्ये फुट पडणार...? "15 जागा मिळाल्या नाही तर..."; 'या' पक्षानं केली मोदींचं टेन्शन वाढवणारी 'मागणी'
9
'माझ्याकडे पैशांची कमतरता नाही; महिन्याला २०० कोटी कमवण्याची बुद्धी...', नितीन गडकरींचे वक्तव्य
10
IND vs PAK: टॉस अन् मॅचच्या निकालाचा संबंध काय..? जाणून घ्या 'या' मैदानावरचं खास कनेक्शन
11
“ह्याच जागेतून इतिहास घडविला गेला”; हर्षवर्धन सपकाळ यांची लंडन येथील आंबेडकर हाऊसला भेट
12
पितृपक्ष २०२५: ‘ही’ ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी देवीची कालातीत कृपा होईल; लाभच लाभ मिळतील!
13
शेअर असावा तर असा...! 5 दिवस अन् ₹40000 कोटींची कमाई, रिलायन्स-टीसीएसलाही टाकलं मागे; गुंतवणूकदारांना केलं मालामाल
14
सतत मोबाईलचा वापर म्हणजे मृत्यूला आमंत्रण; मेंदू आणि शरीरावर होतो जीवघेणा परिणाम
15
"पाकिस्तानसोबत मॅच खेळायची असेल तर पहलगाममध्ये मारला गेलेला माझा भाऊ परत आणून द्या"
16
‘ते म्हणतील चंद्रावर सर्वप्रथम मारुती गेला होता’, इंडिया आघाडीतील नेत्या कनिमोळींचं विधान  
17
साप्ताहिक राशीभविष्य: ९ राशींना अनुकूलता, यश-प्रगती-लाभ; बुडालेले पैसे मिळतील, वचन देऊ नये!
18
'संजय राऊतांसारखा बिनडोक राजकारणी महाराष्ट्रात होणे नाही', राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाची टीका
19
Smriti Mandhana Run Out : चुकली अन् फसली! शतकी भागीदारीनंतर स्मृती-प्रतिका हिट जोडी फुटली!
20
ITR भरण्यासाठी फक्त एक दिवस उरला; पण, 'या' कारणांमुळे करदाते टेन्शनमध्ये; मुदतवाढीसाठी सोशल मीडियावर ट्रेंड

तोरणमाळ येथे जटाधारी साधूंची मांदियाळी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 21, 2020 13:15 IST

राधेश्याम कुलथे । लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ ता़ धडगाव येथे ...

राधेश्याम कुलथे ।लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : राज्यातील दुसऱ्या क्रमांकाचे थंड हवेचे ठिकाण असलेल्या तोरणमाळ ता़ धडगाव येथे गुरू गोरक्षनाथ महाराजांच्या यात्रोत्सवाला शुक्रवारी सुरुवात होत आहे़ या पार्श्वभूमीवर याठिकाणी जटाधारी साधूंनी उपस्थिती दिली असून भाविकांची पावलेही तोरणमाळकडे वळू लागली आहेत़सातपुड्याच्या डोंगररांगात असलेले तोरणमाळ हे प्रेक्षणीय स्थळांसोबत गुरु गोरक्षनाथ महाराज यांच्या मंदिरांसाठी ओळखले जाते़ नाथ संप्रदायाच्या भाविकांसाठी पवित्र स्थळ असलेल्या तोरणमाळ येथे दरवर्षी महाशिवरात्रीला यात्रोत्सवाची दीर्घ परंपरा आहे़ या यात्रोत्सवात महाराष्ट्र, गुजरात आणि मध्यप्रदेशातील किमान १ लाख भाविकांची हजेरी लागते़ होलिकोत्सवाच्या काही दिवस आधी सुरु होणाºया या यात्रोत्सवाचे तीनराज्यात विशेष महत्त्व असल्याने येथे भाविक हजेरी लावून महाप्रसादाचा आनंद घेतात़तीन दिवस सुरु राहणाºया या यात्रोत्सवात प्रामुख्याने गोरक्षनाथ महाराज मंदिर, मंच्छिंद्रनाथ महाराजांची गुफा यासह विविध ठिकाणच्या मंदिरांमध्ये दर्शन घेत भाविक येथील कमल तलाव, यशवंत तलाव या परिसरात भेटी देतात़ यात्रोत्सवाच्या पार्श्वभूमीवर गुरुवारपासूनच भाविकांची मंदिरात गर्दी झाल्याचे दिसून येत होते़ गोरक्षनाथ महाराज हे नवसाला पावत असल्याची आदिवासी बांधवांमध्ये ख्याती असल्याने याठिकाणी विविध नवसपूर्तीच्या सोहळ्यांना गुरुवारीच प्रारंभ झाल्याचे दिसून आले़ दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होणार असल्याने म्हसावद येथे पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे़

 

महाशिवरात्रीला तीन राज्यातून येणारे भाविक सोबत पीठ आणतात़ हे पीठ संकलित करुन त्याचा महाप्रसाद तयार करण्याची परंपरा आणि पाढंऱ्या शुभ्र कापडात गुंडाळून तयार होणारा हा सवा मणाचा रोडगा भाविकांना महाप्रसाद म्हणून वाटप करण्याचा पारंपरिक उपक्रम सकाळपासून सुरु होतो़ शुभ्र कापडात गुंडाळून केवळ विस्तवावर केवळ कणिक भाजले जाते़ परंतू कापड मात्र जळत नसल्याचे अनोखे दृश्य येथे नजेरस पडते़ प्रसादाचे वाटप पहाटेच्या सुमारास करण्यात येत असल्याने त्यासाठी भाविका रांगा लावून थांबनू असता़ ज्याला प्रसाद मिळाला त्याची यात्रा सफल झाली अशी मान्यता असल्याने हा प्रसाद घेण्याची चढाओढच भाविकांमध्ये असते़ दरम्यान रोडगा भाजल्यानंतर अग्नीकुंडातील राख गोळा करुन घरी भाविक घरी घेऊन जातात़