शहरं
Join us  
Trending Stories
1
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका महायुती एकत्रच लढणार, काही ठिकाणी स्वबळही: CM फडणवीस
2
आजचे राशीभविष्य १६ मे २०२५ : नोकरी - व्यवसायात लाभ प्राप्ती, कोणाच्या राशीत काय...
3
Sankashti Chaturthi 2025: 'घालीन लोटांगण' हा आरतीचा एक भाग नसून ते आहे स्वतंत्र कवन, पण कोणाचे? वाचा!
4
राष्ट्रपतींनी सर्वोच्च न्यायालयाला विचारले १४ प्रश्न; राज्यघटनेतील १४३(१) अनुच्छेदाचा वापर
5
संकष्ट चतुर्थी व्रत: चंद्रोदयाची वेळ कधी? ‘असे’ करा गणेश पूजन; पाहा, शुभ मुहूर्त अन् मान्यता
6
वनजमीन वाटपप्रकरणी राणेंना धक्का; गृहनिर्माणास देणे बेकायदा, CJI गवई यांचा ऐतिहासिक निकाल
7
सहज रद्द होईल, असा एफआयआर पोलिसांनी तयार केला; विजय शाहप्रकरणी तपासावर लक्ष ठेवणार कोर्ट
8
शुक्रवारी संकष्ट चतुर्थी: बाप्पासह लक्ष्मी देवीचेही पूजन करा; सुख-समृद्धी, अपार कृपा मिळवा
9
पाकिस्तान उभा राहतो तिथूनच सुरू होते भिकाऱ्यांची रांग: राजनाथ सिंह, अण्वस्त्रांवर देखरेख ठेवा
10
खासगी शिक्षण संस्थांमध्ये आरक्षण मिळेपर्यंत लढणार; राहुल गांधींचे आश्वासन, केंद्रावर दबाव
11
जनतेची हरकत आहे का? पक्षांना नोंदणीआधी विचारावे लागणार; नोंदणी शुल्क १० हजारांवरून २० हजार
12
आई गयावया करत होती, "बेटा सरेंडर कर ले..." ऐकले नाही, सैन्याने ३ दहशतवाद्यांना टिपले!
13
५००० घोडेवाले, ६०० चालक बेरोजगार; पहलगाम दहशतवादी हल्ल्यामुळे रोडावले पर्यटक, काश्मिरी संकटात
14
डोनाल्ड ट्रम्पची इच्छा: भारतात बनू नये आयफोन; ...तर साडेचार लाख कोटींचे होईल नुकसान
15
महायुती, ठाकरे गट की स्वबळावर? राज ठाकरे म्हणाले, “योग्य वेळी योग्य निर्णय, राजकीय बोलू नका”
16
एकनाथ खडसे पुन्हा भाजपच्या वाटेवर? चंद्रशेखर बावनकुळेंची घेतली भेट, चर्चांना उधाण
17
मुंबई काँग्रेस अध्यक्षा खासदार वर्षा गायकवाड यांना दिल्लीचे अभय; खरगे यांच्याकडूनही पाठराखण
18
राष्ट्रवादी एकत्र? सुनील तटकरेंनी दिला फुलस्टॉप; कोणताही प्रस्ताव किंवा चर्चा नाही
19
‘देवनार’च्या निविदेचे ४,५०० कोटी गेले कुठे? मंत्री आशिष शेलार यांचा आदित्य ठाकरेंना सवाल
20
नीरव मोदीच्या भारतातील प्रत्यार्पणाचा मार्ग मोकळा? लंडन हायकोर्टाने जामीन याचिका फेटाळली

पथकाने खोटा अहवाल देऊन शासनासह नागरिकांची फसवणूक केल्याचे स्पष्ट होत आहे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 24, 2021 04:19 IST

पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या नियमावलीनुसार कामाची सुरुवात झाल्यापासून कामाचा दर्जा योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी केंद्रीय गुणवत्ता नियंत्रण ...

