शहरं
Join us  
Trending Stories
1
'शेतकऱ्यांना १०० टक्के नुकसानभरपाई द्या, अन्यथा महाराष्ट्र बंद करू'; मनोज जरांगेंचा इशारा
2
Swami Chaitanya Saraswati: 'माझ्या खोलीत ये, तुला...'; स्वामी चैतन्यानंद सरस्वतीचे 'अश्लील कारनामे', व्हॉटसअप चॅटमध्ये काय?
3
Vaibhav Sooryavanshi : वैभव सूर्यंवशी U19 तील नवा सिक्सर किंग! सेट केला नवा वर्ल्ड रेकॉर्ड
4
लडाखच्या पूर्ण राज्याच्या दर्जासाठी लेह पेटले; सोनम वांगचूक म्हणाले, हा तरुणांचा राग होता, GenZ क्रांती...
5
नोकरी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी! नवीन वर्षाच्या 'या' महिन्यापासून ATM मधून काढता येणार PF चे पैसे
6
अतिवृष्टी, पुराचा रेल्वे गाड्यांनाही फटका; पावसामुळे रेल्वे गाड्यांच्या वेळापत्रकात बदल
7
नवरात्रीच्या पहिल्याच दिवशी 'गरबा'त विघ्न; नियमाचे पालन की 'मॉरल पोलिसिंग'? नागपूरमध्ये वाद का उफाळला?
8
उद्धव ठाकरेंचा दौरा ठरला; पुराचा फटका बसलेल्या 'या' पाच जिल्ह्यांत करणार पाहणी
9
डिलिव्हरी बॉय जेवण देण्यासाठी आला अन् समोर भिकारी; पेमेंटसाठी फोन काढताच बसला धक्का
10
17 मुलींची छेडछाड केल्याचा आरोप, स्वामी चैतन्यानंद सरस्वती फरार; खोट्या नंबर प्लेटसह व्हॉल्वो जप्त; कुणी केली तक्रार?
11
Railway Employee Diwali Bonus: रेल्वे कर्मचाऱ्यांची दिवाळी लवकरच होणार गोड, मिळणार ७८ दिवसांचा बोनस
12
शांत, सुंदर लडाख का पेटलं? पूर्ण राज्याच्या दर्जासह आंदोलकांच्या या आहेत ४ प्रमुख मागण्या  
13
४ बहि‍णींवर अत्याचार करणाऱ्या आरोपीचा नवा कारनामा; मेहुण्याला संपवून घरामागे पुरलं, सहा महिन्यांनी...
14
Navratri 2025: नवरात्रीत का खेळला जातो भोंडला? हातगा प्रकार वेगळा असतो का? वाचा 
15
Viral Video: ज्ञानाच्या मंदिरात मुख्याध्यापिकाच दारू पिऊन तर्राट; व्हिडीओ पाहून संतापले लोक!
16
VIRAL : परदेशी जोडपं फोटो काढत होतं, अचानक माकडं खांद्यावर आलं अन्... व्हिडीओ बघून खूश व्हाल!
17
Leh Protest: लेहमध्ये आंदोलनाला हिंसक वळण, भाजप कार्यालय पेटवले, सोनम वांगचुक १५ दिवसांपासून उपोषणावर
18
निवृत्तीनंतर दरमहा मिळेल १५,००० रुपये पेन्शन, एलआयसीच्या 'या' योजनेबद्दल तुम्हाला माहिती आहे का?
19
"एमबीबीएससाठी वेळ आणि पैसे खर्च करण्यापेक्षा मला...", अनुरागने घरातच स्वतःला संपवले, चिठ्ठीमध्ये काय?
20
"योगी स्वतःला पीएम मोदींचा उत्तराधिकारी समजतात...!"; CWC च्या बैठकीत खर्गेंचा मोठा हल्ला, नीतीश कुमारांसाठी असा शब्द वापरला

नंदुरबारात अतिक्रमण हटावचा मुद्दा पडला मागे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 5, 2019 11:52 IST

