शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Nagar Parishad Election Results 2025 Live: भगूर नगरपरिषदेत शिवसेनेची २५ वर्षांची सत्ता अजितदादांच्या राष्ट्रवादीने उलथवली; पहा लेटेस्ट अपडेट
2
अमेरिका, ऑस्ट्रेलियानंतर आता दक्षिण आफ्रिका...! गोळीबारात १० जणांचा मृत्यू, १० जखमी
3
Akkalkot Nagar Parishad Election Result 2025: फटाक्यांची आतषबाजी, विजयाची घोषणा; मतमोजणीआधीच भाजपा कार्यकर्त्यांचा जल्लोष सुरू
4
Maharashtra Local Body Election Results 2025: 'या' तीन नगर परिषदा भाजपने जिंकल्या! निकालाआधीच उधळला गुलाल
5
घर खरेदीचे स्वप्न होणार साकार! 'ही' बँक देतेय स्वस्त होम लोन; ५० लाखांच्या कर्जासाठी किती हवी सॅलरी?
6
नात्याला काळीमा! विम्याच्या पैशांसाठी पोटच्या पोरांनीच रचला बापाच्या हत्येचा कट; 'असा' झाला पर्दाफाश
7
"भाजपचे आमदार इतके माजोरडे झालेत की..."; आमदार पराग शाह यांच्यावर वर्षा गायकवाड भडकल्या
8
Nora Fatehi : "मी जिवंत आहे, माझं डोकं दारावर..."; कार अपघातानंतर कशी आहे नोरा फतेहीची प्रकृती?
9
घर घेणे सामान्यांच्या आवाक्याबाहेर? पगार वाढला, पण घर खरेदी का कठीण झाली...
10
भीषण, भयंकर, भयावह! बांगलादेशात हिंदू तरुणाला जाळलं, मॉब लिंचिंग प्रकरणी १० जणांना अटक
11
'माझ्यावर वारंवार बलात्कार केला, मला न्याय द्या'; हाजी मस्तानची मुलगी हसीन मस्तानने पीएम मोदी आणि अमित शहा यांच्याकडे मागितली मदत
12
भारती सिंग आता करतेय तिसऱ्या बाळाचा विचार; व्हिडीओ शेअर करत म्हणाली- "मला मुलीची आशा..."
13
बांगलादेशात उग्र आंदोलन! जमावाने ७ वर्षाच्या मुलीलाही जिवंत जाळलं; हिंसाचारात माणुसकी मेली
14
चांगले संस्कार दिले नाहीत! अल्पवीयन मुलीला छेडणाऱ्या ४ आरोपींच्या आईलाच पोलिसांनी केली अटक
15
रहस्यमय! २४ तासांत गायब झाल्या १६ एपस्टीन फाईल्स; डोनाल्ड ट्रम्प यांच्या फोटोचाही समावेश
16
नोरा फतेहीच्या कारचा मुंबईत अपघात; मद्यधुंद चालकाने दिली धडक, अभिनेत्रीची प्रकृती कशी?
17
हृदयद्रावक! कळपाला धडकली 'राजधानी'; ७ हत्ती चिरडले, पिल्लू जखमी
18
लालसा, अहंकारामुळे भावंडांमध्ये दुरावा; उच्च न्यायालयाचे निरीक्षण; बहिणीविरोधात ज्येष्ठ नागरिकाचा मानहानी दावा
19
इशानने घेतला गिलचा बळी,  गोल्डन बॉय म्हणून किती दिवस संघात राहणार...
20
एपस्टीन फाइल्समध्ये 'मालिश तंत्र' अन् भारतीय आयुर्वेदाचा उल्लेख
Daily Top 2Weekly Top 5

पथकाने खोटा अहवाल देऊन शासनासह नागरिकांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या नियमावलीनुसार कामाची सुरुवात झाल्यापासून कामाचा दर्जा योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी केंद्रीय गुणवत्ता नियंत्रण ...

पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या नियमावलीनुसार कामाची सुरुवात झाल्यापासून कामाचा दर्जा योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी केंद्रीय गुणवत्ता नियंत्रण पथक व राज्य गुणवत्ता नियंत्रण पथक अशा दोन पथकामार्फत स्वतंत्ररित्या केली जाते. यात रस्त्याच्या एकूण लांबी पैकी प्रत्येक किलोमीटर अंतरावर एक खड्डा करण्यात येऊन त्यात मातीकाम खडीकरण डब्ल्यू.बी.एम. एकूण किती थर टाकण्यात आले आहे त्याची मोजणी डांबरीकरणाचा थर व वापरण्यात आलेल्या डांबराची क्वालिटी तपासण्यासह मुख्य धावपट्टीचा दर्जा तपासला जातो रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने व त्याच्या कर्मचाऱ्यांनी योग्य प्रमाणात पाण्याचा वापर केला आहे किंवा नाही, खडीचा वापर करताना ती योग्य दर्जाची आहे की, नाही याची तपासणी होऊन तिचे वजन केले जाते. सर्व बाबी समाधानकारक व नियमानुसार आढळून आल्यास काम योग्य दर्जाचे आहे, असा अहवाल या दोन्ही पथकामार्फत स्वतंत्ररित्या दिल्यानंतर ठेकेदाराला त्या कामाचे रनिंग बिल अदा करण्यासह पुढील कामाची परवानगी मिळते. विशेष म्हणजे या दोन्ही गुणवत्ता नियंत्रण पथकांमध्ये सेवानिवृत्त अधिकारी व अभियंत्यांचा समावेश असतो.

या दोन्ही निर्माणाधीन रस्त्यांवर केंद्र व राज्य गुणवत्ता नियंत्रण पथकाने तपासणी करून तसा अहवाल या सात वर्षाच्या कालावधीत किमान पाच वेळा दिला असल्याची माहिती आहे. असे असतानाही या रस्त्याचे सध्या परिस्थिती पाहता अनेक गंभीर चुका ठेकेदाराने केल्या असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून नियमबाह्य रित्या काम झाल्याचे आढळून येते यामुळे या दोन्ही रस्त्यांच्या निर्मितीमध्ये प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार व गैरप्रकार झाल्याने या रस्त्यांचा दर्जा खालावला असून, निकृष्ट दर्जामुळे हे रस्ते सध्या तरी मृत्यूचे सापळे ठरले आहेत. परिणामी एवढ्या गंभीर बाबी स्पष्टपणे आढळून येत असतानाही या दोन्ही पथकांनी सर्व काही आलबेल आहे, असा अहवाल दिला कसा. नियमबाह्यरित्या काम होत असताना काम योग्य दर्जाचे आहे, असा अहवाल या दोन्ही पथकाने देऊन शासनासह नागरिकांचीही दिशाभूल केली आहे. एकंदरीत या पथकाने बोगस अहवाल दिलेला असल्याने ठेकेदार मनमानीपणे कारभार करत असून, आज त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे. शासकीय पातळीवर असा निकृष्ट व बोगस अहवाल देणाऱ्या केंद्र व राज्य गुणवत्ता नियंत्रण पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

एकीकडे हे दोघे अपघात झाल्यानंतर महामार्ग सुरक्षा पथकाच्या उपविभागीय अधिकारी व अभियंत्यांनी तपासणी केली असता. निकृष्ट दर्जाचा रस्ता व नियमबाह्य कामे ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट अहवाल दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्र व राज्य गुणवत्ता नियंत्रण पथकाच्या बोगस अहवालावर विश्वास ठेवून काम करणारे पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता हे सुद्धा तेवढेच दोषी असल्याने शासनाने आता केंद्र व राज्य गुणवत्ता नियंत्रण पथकाच्या अधिकाऱ्यांसह पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांवर कारवाई करणे ही काळाची गरज आहे.