शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेश पेटला! २८ पत्रकारांना जिवंत जाळण्याचा प्रयत्न, एका हिंदूला झाडाला उलटे टांगून जाळले...
2
महापालिका निवडणुकीत एकनाथ शिंदेंना मोठा धक्का; शिंदेसेनेच्या पदाधिकाऱ्यांचा सामुहिक राजीनामा
3
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
4
"...म्हणून आम्ही सांगत होतो करा सदैव हिंदुत्वाची कदर"; पवारांचा उल्लेख, आशिष शेलारांनी उद्धव ठाकरेंवर डागली तोफ
5
Investment Plan : केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
6
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
7
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
8
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
9
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
10
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
11
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
12
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
13
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
14
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
15
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
16
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
17
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
18
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
19
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
20
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
Daily Top 2Weekly Top 5

विसरवाडी येथील चौपदरीकरणाच्या कामामुळे अनेकांवर बेघर होण्याची वेळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:29 IST

निवेदनात म्हटले आहे की, विसरवाडी येथे आम्ही सर्व अर्जदार सन १९७० ते ७५ पासून वास्तव्यास असून, सद्यस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे ...

निवेदनात म्हटले आहे की, विसरवाडी येथे आम्ही सर्व अर्जदार सन १९७० ते ७५ पासून वास्तव्यास असून, सद्यस्थितीत महामार्गाच्या चौपदरीकरणाचे काम सुरू असून, या मार्गावर आमची घरे व व्यावसायिक प्रतिष्ठाने होती. निवासी घरापासून राज्य महामार्ग हा ३० ते ४० मीटर दक्षिण दिशेस होता. मात्र सन १९८४ मध्ये राज्य महामार्ग दुरुस्तीच्या नावाने तीस ते चाळीस मीटर गावाच्या उत्तर दिशेने वळवून आमची रहिवास असलेली घरे उठवण्यात आल्यामुळे आम्ही बेघर झालो होतो. त्यानंतर ग्रामपंचायतने अतिक्रमित रहिवासी असलेल्या सर्वांना सन १९८८ मध्ये रस्त्याच्या दुतर्फा म्हणजे दक्षिण व उत्तर दिशेस राहणे कामी व घर बांधण्यासाठी पत्र दिले होते. त्याअनुषंगाने संबंधित रहिवाशांनी पक्के व पत्र्याचे तसेच आरसीसीचे पक्के घर बांधून रहिवास म्हणून वापर करत आहे. परंतु राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामाला सुरुवात झाल्याने येथील रहिवाशांना मात्र कुठल्याही प्रकारची शासकीय नोटीस व आदेश न देता रस्त्याचे काम करणारे ठेकेदारांचे कर्मचारी येऊन संबंधित रहिवाशांना व व्यवसायिकांना ते राहत असलेली जागा मोकळी करून देण्यासाठी तोंडी सूचना देत आहेत. कोणतीही लेखी सूचना न देता जागा रिकामी करून देण्यास सांगून एक प्रकारे आमच्यावर अन्याय केला जात असल्याचे बोलले जात आहे.

राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरण गावाबाहेरून होणेसाठी ग्रामपंचायत विसरवाडी यांनी सन २०१२ ते १५ पर्यंत वेळोवेळी तालुका, जिल्हा, राज्यस्तरावर तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे. तरीदेखील आमचा कोणताही विचार करण्यात आलेला नाही. महामार्गाच्या कामामुळे सर्व बाधित रहिवाशांवर बेघर होण्याची वेळ आली असून, दुकानेही जात असल्याने अनेकांवर बेरोजगारीची वेळ आली आहे. अशा बिकट स्थितीत आमचे मनोधर्य खचत असून, संबंधित वरिष्ठांनी भरपाई देऊन व पुनर्वसन करून आम्हाला न्याय द्यावा, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे. न्याय न मिळाल्यास आम्हाला इच्छामरणाची परवानगी द्यावी अशी मागणी बाधितांनी निवेदनाद्वारे केले आहे.

निवेदनावर सरपंच बकाराम गावित, संतोष चौधरी, भटू पाटील, मोहन गोसावी, विजय रमणलाल अग्रवाल, शंकर गावीत, कर्तारसिंग राजपूत, तापाबाई सावळे, शहीदा खाटिक, जीवन तांबोळी, किसन हिरे, मायाबाई दाभाडे, दिनेश जयस्वाल, नीलेश जयस्वाल, सचिन लोहार यांच्यासह ६० नुकसानग्रस्त रहिवाशांच्या सह्या व अंगठे आहेत.