ठराव करूनही उपयोग नाही : जिल्हाधिकाऱ्यांच्या भुमिकेकडे लक्ष कायम

नंदुरबार : शहरातील वाढलेले अतिक्रमण काढण्याचा ठराव पालिका सभेत पाच महिन्यांपूर्वी करण्यात येवून देखील त्याबाबत काहीही हालचाली होत नसल्याची स्थिती आहे. पालिकेने तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांना याबाबत पत्र देखील दिले होते. परंतु त्याचाही उपयोग झाला नसल्याची स्थिती आहे.नंदुरबारातील अतिक्रमणाचा प्रश्न दिवसेंदिवस किचकट होत चालला आहे. असा एकही रस्ता, चौक नाही जेथे अतिक्रमण नाही. यामुळे शहरवासी हैराण झाले आहेत. पालिकेने याबाबत ठराव केलेला आहे. जिल्हाधिकाऱ्यांना विनंती देखील केली आहे. परंतु कुठलीही हालचाल झालेली नसल्यामुळे आश्चर्य देखील व्यक्त केले जात आहे.अनेक वर्षांपासून प्रलंबीतनंदुरबारातील अतिक्रमणाचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबीत आहे. पाच वर्षांपूर्वी मोहिम राबविण्यात आली. परंतु केवळ पायरी, ओटे व कच्चे अतिक्रमण काढण्यापर्यंतच ती मर्यादीत राहीली. मोठ्या अतिक्रमणांना हात लावण्याची हिंमत प्रशासनाची झाली नाही. आता सर्वच प्रकारचे लहान, मोठे, पक्के अतिक्रमण काढावे यासाठी मागणी जोर धरू लागली आहे. त्याला कारण नागरिकांना कराव्या लागणाºया अडचणींचा सामना. शहरातील असा एकही रस्ता किंवा चौक नाही जेथे अतिक्रमण नाही. त्यामुळे एखाद्या रस्त्याने चार चाकी वाहन काढणे म्हणजे मोठे दिव्य ठरते.दुचाकी व पायी चालणाºयांनाही समस्यांचा सामना करावा लागतो. त्यामुळे आता नागरिकच या अतिक्रमणांना कंटाळलेले आहेत. एकदाचा हा प्रश्न निकाली काढावा यासाठी नागरिकांमधून मागणीला जोर येवू लागला आहे.पालिकेचा ठरावपाच महिन्यांपूर्वी पालिकेने सर्वसाधारण सभेत ठराव केलेला आहे. शहरातील सर्वच भागातील आणि सर्वच प्रकारची अतिक्रमणे काढावी असा तो ठराव आहे. त्याची प्रत जिल्हाधिकाºयांना देखील देण्यात आली आहे.शिवाय पालिकेने स्वतंत्र पत्र लिहून शहरात अतिक्रमण हटाव मोहिम राबवावी अशी मागणी केली आहे. त्या बाबीला आज चार महिने झाले असले तरीही कुणीही फारसे गांभिर्याने घेतले नसल्याची स्थिती आहे.अतिक्रमणाचे सर्व्हेक्षणपालिकेने यापूर्वीच शहरातील सर्व भागातील अतिक्रमणाचे सर्व्हेक्षण केलेले आहे. कुठल्या भागात किती आणि कसे अतिक्रमण आहे याची सर्व माहिती पालिकेने तयार केली आहे. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने अतिक्रमण हटावची मोहिम राबविण्याचे ठरविताच लागलीच संबधितांना नोटीसा देवून १५ दिवसाच्या आत स्वत:हून अतिक्रमण काढण्याचे आवाहन केले जाणार आहे. त्यानंतर प्रत्यक्षात मोहिम राबविली जाणार आहे. परंतु यासर्व बाबीला मुहूर्तच सापडत नसल्याची स्थिती आहे.राजकीय किणारहीअतिक्रमण हटाव मोहिमेला राजकीय किणार देखील राहणार आहे. यातून राजकारण देखील खेळले जाणार आहे. सत्ताधारी आणि विरोधकांचे अनेक ठिकाणी अतिक्रमण आहे. अनेक ठिकाणी विनापरवाणगी बांधकाम झालेली आहेत. मंजुरीपेक्षा अधीकची बांधकामे आहेत. त्यात दुकाने, हॉटेल, शॉपींग सेंटर, घरे यांचाही समावेश आहे. याशिवाय कच्ची अतिक्रमणांमध्ये ठिकठिकाणी टपºया ठेवण्यात आल्या आहेत.अशा टपºयांमध्ये काही ठिकाणी चांगला तर काही ठिकाणी अवैध मद्य विकणे, अवैध मांस विक्री करणे असे प्रकार देखील चालतात. यातून संबधीत भागात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न देखील निर्माण होण्याची शक्यता असते.परंतु याचे ना पालिकेला ना जिल्हा प्रशासनाला सोयरसुतक असल्याचे दिसून येत आहे.