शहरं
Join us  
Trending Stories
1
संसदेत काय घडतेय? पंतप्रधान मोदी आणि प्रियांका गांधी, सुप्रिया सुळे यांच्यात चाय पे चर्चा...; कटुता विसरून रंगल्या गप्पा
2
पंतप्रधान मोदींनी ओमानमध्ये कानातले घातले? व्हायरल व्हिडिओमागचे सत्य आले समोर; जाणून घ्या नेमका प्रकार काय!
3
काश्मीरमधील जलविद्युत प्रकल्पातील २९ कर्मचाऱ्यांचे दहशतवाद्यांशी संबंध, धक्कादायक माहिती समोर  
4
Video - "आई, माझ्यावर दया करा"; बायकोला घरी पाठवण्यासाठी सासूच्या पाया पडला जावई
5
मुंबईत शिंदेसेनेला ८४ जागा सोडण्यासही भाजपाचा स्पष्ट नकार; दोन्ही पक्षाकडून स्वबळाची तयारी?
6
ओलाचा शेअर रॉकेट बनला, झटक्यात 10% नं भाव वाढला; मालकानं घेतला मोठा निर्णय
7
बड्या उद्योगपतीकडून फडणवीसांचा 'पंतप्रधान' म्हणून उल्लेख; CM स्वतःही अवाक्! नेमकं काय घडलं?
8
बँका सेवांवरील शुल्क वाढवणार, अनेक सुविधा बंद करण्याच्या तयारीत; ग्राहकांसाठी निराशाजनक बातमी
9
२०२६ संपूर्ण वर्ष लाभ, ४ राशींचा भाग्योदय; ४ ग्रह गोचराने इच्छापूर्ती, मनात आणाल ते मिळेल!
10
"मला पॅनिक अटॅक यायचे", आईवडिलांच्या घटस्फोटावर पहिल्यांदाच बोलली गिरिजा ओक, म्हणाली- "त्यांच्या नात्यात..."
11
नवीन वर्ष २०२६: सुख-समृद्धीसाठी ९ प्रभावशाली उपाय, जे बदलून टाकतील तुमचे संपूर्ण आयुष्य!
12
१९७१ नंतरचं सर्वात मोठं संकट, बांगलादेशमधील अस्थिरतेमुळं भारतासमोर ५ मोठी आव्हाने
13
Osman Hadi : कोण आहे हा उस्मान हादी? ज्याच्या मृत्यूने पुन्हा पेटला बांगलादेश; डोक्याला लागली होती गोळी
14
'म्हाडाची जमीन हडपल्याप्रकरणी मंगेश कुडाळकरांवर गुन्हा दाखल करा'; विशेष न्यायालयाचे भ्रष्टाचार प्रतिबंधक विभागाला निर्देश
15
घराणेशाहीचा वाद! "BMC Election is not a Family Business" भाजपा सचिवाचं अमित साटम यांना पत्र
16
भारतीय जर्सी घालून पाकिस्तानी खेळाडू भारताकडून खेळला; आता पाक फेडरेशन कारवाई करणार
17
किंगफिशर एअरलाइन्सच्या माजी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! ईडीने ३१२ कोटी रुपये केले परत
18
YouTube वर ५ लाख सबस्क्रायबर्स होताच 'महाभंडारा'; दीड किमीच्या रांगा, ५ हजार लोकांची गर्दी
19
गौरव म्हणाला, 'रात्र झालीये इथेच थांबा'; मैत्रीण बाहेर गेली अन् २३ वर्षीय खेळाडू तरुणीवर हॉटेलमध्ये बलात्कार
20
वाळवंटी सौदीच्या बर्फाने डाव मांडला! विश्वास बसेना, पण अरब व्हिडीओ पोस्ट करू लागले...; उणे ४ अंशांवर गेला पारा
Daily Top 2Weekly Top 5

११ वीच्या प्रवेशासाठी गुणवत्तेची कस लागणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 6, 2020 13:03 IST

लोकमत न्यूज नेटवर्क ब्राह्मणपुरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेत नाशिक ...

लोकमत न्यूज नेटवर्कब्राह्मणपुरी : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या १० वीच्या परीक्षेत नाशिक विभागात ९३.७३ टक्के विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. मागील वर्षीच्या तुलनेत निकालात १६.१५ टक्के वाढ झाली आहे. तसेच सीबीएसई आणि आयसीएसईचा निकालही ९५ टक्यांचा पार लागल्याने यंदा नामांकित कॉलेजमध्ये प्रवेशासाठी चांगलीच चुरस पाहावयास मिळणार आहे.यंदा शहादा तालुक्यातील नामांकित महाविद्यालयात ११ वी प्रवेशासाठी एक हजार ६०० च्या सुमारास जागा आहेत आणि दहावीत त्याहून जास्त विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत. त्यामुळे वरिष्ठ स्तरावर याची माहिती देत तुकड्या वाढविण्याची मागणी करावी लागणार असल्याचे एका महाविद्यालयातील प्राचार्याकडून सांगण्यात आले. त्यामुळे तालुक्यातील विद्यार्थ्यांना अपेक्षित कॉलेजमध्ये प्रवेश मिळवणे हे आव्हानच ठरणार आहे.दरवर्षी १० वीचा निकाल जूनमध्ये जाहीर होतो. यंदा करोना व लॉकडाऊनमुळे निकालाला दीड महिन्याहून अधिक काळ विलंब झाला. करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे भूगोलाचा शेवटचा पेपर रद्द करावा लागला. त्यामुळे इतर विषयांच्या सरासरीने या विषयात गुण दिले गेले.इयत्ता १० वीच्या निकालात आणि गुणांचा टक्का चांगलाच वाढल्याने विद्यार्थ्यांना आता ११ वीत आपल्या आवडीचे महाविद्यालय मिळवण्यासाठी स्पर्धा करावी लागणार आहे. निकाल चांगला लागल्याने यंदाचा कट आॅफदेखील १० ते १५ टक्यांनी वाढण्याची शक्यता आहे. तसेच प्रवेश आॅनलाईन की आॅफलाईन याबाबत महाविद्यालयाना विचारणा केली असता वरिष्ठ शिक्षण विभागाकडून पुढील निर्णय येण्याची वाट पाहत असल्याचे सांगितले.नेहमीप्रमाणे ११ वीसाठी विज्ञान शाखेत प्रवेश घेण्याकडे विद्यार्थ्यांचा कल असतो. तालुक्यातील नामांकित महाविद्यालयात मागील वर्षी एकूण विद्यार्थ्यांच्या एक हजार ६०० च्या विद्यार्थ्यांनी विज्ञान शाखेला पसंती दिली होती. यंदाही तुकड्या वाढून विद्यार्थी संख्येत वाढ होऊन प्रवेश विज्ञान शाखेत होण्याची शक्यता आहे. १० वीचा यावर्षी शहादा तालुक्यातील ९२.४० टक्के निकाल लागला असून, त्यातील ५० टक्के विद्यार्थ्यांनी जरी विज्ञान शाखा निवडली तरी प्रवेश होणार आहेत. परंतु विज्ञान शाखेकडे कल असल्याने कला शाखेतील अनेक जागा रिक्त राहतात. त्यामुळे कला शाखांना प्रवेशासाठी कसरत करावी लागते. यंदाही तीच स्थिती असण्याची शक्यता आहे.