पंतप्रधान ग्रामसडक योजनेच्या नियमावलीनुसार कामाची सुरुवात झाल्यापासून कामाचा दर्जा योग्य आहे किंवा नाही याची तपासणी करण्यासाठी केंद्रीय गुणवत्ता नियंत्रण पथक व राज्य गुणवत्ता नियंत्रण पथक अशा दोन पथकामार्फत स्वतंत्ररित्या केली जाते. यात रस्त्याच्या एकूण लांबी पैकी प्रत्येक किलोमीटर अंतरावर एक खड्डा करण्यात येऊन त्यात मातीकाम खडीकरण डब्ल्यू.बी.एम. एकूण किती थर टाकण्यात आले आहे त्याची मोजणी डांबरीकरणाचा थर व वापरण्यात आलेल्या डांबराची क्वालिटी तपासण्यासह मुख्य धावपट्टीचा दर्जा तपासला जातो रस्त्याचे काम करताना ठेकेदाराने व त्याच्या कर्मचाऱ्यांनी योग्य प्रमाणात पाण्याचा वापर केला आहे किंवा नाही, खडीचा वापर करताना ती योग्य दर्जाची आहे की, नाही याची तपासणी होऊन तिचे वजन केले जाते. सर्व बाबी समाधानकारक व नियमानुसार आढळून आल्यास काम योग्य दर्जाचे आहे, असा अहवाल या दोन्ही पथकामार्फत स्वतंत्ररित्या दिल्यानंतर ठेकेदाराला त्या कामाचे रनिंग बिल अदा करण्यासह पुढील कामाची परवानगी मिळते. विशेष म्हणजे या दोन्ही गुणवत्ता नियंत्रण पथकांमध्ये सेवानिवृत्त अधिकारी व अभियंत्यांचा समावेश असतो.

या दोन्ही निर्माणाधीन रस्त्यांवर केंद्र व राज्य गुणवत्ता नियंत्रण पथकाने तपासणी करून तसा अहवाल या सात वर्षाच्या कालावधीत किमान पाच वेळा दिला असल्याची माहिती आहे. असे असतानाही या रस्त्याचे सध्या परिस्थिती पाहता अनेक गंभीर चुका ठेकेदाराने केल्या असल्याचे स्पष्टपणे दिसून येत असून नियमबाह्य रित्या काम झाल्याचे आढळून येते यामुळे या दोन्ही रस्त्यांच्या निर्मितीमध्ये प्रचंड प्रमाणात गैरव्यवहार व गैरप्रकार झाल्याने या रस्त्यांचा दर्जा खालावला असून, निकृष्ट दर्जामुळे हे रस्ते सध्या तरी मृत्यूचे सापळे ठरले आहेत. परिणामी एवढ्या गंभीर बाबी स्पष्टपणे आढळून येत असतानाही या दोन्ही पथकांनी सर्व काही आलबेल आहे, असा अहवाल दिला कसा. नियमबाह्यरित्या काम होत असताना काम योग्य दर्जाचे आहे, असा अहवाल या दोन्ही पथकाने देऊन शासनासह नागरिकांचीही दिशाभूल केली आहे. एकंदरीत या पथकाने बोगस अहवाल दिलेला असल्याने ठेकेदार मनमानीपणे कारभार करत असून, आज त्याचे दुष्परिणाम सर्वसामान्य नागरिकांना भोगावे लागत आहे. शासकीय पातळीवर असा निकृष्ट व बोगस अहवाल देणाऱ्या केंद्र व राज्य गुणवत्ता नियंत्रण पथकाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई होणे गरजेचे आहे.

एकीकडे हे दोघे अपघात झाल्यानंतर महामार्ग सुरक्षा पथकाच्या उपविभागीय अधिकारी व अभियंत्यांनी तपासणी केली असता. निकृष्ट दर्जाचा रस्ता व नियमबाह्य कामे ही अपघातांची प्रमुख कारणे असल्याचे स्पष्ट अहवाल दिल्यानंतरही त्याची अंमलबजावणी करण्याऐवजी केंद्र व राज्य गुणवत्ता नियंत्रण पथकाच्या बोगस अहवालावर विश्वास ठेवून काम करणारे पंतप्रधान ग्रामसडक योजनेचे कार्यकारी अभियंता, उपअभियंता हे सुद्धा तेवढेच दोषी असल्याने शासनाने आता केंद्र व राज्य गुणवत्ता नियंत्रण पथकाच्या अधिकाऱ्यांसह पंतप्रधान ग्राम सडक योजनेच्या अभियंत्यांवर कारवाई करणे ही काळाची गरज आहे.