लोकमत न्यूज नेटवर्कनंदुरबार : बाजार समितीत गेल्या अडीच महिन्यापासून कांदा लिलाव बंद असल्याने कांदा उत्पादक हैराण झाले आहेत़ बाहेरील राज्यात किंंवा जवळच्या बाजारात कांदा घेऊन जाणे शक्य न झाल्याने अनेकांनी कांदा फेकून देत त्याची विल्हेवाट लावली आहे़नंदुरबार बाजार समिती यापूर्वी कांदा हा भाजीपाला पिकांमध्ये खरेदी करण्यात येत होता़ परंतू कांदा अनुदान योजना लागू झाल्यानंतर परवानाधारक व्यापारी नसल्याने अडचणी येत होत्या़ यातून कांदा लिलाव करुन त्याची विक्री करणे शक्य नसल्याने आडतदारांनी कांदा खरेदी बंद केली आहे़ दरम्यानच्या काळात बाजार समितीचे मार्केट यार्ड हे रात्री सुरु झाल्याने ग्रामीण भागातून सुविधा नसलेले शेतकरी येणे बंद होवून कांदा आवक बंद झाली आहे़गरजू आणि छोटे शेतकरी रात्री किंवा दिवसा आडतदारांना भाजीपाला बाजारात कांदा विक्री करुन जात आहेत़ यातून मंगळवारी कांदा प्रतिक्विंटल ४०० ते ५०० रुपये प्रतिक्विंटल दराने खरेदी करण्यात आला आहे़ वाहतूकीचा खर्चही निघत नसल्याने अनेकांनी कांदा फेकून दिला आहे़ शनिमांडळ शिवारातील अनेक शेतांमध्ये कांदा चाळ व्यतिरिक्त कांदा रस्त्यावर तसेच शेतात सोडून देण्यात आला आहे़ हा कांदा गुरे आणि शेळ्या मेंढ्या यांना चारण्यात येत आहे़ नंदुरबार बाजार समितीत परवानाधारक कांदा खरेदीदार नसल्याने शेतकरी अनुदानापासून वंचित राहत आहेत़ आडतदार अनुदान देऊ शकत नाहीत़ लगतचा दोंडाईचा आणि धुळे बाजार कोरोनाच्या पार्श्वभूमी बंद चालू अवस्थेत असल्याने नुकसान वाढले आहे़जिल्हाधिकाऱ्यांनी कापूस साठा करुन ठेवणाºया शेतकºयांचे नुकसान टाळण्यासाठी पंचनामे करण्याचे आदेश दिले आहेत़ यातून कापूस उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळाला आहे़ याच धर्तीवर कांदा उत्पादक शेतकºयांनाही दिलासा देऊन पडून असलेला कांदा शासनाने खरेदी करण्यासाठी व्यापारी नियुक्त करण्याची मागणी आहे़
शेतकऱ्यांवर कांदा फेकून देण्याची आली वेळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 11, 2020 12:22 IST